उच्चभ्रू कैलाश हिल्स परिसरात खळबळ; घरात घुसून गळा आवळून हत्या, जुन्या नोकरावर संशय, पोलिसांचा तपास वेगात साईमत / नवी दिल्ली दक्षिण दिल्लीतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या अमर कॉलनी परिसरातील कैलाश हिल्स येथे एका तरुणीची घरात गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणी ही १९९७ बॅचमधील एका वरिष्ठ आयआरएस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी तरुणी घरात एकटीच होती. तिचे आई-वडील नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक आणि जिमसाठी बाहेर गेले होते. या दरम्यान आरोपीने घरात प्रवेश करून हा भयानक प्रकार घडवून आणल्याचा संशय…
Author: saimat
पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; संशयित तंजीर इनामदारला अटक, पाच दिवसांची पोलिस कोठडी साईमत / नाशिक नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पीडित महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मोबाईलमध्ये जबरदस्तीने फोटो काढणे, त्या फोटोंच्या आधारे धमकावून लैंगिक अत्याचार करणे तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकणे असे गंभीर आरोप एका व्यक्तीवर करण्यात आले आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित तंजीर इनामदार याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तंजीर हा जून २०२४ पासून जानेवारी २०२६ पर्यंत वारंवार तिच्यावर मानसिक आणि शारीरिक दबाव टाकत होता. तिच्या इच्छेविरुद्ध तिचे…
रानमेवा गोळा करण्यासाठी गेलेल्या कृष्णा आगीवलेवर झडप; वनविभागाच्या दुर्लक्षाचा आरोप, परिसरात भीतीचे वातावरण साईमत / कसारा डोळखांब वनपरिक्षेत्रातील कळभोंडे लाद्याची वाडी येथे मंगळवारी सकाळी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कृष्णा भागा आगीवले असे मृत बालकाचे नाव असून या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास कृष्णा हा गावालगतच्या जंगलात रानमेवा गोळा करण्यासाठी गेला होता. झाडावरील आंबे व करवंदे तोडत असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. या हल्ल्यात कृष्णा गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव…
गर्दीचा गैरफायदा; बसस्थानकात महिलेचे मंगळसूत्र लंपास साईमत चाळीसगाव प्रतिनिधी : शहरातील बसस्थानक परिसरात गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकारामुळे बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा सुधाकर पाटील (वय ३९, रा. काकळणे, ता. चाळीसगाव) या मंगळवारी (दि. २१ एप्रिल) दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकावर आल्या होत्या. त्या पारोळ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, तेथील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र लंपास केले. चोरी झाल्याचे लक्षात…
साईमत / मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक डिजिटल आणि सुलभ बनवण्याच्या दिशेने बेस्ट उपक्रमाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रवाशांना आता बसमधील कंडक्टरकडून तिकीट घेण्याची किंवा सुट्ट्या पैशांची कटकट सहन करावी लागणार नाही. बेस्ट बसची तिकिटे आता ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) च्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी करता येणार आहेत. या सुविधेमुळे प्रवासी क्यूआर कोड स्कॅन करून थेट त्यांच्या मोबाईलवरील ॲप्समधून तिकीट खरेदी करू शकतील. विशेष म्हणजे, यासाठी वेगळे ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. गूगल पे, फोनपे, पेटीएम आणि व्हॉट्सॲपसारख्या लोकप्रिय ॲप्सद्वारे ही सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या बेस्टच्या एकूण महसुलात डिजिटल तिकीट प्रणालीचा सुमारे १५ ते १६…
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा एल्गार; विविध कथित घटनांवरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न साईमत जळगाव प्रतिनिधी : शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधात बुधवारी (दि. २२ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत देशाचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर आवाज उठवत देशात कथित जिहादी मानसिकतेशी संबंधित प्रकरणे विविध स्तरांवर समोर येत असल्याचा आरोप केला. विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रातही अशा प्रवृत्तींचा प्रभाव वाढत असल्याचा दावा करत या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. निवेदनात नाशिकमधील टीसीएस कंपनीशी…
जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी, किनारी भागात भीतीचे वातावरण साईमत / टोकियो वृत्तसंस्था उत्तर जपानमध्ये आज 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भूकंप झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या भूकंपानंतर जपानच्या हवामान संस्थेने (JMA) तात्काळ त्सुनामीचा इशारा जारी केला असून किनारी भागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान संस्थेच्या माहितीनुसार, या भूकंपानंतर 3 मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5.32 वाजता 70 सेंटीमीटर उंचीची पहिली लाट किनार्यावर धडकली. इवाते प्रांतातील कुजी बंदरात 5.34 वाजता आणखी एक त्सुनामी लाट नोंदवण्यात आली. त्यापूर्वी 40 सेंटीमीटर उंचीची छोटी लाटही किनाऱ्यावर धडकल्याची माहिती मिळाली…
तांत्रिक बिघाडामुळे प्लॅटफॉर्म गोंधळ; मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, मध्य रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत साईमत / मुंबई मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या CSMT स्थानकात आज दुपारी मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली आहे. दुपारी सुमारे ३:१५ ते ३:२० च्या दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरहून येणारी एक जलद लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ऐवजी चुकून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ कडे वळवण्यात आली. त्याच वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आधीच एक लोकल उभी होती. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्याचे लक्षात येताच मोटरमनने तात्काळ प्रसंगावधान राखत ब्रेक…
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द करत निरोप घेतला साईमत जळगाव प्रतिनिधी : जिल्हा पोलीस दलात आज झालेल्या पदभार हस्तांतरण सोहळ्यात नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिकृतपणे जिल्ह्याच्या पोलीस दलाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द करत भावपूर्ण वातावरणात निरोप घेतला. या सोहळ्याला जळगाव पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कार्यकाळाचा विशेष उल्लेख करण्यात आला. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, गुन्हेगारीवर घालण्यात आलेला प्रभावी वचक तसेच जनहितासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यशैलीमुळे…
शहापूरमध्ये बिबट्याचा भीषण हल्ला; ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, वनविभागाच्या उशिरामुळे संतापाची लाट साईमत / शहापूर शहापूर तालुक्यातील वाशाळा वनपरिक्षेत्रातील कळभोंडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृत मुलाचे नाव कृष्णा भागवत अगीवले असे असून तो नेहमीप्रमाणे मित्रांसोबत आंबे तोडण्यासाठी जंगल परिसरात गेला होता. मे महिन्याच्या सुट्टीमुळे परिसरातील मुले सकाळी शाळेनंतर आंबे गोळा करण्यासाठी जंगलात जात होती. परंतु या वेळी जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कृष्णावर हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. काही क्षणांतच घडलेल्या…