साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील कंकराळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सह सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यामध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे विश्वासू व युवा नेते कुणाल राजपुत यांच्या विकासकामांच्या जोरावर बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झाल्यामध्ये लोकनियुक्त सरपंच किशोर सोनवणे , ग्रामपंचायत सदस्य कुणाल राजपुत , रत्नाबाई ढाकरे , गोरख पवार , सुनिता उबाळे , शाम जैस्वाल , निर्मला सोनवणे , सारीका हिवराळे यांचा समावेश आहे , यावेळी पत्रकारांशी बोलतांना कुणाल राजपुत यांनी सांगितले की, “आजचा निर्णय ऐतिहासिक असुन विकासाचा विजय झाला”. यादरम्यान सर्व विजयी उमेदवारांचे सत्कार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय सोयगाव येथे करण्यात आले ,…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी जळगाव जिलह्यातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आपला गड राखला आहे. बोदवड तालुक्यात चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. तर एक ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता आली आहे. दुसरीकडे भाजप-शिंदे गटाला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही, तर मुक्ताईनगरातील कुऱ्हा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले. तर उंचदा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे सर्व नऊ उमेदवार निवडून आले आहेत. मात्र सरपंच पदाचे उमेदवार शिंदे-भाजप गटाच्या पाठींब्यावर निवडून आले आहेत.जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातील ग्रामपंचायीच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या ठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यातील दोन तर बोदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या. खडसे यांच्या…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील ग्रापंचायतचा निकाल मोठा धक्कायक लागला असून एकतर्फी परिवर्तन घडले आहे संपूर्ण तालुक्यात मोठ्या चर्चेत असलेल्या ग्रामपंचायत चा निकाल अपेक्षेपेक्षा धक्कादायक लागला असून रघुनाथ विठ्ठल महाजन यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दिनेश सुमेरसिंग पाटील यांना तब्बल एक हजाराच्या मतधिक्याने पराभवाची धूळ चारली आहे तर सदस्य पदासाठी ही आघाडी घेतली लोकनियुक्त सरपंच पदासाठी दिनेश पाटील व रघुनाथ महाजन यांच्यात ही काटेकीटक्कर पाहायला मिळाली यात विद्यमान सरपंचपती दिनेश सुमेरसिंग पाटील यांचे लोकसन्मान पॅनल व रघुनाथ विठ्ठल महाजन यांचे परिवर्तन पॅनल ची सरळ लढत झाली यात रघुनाथ महाजन यांच्या पॅनलचे सतरा पैकी तब्बल तेरा जागांवर विजय मिळवला तर…
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामपंचायत निकालानंतर टहाकळी ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन गट आपसात भिडल्याने तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागत असतांना तालुक्यातील टहाकळी येथे जालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटांकडून शाब्दीक वादानंतर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन्ही गट भाजपाचे असल्याचे समजते. तर या घटनेत टहाकळी खुर्द येथील धनराज माळी (वय 30) असे मृत झालेल्ेया कार्यकर्त्याचे नाव असून चार ते पाच कार्यकर्ते जखमी असल्याचे वृत्त आहे.
