इंधनात पाणी की भेसळ? मुक्ताईनगरात चौकशीची मागणी तीव्र साईमत/मुक्ताईनगर / प्रतिनिधी मुक्ताईनगर येथे भेसळयुक्त पेट्रोल विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. काही वाहनधारकांनी पेट्रोलमध्ये पाण्याचे थर दिसत असल्याचा दावा केल्यानंतर संपूर्ण इंधन पुरवठा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये अचानक बिघाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. इंजिन मिसफायर होणे, वाहन अचानक बंद पडणे, मायलेजमध्ये लक्षणीय घट होणे तसेच वारंवार दुरुस्तीचा खर्च वाढणे…
Author: saimat
एकाच दिवसात हजारो कारवाया १९६ गुन्ह्यांची नोंद साईमत/जळगाव / प्रतिनिधी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस यांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ या विशेष धडक मोहिमेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडवली आहे. दि. ५ जून रोजी एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी गुन्हेगार, अवैध धंदे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी धाडसत्र, तपासणी मोहीम आणि प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. अवैध व्यवसायांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासोबतच सार्वजनिक सुरक्षेला बाधा आणणाऱ्या घटकांवरही पोलिसांनी निर्णायक कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदवले गेले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दारूबंदी…
नागरिकांच्या हेलपाट्यांची दखल; महापौरांनी प्रशासनाला सुनावले खडे बोल साईमत/जळगाव / प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन शिस्तीबाबत वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. कार्यालयीन वेळेत सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या कार्यस्थळी उपस्थित राहून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करतील, याची खात्री करण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्येतील वाढ आणि नागरी सुविधांची वाढती मागणी यामुळे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र अनेकदा संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी महापौरांकडे मोठ्या प्रमाणात पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आयुक्तांना…
नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणाचा आरोप, प्रशासनाकडे चौकशीची मागणी साईमत/सावदा (ता. रावेर)/ प्रतिनिधी सावदा–फैजपूर राज्य मार्गावर पूर्वापार अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक नाल्याचे अतिक्रमण करून त्याचे गटारीत रूपांतर करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणात भू-माफियांचा हात असल्याचा आरोप होत असून, प्रशासनाकडे तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सावदा नगरपालिका हद्दीतील हॉटेल मनालीलगत असलेला हा नैसर्गिक जलप्रवाह महसूल विभागाच्या अधिकृत नोंदीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सातपुडा पर्वतरांगांमधून सुमारे ११ किलोमीटर अंतरावरून वाहत येणारा हा प्रमुख नाला असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नेण्याची त्याची नैसर्गिक क्षमता आहे. मात्र, काही भू-माफियांनी संगनमत करून या नाल्याचे मूळ…
साईमत न्यूज नेटवर्क – पुणे : दौंड तालुक्यातील पाटस येथे भरदुपारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून झालेल्या या प्रकारात 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती मिळाली असून परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) दुपारी सुमारे अडीच वाजता ही घटना घडली. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथून काही तरुण पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्स परिसरात आले होते. त्यावेळी स्थानिक तरुणांशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि नंतर हाणामारीत झाले. त्यानंतर दगडफेक झाल्याचीही माहिती समोर आली असून यात एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले…
बाल कल्याण समितीतून उघड झाला धक्कादायक प्रकार साईमत/जळगाव / प्रतिनिधी शहरातील जैनाबाद परिसरात १५ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी असून, डिसेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात आरोपी कृष्णा चंद्रभान तायडे (रा. जैनाबाद, जळगाव) याने तिला फूस लावून घरातून पळवून नेले. त्यानंतर तिला जैनाबाद येथील राहत्या घरी डांबून ठेवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार बाल कल्याण समितीसमोर पीडित मुलीने दिलेल्या जबाबातून…
निवडणूक काळात ६६ पथकांची तैनाती साईमत/जळगाव / प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष पावले उचलली आहेत. निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार किंवा नियमभंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र आचारसंहिता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे नेतृत्व अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असून, निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नागरिकांनी थेट तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात व्यापक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यामध्ये ३३ व्हिडिओ…
दुचाकीवर भोवळ आल्याने नियंत्रण सुटले, न्हावी येथील इसमाचा मृत्यू, पत्नी जखमी साईमत/भुसावळ / प्रतिनिधी आमोदा गावातील बसस्थानक परिसरात घडलेल्या भीषण दुचाकी अपघातात न्हावी येथील ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. अचानक भोवळ आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून वाहन थेट रस्त्यालगतच्या विद्युत खांबावर आदळल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. ही घटना ४ जून रोजी दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास आमोदा गावातील बसस्थानकाजवळ घडली. मृत व्यक्ती भगवान वावधन चोपडे (वय ५४, रा. न्हावी, ता. यावल) हे आपल्या पत्नीसह दुचाकीने प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान बसस्थानकाजवळ पोहोचताच त्यांना अचानक भोवळ आली. पत्नीने त्यांना वाहन थांबविण्याचा सल्ला दिला होता. मात्र,…
१०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात कारवाई साईमत/जळगाव / प्रतिनिधी राज्य शासनाच्या कामगार विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेत लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत एका महिला कर्मचाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. भाग्यश्री विजय पाटील असे अटक करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. योजनेचा लाभ देण्यासाठी १०० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने ३ जून २०२६ रोजी संबंधित कल्याणकारी मंडळाच्या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानंतर ४ जून रोजी आवश्यक साहित्य संच घेण्यासाठी ते वितरण केंद्रावर गेले असता, तेथे कार्यरत असलेल्या भाग्यश्री पाटील…
साईमत न्यूज नेटवर्क – मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना मंजूर केल्याचा दावा करण्यात आला असून या योजनेचा सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष लाभाच्या अटींवरून आता मोठा संभ्रम निर्माण झाला असून केवळ सुमारे 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफीचा फायदा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये मविआ सरकारकडून कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या नव्या योजनेत पूर्ण लाभ मिळणार नाही. अशा सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफी मिळणार असून उर्वरित कर्जाची रक्कम त्यांना स्वतः भरावी लागणार आहे. तर ज्यांचे थकीत कर्ज 2 लाख…