साईमत / मुंबई / प्रतिनिधी राज्यातील एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना १०० टक्के गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली. राज्यातील रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असून एलपीजी आणि पीएनजीचे उत्पादन सुरू आहे. एलपीजी उत्पादन ९,००० मेट्रिक टनांवरून ११,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आले आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरू नये यासाठी रेडिओ, एफएम, दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमांद्वारे नियमित माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सोशल मीडियावरील अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. काळाबाजार रोखण्यासाठी ८ मार्चपासूनच…
Author: saimat
शिंदे गट बळकट होणार? खासदार संपर्कात असल्याची चर्चा साईमत / मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळू लागले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील काही खासदारांना आपल्या गटात आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील निम्म्याहून अधिक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पक्षप्रवेशाच्या हालचालींना वेग आला असून, राज्यातील सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर…
साईमत / जालना / प्रतिनिधी जालना जिल्ह्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, गुरुवार (१९ मार्च) रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, तसेच झाडे, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि उंच इमारतींपासून दूर राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे. मेघगर्जना होत असताना मोकळ्या जागेत किंवा झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. तसेच, विजांचा कडकडाट सुरू असताना घरातील विद्युत उपकरणांचा वापर टाळण्याचा सल्लाही…
साईमत / मुंबई / प्रतिनिधी मुंबईत सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानकांना शहरातील विविध वाहतूक पर्यायांशी प्रभावीपणे जोडण्यावर भर देण्यात येत आहे. स्थानकांच्या परिसरात ‘स्टेशन प्लाझा’ विकसित करून प्रवाशांना बस, टॅक्सी, रिक्षा आणि इतर साधनांपर्यंत सहज पोहोचता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. हाय-स्पीड रेल्वेला शहराच्या वाहतूक व्यवस्थेशी जोडण्यासाठी मल्टी-मोडल इंटिग्रेशन (MMI) प्रणाली राबवली जाणार असून, यामुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना कोणतीही अडचण येणार नाही. बुलेट ट्रेनमधून उतरल्यावर थेट स्टेशन प्लाझामधून पुढील प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होणार असल्याने ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ अधिक सोपी होईल. स्टेशन प्लाझा हे सार्वजनिक जागेप्रमाणे विकसित करण्यात येणार असून, येथे पार्किंग, पिक-अप व…
लाचेच्या जाळ्यात स्टॅम्प वेंडर; भाऊसह रंगेहात अटक साईमत/पाचोरा / प्रतिनिधी पाचोरा शहरात स्टॅम्प पेपर विक्रीतील अनियमिततेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत अधिकृत स्टॅम्प वेंडर आणि त्याच्या भावाला रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आकारत लाच मागणाऱ्या या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे. तक्रारदारास वैयक्तिक कामासाठी ५०० रुपये किंमतीचे १० स्टॅम्प पेपर आवश्यक होते. यासाठी ते दि. १५ मार्च २०२६ रोजी पाचोरा येथील जामनेर रोडवरील ‘प्रशांत झेरॉक्स’ येथे गेले. येथे अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी याने प्रति स्टॅम्प ५५० रुपये दर सांगत एकूण ५,५०० रुपयांची मागणी केली. शासनाने ठरविलेली किंमत ५००…
