जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत काढला मोर्चा ; धरणगाव पोलिसात २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा !

0
2

साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत मोर्चा काढल्याप्रकरणी २० ते २५ जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, जळगाव जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात जा.क्र. दंडप्र/ १/कावि/ २०२२/२/ १२८, दि. ९ डिसेंबर २०२२ अन्वये दि. १० डिसेंबर २०२२ ते दि. २४ डिसेंबर २०२२ पावतो महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- ३७ (१) (३) चे आदेश (जमावबंदी आदेश) लागू केले आहेत. असे असतांना देखील पाळधी दुरक्षेत्र येथे पूर्व परवानगी न घेता मोर्चा काढून जमाव पाळधी दुरक्षेत्र येथे आणून शासकिय कामात अटकाव आणला म्हणून शेख सलीम शेख गनी कुरेशी,समद अब्दुल रहमान शेख (दोघं रा. पाळधी ता. धरणगाव) यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. अरुण निकुंभ हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here