साईमत जळगाव प्रतिनिधी ज्या देशांमध्ये पेटंट अधिक असते. त्या देशांचे सकल देशातंर्गत उत्पादन (जीडीपी) जास्त असते. त्यामुळे भारताचा प्रवास विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे होण्यासाठी पेटंटवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विगो लायब्ररी फाउंडेशनचे संस्थापक निलेश पावसकर यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बौध्दिक संपदा अधिकार कक्ष, रसायनशास्त्र प्रशाळा आणि वेगो लायब्ररी फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी ”पेटंट” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पावसकर बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव या शाळेचे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पारधी येथील महागणपती या धार्मिक स्थळास भेट दिली तर इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पद्मालय या निसर्गरम्य ठिकाणी सहलीचा मनसोक्त आनंद घेतला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी संत मुक्ताबाई मंदिर कोथळी, संत चांगदेव मंदिर चांगदेव तसेच हतनुर धरण या ठिकाणी सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील संत परंपरा, भौगोलिक वारसा तसेच ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन घडवून दिले. तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गांधी तीर्थ या जैन व्हॅली येथे असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे आयोजन करून महात्मा गांधी यांच्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढण्यात आली. जळगाव जिल्ह्यात तीन सप्टेंबर पासून जनसंवाद यात्रेची अंमळनेर तालुक्यापासून सुरुवात झाली दिनांक 8 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर भुसावळ मार्गे नशिराबाद येथे जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जनसंवाद यात्रेचे फटाक्यांची आतिष बाजी करून ढोल ताशांच्या गजरात जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांनी स्वागत केले. यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी जनतेच्या मनातील समस्या व प्रश्न जाणून घेतले व जनसंवाद यात्रेचे…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी फैजपुर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील तब्बल २६ विद्यार्थी कॉपी केस मध्ये पकडले गेल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत प्रथम सत्राची परीक्षा २४ ऑगस्ट पासून घेण्यात येत आहे. दिनांक २८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने नेमलेल्या भरारी पथकाने कॉपी केस केली, पण नेमकी काय कारवाई केली, हे जाहीर केले नाही. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे.तथापि, विद्यापीठाच्या कारवाईकडे लक्ष लागून आहे. फैजपूर येथील तापी परिसर संचलित मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात एफ वाय बी फॉर्म तसेच एफ वाय एम फॉर्म या वर्गाची प्रथम सेमिस्टर परीक्षा घेण्यात येत आहे.…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ िंशदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या कार्य व्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी होणारा २६ ऑगस्टचा पाचोरा दौरा स्थगित झाला होता. त्यानंतर हा दौरा नऊ सप्टेंबरला होईल, असे आमदार किशोर पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यात पुन्हा बदल झाला असून, आता हा दौरा १२ सप्टेंबरला होणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. नऊ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांचा अचानक दिल्ली दौरा ठरल्याने हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. राज्य शासनातर्फे राज्यभर शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हानिहाय सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रम घेण्याचे नियोजन…
साईमत, जालना : प्रतिनिधी अंतरवाली सराटीतील आंदोलनामुळे राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची शपथ जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या संदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट पालकांना देखील विश्वासात घेतले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना या बाबत निव्ोदन देखील सादर केले आहे. मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळाव्ो, अशी जुनीच मागणी आहे. मात्र शासन या संदर्भात ठोस निर्णय घेत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे, तर पालकांनीही आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही…
साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबरला जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत मंडपम येथे ही परिषद पार पडत आहे. परदेशी पाहुण्याच्या स्वागतासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्याच्या राहण्या आणि खाण्यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. विदेशी पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण दिले जाणार आहे. त्यांच्या जेवणासाठी खास मेन्यूही तयार करण्यात आला आहे. या परिषदेमध्ये सामील होण्यासाठी अनेक देशांचे वरिष्ठ नेते भारतात दाखल झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे दिल्लीमध्ये पोहचले आहेत. विमानतळावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं स्वागत केंद्रीय मंत्री जनरल व्ही के…
साईमत जळगाव प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील ट्रान्सपोर्ट नगरातील ट्रकचालका सोबत रात्री वाद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्या तरुण ट्रकचालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात रात्री उशिरा पर्यन्त खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर रमेश पालवे (वय-२५) रा. मालदभाडी ता. जामनेर असे मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक असे की, सागर रमेश पालवे हा आई, वडील यांच्यासोबत जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे वास्तव्याला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तो जळगाव येथील विदर्भ ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणून कामाला होता.याबाबत एमआयडीसी पोलीस स्थानकात मयत सागर ची आई निलम रमेश पालवे यांच्या फिर्यादि वरून खुनाचा गुन्हा…
जळगावकरांच्या नशिबी काय वाढून ठेवलंय् ‘राम जाने’. जळगाव महानगरपालिकेची पाच वर्षाची मुदत येत्या १७ सप्टेबर रोजी संपत आहे.त्यानंतर मनपावर प्रशासक राजवट सुरु होईल.ती निवडणुका होऊन नव्या महापौरांची निवड होईपर्यंत राहील.गेल्या २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत जळगावकरांनी भाजपाच्या पारड्यात मतदानाचे भरघोस दान टाकले.७५ पैकी ५७ जागा दिल्या व एकहाती सत्ता प्रदान केली. त्यामागचे एक मुख्य कारण होते ते म्हणजे मंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी शहरवासियांना दिलेला शब्द.ते म्हणाले होते की,भाजपाला सत्ता दिल्यास जळगावचा चेहरामोहरा एक वर्षात बदलून टाकू.भाबड्या मतदारांनी त्यांच्या शब्दावर विश्वास टाकला.काही नाहीतर कमीत कमी शहरातील रस्ते,गटारी व आरोग्याच्या समस्या तरी मार्गी लागतील एवढीच माफक अपेक्षा लोकांनी केली मात्र झाले उलटेच. तत्कालीन…
शरद पवार यांची राजकिय कारकीर्द, अनुभव, मुत्सद्दीपणा, संयम, संघटन कौशल्य आणि निवडणूक जिंकण्याचे तंत्र हे भाजपासाठी मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे शिंदे गट आणि भाजपात खूप आनंदाचे वातावरण आहे, असेही चित्रं दिसत नाही. त्याचाही फायदा येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि त्यांच्या मित्र पक्षांनी जर निवडणूक जिंकली तर शरद पवार आणखी एक इतिहास घडवतील आणि ज्यांनी त्यांची साथ सोडली त्यांच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला निर्णय ही एक राजकिय आत्महत्या ठरेल. अर्थात, याचे उत्तर येणारा काळ ठरव्ोल, हे मात्र तेवढेच खरे आहे. राजकारण आणि क्रिकेट यात बऱ्याच गोष्टींचं…