शहरातील सुमारे २० ते २२ ठिकाणी धाडी टाकून तपासणी केली. साईमत/मलकापूर/ प्रतिनिधी : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे अत्यावश्यक वस्तूंच्या संभाव्य तुटवड्याची शक्यता लक्षात घेता मलकापूर शहरात पुरवठा विभागाने कडक भूमिका घेतली आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ (कलम ३) तसेच ‘मेंटेनन्स ऑफ प्रॉडक्शन, स्टोरेज अँड सप्लाय’ आदेशानुसार ९ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गॅस एजन्सी धारक, पेट्रोल पंप चालक, हॉटेल, उपहारगृह, ढाबे तसेच मंगल कार्यालय चालकांना घरगुती गॅसचा…
आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्रामवर ठेवलेला ‘शेवटचा संदेश’ उघडकीस साईमत/जळगाव/ प्रतिनिधी जळगाव शहरातील शासकीय वसतिगृहातून मंगळवारी १८ वर्षीय रोहित समाधान पवार या तरुणाने आत्महत्या केली, ज्यामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार हा धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी असून जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवारी १७ मार्च रोजी सकाळी त्याचे वडील समाधान पवार व काका त्याला भेटण्यासाठी वसतिगृहात आले. रोहितने वडिलांना सांगितले की “पोटात दुखत असल्यामुळे आज कॉलेजला जाऊ शकत नाही.” वडील परतल्यानंतर काही तासांतच दुर्दैवी घटना घडली. दुपारी सुमारे ३ वाजता रोहितचा रूममेट सागर शिरोळ कॉलेजवरून परतल्यावर त्याने खोलीत रोहितला गळफास घेतलेले पाहिले. तत्काळ त्याला शासकीय…
उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या बर्फाच्या लाद्यांची मागणी घटली साईमत/जळगाव/ प्रतिनिधी उन्हाळ्याची उन्हे प्रचंड वाढल्यावरही जळगावमधील पारंपरिक बर्फ व्यवसाय आता संकटात सापडला आहे. एकेकाळी उन्हाळ्याच्या हंगामात हातगाडीवरून बर्फगोळा, थंड पाणी, रसवंती आणि सरबत विक्रीसाठी गर्दी करीत असलेल्या विक्रेत्यांची मोकळी मागणी आता ‘रेडिमेड’ आइस्क्रीमच्या आगमनामुळे कमी झाली आहे. पूर्वी शहरात पाच बर्फ कारखाने सक्रिय होते; मात्र आता फक्त दोन कारखानेच उरले आहेत. घरगुती फ्रीज, बाजारात सहज उपलब्ध ब्रँडेड आइस्क्रीम, आणि लग्नसमारंभ, पार्ट्यांमध्ये रेडिमेड वस्तूंना वाढती पसंती यामुळे पारंपरिक बर्फ व्यवसायाचे गणित कोलमडले आहे. वाढता खर्च, घटते उत्पन्न विक्रीतील घट आणि उत्पादनाचा वाढता खर्च हे बर्फ व्यवसायासाठी मोठे आव्हान ठरले आहे. वीजदर, मजुरी व…
राज्य सरकारचे मोठे पाऊल, पर्यावरणपूरक वाहतूक धोरणाला गती साईमत / मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी बस आता पूर्णपणे इलेक्ट्रिक होणार आहे. राज्य सरकारने आपल्या धोरणात बदल करत ताफ्यातील २२ हजार बस टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. सध्या २२ हजारमध्ये सुमारे ८०० बस इलेक्ट्रिक आहेत. पुढील काही वर्षांत उर्वरित डिझेल बसेसचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करून राज्यातील सरकारी बस सेवा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल, असे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण आणि आर्थिक फायद्यासाठी उपाय राज्यभरात चार्जिंग स्टेशन उभारल्या जातील, ज्यासाठी…
ग्रामस्थांचे आवाहन वन विभागाने तातडीने पिंजरा लावा साईमत/नंदुरबार/तळोदा / प्रतिनिधी तळोदा शहराच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा वावर वाढल्याचे समोर आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अलीकडील घटनेत एका प्राण्याचा बळी गेल्यामुळे शेतकरी आणि स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत. १६ मार्च २०२३ रोजी, सोमवारी रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास, शेतकरी राजेश तुकाराम सूर्यवंशी यांच्या शेतालगत असलेल्या आमराईत झोपडीत बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एका शेळीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या तेथून पळून गेला, मात्र काही वेळानंतर तो पुन्हा त्या ठिकाणी दिसून आला. स्थानिकांनी सतर्कता दाखवत आवाज करून त्याला दूर पळवून लावले. प्रत्यक्षदर्शींच्या मते,…