यश सुनील झाडे यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; पोलीस तपास सुरू साईमत/ नागपूर / प्रतिनिधी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ताजी घटना समोर येत असतानाच, नागपूरमध्येही एका १२ वीच्या विद्यार्थ्याने धक्कादायक पद्धतीने आत्महत्या केली आहे. मृतकाचे नाव यश सुनील झाडे असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. माहितीनुसार, यश झाडे मानेवाडा येथील जवाहर नगर परिसरात राहात होता. नुकत्याच संपलेल्या १२ वीच्या परीक्षांनंतरही तो दररोज घरच्यांना “पेपर आहे” असे सांगून बाहेर जात असे. कालदेखील त्याने घरातून पेपर असल्याचे सांगून निघाला, मात्र रात्री उशिरापर्यंत परत आला नाही आणि त्याचा फोनही बंद होता. कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची तक्रार दाखल केली.…
Author: saimat
लोखंडी रॉड-विळ्याने हल्ला, ८ जणांवर गुन्हा साईमत/ जळगाव / प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील आसोदा गावात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. खुन्नस देणे व शिवीगाळ केल्याच्या कारणावरून रविवारी (१५ मार्च) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत लोखंडी रॉड आणि विळ्याचा वापर करून एका व्यक्तीला गंभीर दुखापत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा गावातील गॅरेज चालक शेख सलीम शेख लतीफ (वय ५४, रा. भादली रोड) यांना संशयितांनी शिवीगाळ केली. त्यानंतर जाहीद शेख रऊफ याच्यासह इतर सात जणांनी लोखंडी…
पार्किंग बंदी असूनही प्रवासी वाहने उभी राहतात साईमत/भुसावळ / प्रतिनिधी, भुसावळच्या बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीचा मोठा सुळसुळाट सुरु आहे, आणि संबंधित यंत्रणांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून खासगी वाहनांद्वारे बिनधास्त प्रवासी वाहतूक केली जात असून, एसटी महामंडळ, रेल्वे प्रशासन आणि वाहतूक शाखा यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही, त्यामुळे नियम तोडणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे. बसस्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरु असून, क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरून मुक्ताईनगर, बोदवड, यावल, फैजपूर, सावदा, जामनेर आणि जळगाव या मार्गांवर प्रवासी वाहून नेले जात आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या…
साईमत/ धरणगाव / प्रतिनिधी पैशांच्या व्यवहाराच्या वादातून ५५ वर्षीय महिलेसह त्यांच्या पतीला अमानुष मारहाण केल्याची घटना धरणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. मुलाने घेतलेल्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून संतप्त झालेल्या एका व्यक्तीने कुऱ्हाडीच्या उलट्या दांड्याने महिलेच्या डोक्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वत्सलाबाई रघुनाथ ठाकरे (वय ५५, रा. धार, ता. धरणगाव) या १४ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील सार्वजनिक जागेत उभ्या होत्या. यावेळी आरोपी कैलास सुपडू ठाकरे याने त्यांच्या मुलाने घेतलेल्या पैशांची मागणी केली. मात्र “त्या पैशांच्या व्यवहाराची मला माहिती नाही,” असे वत्सलाबाई यांनी सांगताच…
साईबाबा मंदिर परिसरातील बांधकामादरम्यान दुर्घटना निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी साईमत/पाळधी/ प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे सुरू असलेल्या पर्यटन विकास प्रकल्पात सोमवारी भीषण दुर्घटना घडली. साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अचानक निर्माणाधीन स्लॅब कोसळल्याने सात कामगार जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटन विभागाकडून पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत गेल्या काही महिन्यांपासून विविध बांधकामांची कामे सुरू आहेत. सोमवारी कामगार नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना अचानक बांधकामाचा साचा आणि स्लॅब कोसळला. क्षणातच मोठा आवाज झाला आणि परिसरात…
७ कामगार जखमी, दोघांची प्रकृती गंभीर साईमत/ जळगाव / प्रतिनिधी जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विकास कामादरम्यान आज मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक तयार होत असलेला स्लॅब कोसळल्याने सात कामगार जखमी झाले असून त्यापैकी दोन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर परिसराचा विकास पर्यटन प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून येथे विविध बांधकामांची कामे सुरू आहेत. मात्र आज बांधकाम सुरू असतानाच अचानक स्लॅब कोसळल्याने कामगारांमध्ये घबराट पसरली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोन जणांची प्रकृती…
घरगुती ग्राहकांना मोफत वीज; केंद्र –राज्य अनुदानामुळे प्रकल्प खर्च अत्यंत कमी; महावितरणच्या निर्बंधांवर ग्राहकांनी नोंदवले तक्रारी साईमत/ पुणे / प्रतिनिधी – प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, योजनेअंतर्गत राज्यातील १,०८,३२७ घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवले गेले आहेत. केंद्र सरकारने गेल्या पाच महिन्यांतील योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्राने ५ लाख ५७ हजार २२४ देशभर बसवलेल्या घरगुती सौर प्रकल्पांपैकी १९% बसवले. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (९५,६६५ प्रकल्प), तिसऱ्या क्रमांकावर गुजरात (९४,३६४), राजस्थान (३९,४८४) आणि केरळ (३६,८३६) आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर…
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणला साईमत/शेंदुर्णी/ प्रतिनिधी, शेंदुर्णी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दणाणून गेला. भव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, तहसीलदार नानासाहेब आगळे, तसेच नगरसेवक संजय गरुड, शरद बारी, जितू पाटील, जे.के.चव्हाण, कमलाकर पाटील, प्रदीप लोढा, अरविंद देशमुख, दीपक तायडे यांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे सदस्य उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण शेंदुर्णी…
सावित्रीबाई फुले योजनेत ५ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मासिक शिष्यवृत्ती सुधारित रकमेवर साईमत/ मुंबई / प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जातीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत रक्कमेची मोठी वाढ करण्यात आली आहे.याअनुसार, ५ वी ते ७ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक २५० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल, तर ८ वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक ४०० रुपये मिळणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांनी सांगितले की, सध्याची शिष्यवृत्ती रक्कम तुटपुंजी असल्याची कबुली त्यांनी केली आहे. सध्या ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना ६० रुपये आणि ८ वी ते १० वीच्या…
ऐतिहासिक आगमन, भाविक उत्साहात रंगले शहर साईमत/फैजपूर / प्रतिनिधी फैजपूर शहरात यावर्षी आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता पालखी सुभाष चौकात आगमन होणार आहे, अशी माहिती डिंगंबर महाराज चिनवलकर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली. यावर्षीच्या मुक्ताई फिरता नारळी सप्ताहाचे यजमानपद सेवा यावल व रावेर तालुक्यांना मिळाले असून, महोत्सवाचे नियोजन महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज व रवींद्र हरणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पालखी सोहळा सुभाष चौकातून खुशालभाऊ रोड मार्गे श्रीराम मंदिराकडे मार्गस्थ होणार असून, पुढे विठ्ठल मंदिरात थांबणार आहे. आयोजकांनी भाविकांना आवाहन केले आहे की, विठ्ठल मंदीर परिसरात…