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या व जळगाव लोकसभेचे लोकप्रिय खासदार उन्मेशदादा पाटील यांचे मूळ गाव असलेल्या दरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते गिरीश पाटील यांचा दणदणीत विजय झाल्याने दरेगाव ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. चाळीसगाव तालुक्यात सुमारे 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त सरपंच निवडून आल्याने पुन्हा एकदा चाळीसगाव तालुका हा भाजपाचा बालेकिल्ला ठरला आहे.. खासदार उन्मेशदादा पाटील यांचे मुळगाव दरेगाव ता. चाळीसगाव या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार उमेदवार गिरीश पाटील यांनी राजेंद्र साबळे यांचा एकतर्फी पराभव करीत ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला आहे. वैशाली राठोड, बबन गायकवाड,…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघाची चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे ,तालुका अध्यक्ष रमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती.सिग्नल पॉईंट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या चौकास शिवतीर्थ नाव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने प्रवेशद्वार व्हावे असा विषय चाळीसगाव शहर सल्लागार नामदेव तुपे यांनी मांडला . मानलेला मुद्दा महत्त्वपूर्ण असल्यामुळे सर्वांनी तात्काळ निवेदन देऊन मागणी करण्याचा निर्णय घेतला. म्हणून सिग्नल पॉईंट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या चौकास शिवतीर्थ नाव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने प्रवेशद्वार व्हावे म्हणून मराठा महासंघातर्फे दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी चाळीसगाव नगरपरिषद, खासदार उमेश…
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी जिल्ह्याचे राजकीय पितामह म्हणून ओळख असलेले माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्याशी तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचे पूर्वीपासून फार जिव्हाळ्याचे व घनिष्ठ संबंध होते. सुरेश दादांचे दोन दिवसापूर्वी जळगाव मध्ये आगमन झाल्यानंतर मला फार आनंद झाला. सुरेश दादा हे व्यापक जाणीव असलेले सक्षम अष्ठपैलू नेता आहेत. त्यांच्याकडे विचार समजून घेण्याची फार मोठी क्षमता आहे. आर.ओ. तात्यानंतर मी प्रथमच दादांना भेटत आहे. दादांना सदिच्छा देऊन मोकळी चर्चा झाली. ते फार सकारात्मक आहेत आणि सकारात्मक भूमिकेतूनच सकारात्मक बदल घडू शकतो याची जाणीव झाली. सामाजिक व राजकीय भूमिका निभवतांना अधिकाधिक उत्तरदायित्वासाठी प्रेरणा मिळाली. सुरेश दादांना भेटून नवीन ऊर्जा मिळाली…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी गोंदेगाव येथील पद्मवंशीय तेली समाज नूतन कार्यकारिणी ची निवड सर्वानुमते सर्व समाज बांधव गोंदेगाव तसेच मावळते अध्यक्ष राजेन्द्र नगरे उपाध्यक्ष .सन्माननीय श्री हीलालजी नगरे साहेब व सचिव श्री.प्रा.शांतीलालजी चौधरी साहेब तसेच सर्व कमिटी पदाधिकारी व मान्यवर सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली.महाराष्ट्र राज्य संपूर्ण कार्यकारिणी कडून नवनिर्वाचित कार्यकारणी पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार करून अध्यक्ष प्रशांत चौधरी , उपाध्यक्ष गौरव बिंदवाल, सचिव राजेन्द्र नगरे,सहसचिव महादू नगरे , प्रा.ताराचंद बिंदवाल सरजी , ईश्वर ढाकरे , प्रदिप झलवार , विजय नगरे सर यांच्यासह सर्व पदाधिकारी मान्यवर सदस्य यांना यावेळी पुढील सामाजिक विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत मोर्चा काढल्याप्रकरणी २० ते २५ जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक असे की, जळगाव जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात जा.क्र. दंडप्र/ १/कावि/ २०२२/२/ १२८, दि. ९ डिसेंबर २०२२ अन्वये दि. १० डिसेंबर २०२२ ते दि. २४ डिसेंबर २०२२ पावतो महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- ३७ (१) (३) चे आदेश (जमावबंदी आदेश) लागू केले आहेत. असे असतांना देखील पाळधी दुरक्षेत्र येथे पूर्व परवानगी न घेता मोर्चा काढून जमाव पाळधी दुरक्षेत्र येथे आणून शासकिय कामात अटकाव आणला म्हणून शेख सलीम शेख गनी कुरेशी,समद…
आपल्याला माहित आहे का ? सर्वाधिक जीवनसत्व पुरवणाऱ्या फळांमध्ये पेरूचा दुसरा क्रमांक लागतो. हा फळ खाताना कधी गोड त कधी आंबट अशी चव या फळाला आहे. विशेष म्हणजे या फळामध्ये शरीराला अवाक्षक असलेले अ , क आणि के हे तीन महत्वाचे जीवनसत्व असता म्हणून पेरू खाणं हे खूप लाभदायक आहे असा म्हंटलं जातं. पेरू खाल्ल्याने शरीराला आवश्यक लोह (आयर्न) या खनिजाचा पण लाभ होतो. हा फळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपल्या शरीरलाला होणाऱ्या अनेक आजारांपासून संरक्षण सुद्धा देतो, म्हणून पेरू आरोग्यासाठी खूप फायद्याचा आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात (थंडीच्या दिवसांत) होणाऱ्या अनेक आजारांपासून संरक्षण देणारे फळ म्हणून पेरू आरोग्यासाठी फायद्याचे आहे. जाणून…