Author: Saimat
मुंबईः प्रतिनिधी शिंदे सरकार(Shinde Govt) अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ (Shivatirtha)येथे भेट घेऊन चर्चा केली. आता संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस यांनी ठाकरे यांची भेट घेतली. शिंदे गटातील आमदारांना कोणती खाती मिळतात, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण आहे. या भेटीत नेमकं काय बोलणे झाले, हे मात्र स्पष्ट झाले नाही. मनसेचे आमदार राजू पाटील यांना भाजपाकडून मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्द्यावर बोलण्यासाठी फडणवीस राज ठाकरे यांना भेटणार…
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे आणि डॉ.सच्चिदानंद जोशी यांनी संपादित केलेले कनेक्शन थ्रु कल्चर ॲन ओव्हरव्हूय ऑफ इंडियाज सॉफ्ट पॉवर स्ट्रेन्थ या पुस्तकाचा नुकताच नवी दिल्ली येथे विमोचन सोहळा थाटात पार पडला. नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन, चाणक्य पुरी येथे बुधवार, दि.13 जुलै 2022 रोजी अनावरण सोहळा आयोजित केला होता. याचे विशेष पुस्तक विमोचन सोहळा केरळचे महामहिम राज्यपाल असिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भारताचे विदेश मंत्री डॉ.एस.जयशंकर हे उपस्थित होते. नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमास केंद्र सरकार मधील अनेक मंत्री, खासदार, ज्येष्ठ पत्रकार आणि अनेक बुध्दीजीवी उपस्थित…
जळगाव : प्रतिनिधी गुरूपैर्णिमेनिमित्त महर्षि शृंग ऋषि बहुउद्देशीय संस्था, आयोजक जळगाव सिखवाल समाज व रेड पल्स ब्लड बँक यांच्या संयुकत विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मॉर्डन गल्स हायस्कूल येथे करण्यात आले. समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले. समाजाच्या वतीने शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बाला पंडित, सत्तू तिवारी, अजय पुरोहित, कैलाश पांडे,कैलाश व्यास, किशन तिवारी, सुनिल पांडे, संतोष पुरोहित, गोपाल पांडे, गणेश व्यास आदींनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन पार पाडण्यासाठी संस्थेच्यावतीने श््याम जोशी, गोपाल पंडीत, मनीष ओझा, राजेश तिवारी, महेंद्र पुरोहित, प्रेम जोशी, गोपाल तिवारी, ऋषिकेश जोशी, उत्तम जोशी, मयूर जोशी, नारायण तिवारी,संस्थेचे अध्यक्ष प्रकाश…
जळगाव ः प्रतिनिधी पोलिस अधीक्षकांचे शासकीय निवासस्थान ‘अभय’ येथे गुरुवारी डॉ. प्रवीण मुंढे यांची कन्या देवयानीचा वाढदिवस वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात स्थानिक जैवविविधता जपणाऱ्या देशी झाडांच्या 120 रोपांची लागवड करण्यात आली. जैन इरिगेशन सिस्टिम लिच्या सहकार्यातून गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे हरित जळगाव ही संकल्पना घेऊन वृक्षारोपणाची चळवळ सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निवास परिसरात वृक्ष लागवड करून कन्या देवयानीचा वाढदिवस साजरा करत वृक्षलागवडीच्या चळवळीला प्रोत्साहन दिले. पोलिस अधीक्षक निवास परिसरात लिंब, पिंपळ, करंज, गुलमोहोर, बकुळ, जास्वंद, टिकोमा, पुत्रवंती, कन्हेर अशी 120 च्या वर रोपे लावली. सरासरी तीन वर्षे…
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी बाहेरपुऱ्यातील रस्त्यासाठी व मूलभूत सुविधा तसेच शासकीय योजना व शासकीय मोहिम याचा नागरिकांना लाभ मिळावा अशा विविध विषयांवर नागरिकांना न्याय देण्यासाठी सायंदैनिक साईमतने काल विशेष वृत्ताव्दारे प्रकाशझोत टाकला तसेच साईमत समाचारचे संपादक गणेश शिंदे यांनी सोशल मीडियावर प्रशासनाला धारेवर धरून रस्त्यावर मुरूम टाकण्यास भाग पाडले असून आज सकाळपासून रस्त्याच्या खड्ड्यावर मुरूम टाकण्याची मोहिम नगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे.या मोहिमेमुळे बाहेरपुरा रहिवाशांच्या मागणीला यश आले आहे. शहरातील बाहेरपुरा भागातील नागरिक गटारी व खराब रस्त्यामुळे खूप वैतागले आहे.या भागातील नगरसेवकांनीसुद्धा गेल्या पाच वर्षात गटारी आणि रस्त्याचे काम करू शकले नाही, याबाबत नागरिक खंत व्यक्त करीत होते.शहरातील बाहेरपुरा भागात…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अलीकडच्या सत्तांतरानंतर ठाणे जिल्ह्यातून बुलेट ट्रेन (Bullet Train)प्रकल्पाला गती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यासाठी वापरला जाणारा निधी मुंबईच्या लोकल ट्रेनसाठी(Local Train) वापरला जावा अशी मागणी मोदी सरकारकडे केलीय. गुरुवारी मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी आधी मुंबईची लाइफ लाइन असणाऱ्या लोकल ट्रेनसाठी केंद्राने निधी द्यावा अशी मी केंद्र सरकारकडे विनंती करते, असं म्हणत अप्रत्यक्षपणे बुलेट ट्रेनला विरोध केलाय. “बुलेट ट्रेनची मागणी कोणीही करत नाहीय. त्याऐवजी जे (मुंबईकर) मागतायत त्याला आधी निधी द्यावा. घाटकोपर आणि संपूर्ण भागातील रेल्वे, तिथलं शौचालये यासारख्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत. मुंबईची…
नागपूर : प्रतिनिधी राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर महविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) नवीन सरकार स्थापन केले. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. यापार्श्वभूमीवर शिवसेनेला पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेनेचे नेते विविध भागात शिवसंपर्क अभिनयान राबवित आहेत. यानिमित्ताने शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नागरपुरात दखल झाले. याचबरोबर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे ही आज नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) बालेकिल्लत आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते नागपूर दौऱ्यानिमित्त शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट होण्याची शक्यता…
साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव गेल्या अडीच वर्षापासून बंद असलेला हुतात्मा एक्सप्रेस दिनांक दहा पासून सुरुवात झाली होती मात्र कजगाव येथे हुतात्मा एक्सप्रेस ला थांबा रद्द करण्यात आल्याने प्रवासी व गावकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त होत होती , खासदार उमेश दादा पाटील यांच्याकडे मागणी केल्याने. खासदार उमेश दादा पाटील यांनी थेट रेल्वेमंत्री यांच्याकडे तातडीने हा थांबा सुरू करावा यासाठी पाठपुरावा केला हुतात्मा एक्सप्रेस ला थांबा देण्यात आल्याने ग्रामस्थांकडून हुतात्मा एक्सप्रेसचे जोरदार स्वागत करण्यात आले, याप्रसंगी प्रवासांनी खासदार उमेश दादा पाटील यांचे आभार मानले यावेळी गाडी चालकाचा सत्कार कजगाव पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आला, यावेळी भाजप शहराध्यक्ष रवींद्र पाटील,…
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत गुरूवारी मध्यरात्री औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पक्षाचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना काही मिळाले नाही. शिवसैनिकांचे एकही काम झाले नाही असा घणाघात लगावला आहे. दुसऱ्या पक्षाची कामे झाले, तिसऱ्याचा पक्ष वाढला… आम्ही गेलो 4 नंबरवर असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव् ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला वाचविण्यासाठी हा उठाव केला असून पक्षांचे खच्चीकरण करण्याची सुपारी कुणी घेतली आहे. असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर तोफ डागली आहे. तर आमचा शिवसैनिकांचे कामे तर झाली नाही मात्र त्यांच्यावर खोटे…