मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शिंदे हे एकटेच दिल्लीला गेले आहेत. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुढचे पाऊल नेमके काय असणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. खासदारांसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शिवसेना खासदारांच्या बंडाबाबत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. आमदारांना फोडल्यानंतर आता ते खासदारांना आपल्या गटात सामील करण्याच्या तयारीत आहेत. सुप्रीम कोर्टात(SC) बुधवारी होणाऱ्या सत्ता संघर्षावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या आमदारांनंतर आता खासदारसुद्धा बंड करण्याच्या तयारीत…
Author: Saimat
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे नुकताच झालेल्या बैठकीत जळगाव महानगराचे समाज सेवक तथा राष्ट्रवादी चे कार्यकर्ते ललित विजयराव नारखेडे यांची राष्टवादी चे सर्वे सर्वा मा .श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांशी अधीन राहून मा . युवक प्रदेश अध्यक्ष मा. महेबूब भाई शेख यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हा अध्यक्ष श्री. रवींद्र भैया पाटील यांच्या मागर्दर्शनाखाली शहर जिल्हा अध्यक्ष यांच्या सोबत पक्ष संघटन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून सर्वसामान्य युवकाच्या विकासात त्याच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी , लोकनेते एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या प्रेरणेने पक्षवाढी साठी ललित विजयराव नारखेडे यांची जळगाव महानगर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग असून त्यांना स्वस्त धान्य मिळणे है अतिशय आवश्यक आहे.परंत् शासनाने स्वस्थ धान्य कपात करून गोरिगरीबावर उपासमारीची वेळ आणलेली आहे.त्या करिता शासनाने स्वस्त धान्य कपातीचे निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी निळे निशान सामाजिक संघटनेतर्फे यावल तहसीलदार यांना निवेदन देऊन केली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील बेघर भूमिहीनांना तात्काळ ग्रामपंचायतीने रहिवास प्रयोजनार्थ जागा उपलब्ध करून किवा गोरगरीब गरजू कुटुंब ज्या जागी वास्तव्यास असतील त्या जागा नियमीत करून ग्रामपंचायत नमुना नं.8ला नोंद करण्यात यावी.आमच्या मागण्या या जनहिताच्या असून तात्काळ आपण मार्गी लावून गोरगरिवांना न्याय द्यावा अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात…
मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. आतापर्यंत अनेक नगरसेवक आणि नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिवसेनेचे (Shivsena) कट्टर समर्थक असणाऱ्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला आहे. आपणपदाचा राजीनामा का दिला, याबाबत कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे. रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंना पत्र : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) माझी शिवसेना नेते पदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पहायला मिळाले, असे म्हणत रामदास कदम यांनी पत्राच्या माध्यमातून आपली…
नागपूर : वृत्तसंस्था दोन वर्षे कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. काहींच्या नोकऱ्या गेल्या तर काहींनी घरी बसून काम केले. कोरोनामुळे जगभरात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. काहींच्या घरचे कमावते पुरुष कोरोनाने मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांची जगण्याची आशा संपली होती. कर्ता पुरुष गमावल्याने घरात लागणारा हातभार कमी झाला. काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय बुडाले तर काहींचे संसार उध्वस्त झाले. मात्र घडलेले सर्व मागे टाकून आता कुठे माणूस स्थिरावला आहे. जीवनाची गाडी दोन वर्षानंतर पुन्हा रुळावर आली आहे. पण त्यातही सरकारने महागाई वाढवून सामान्यांना संकटात टाकले आहे. वीजबिल असो किंवा ये-जा करणारे साधन, घरघुती वापराचे गॅस असो किंवा फोन मधला रिचार्ज सर्वांच्या किमती…
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सोमवारी सकाळी इंदूर-खरगोनदरम्यान भीषण अपघात झाला. इंदूरहून पुण्याकडे (अमळनेर) जाणारी बस धामनोद येथील खलघाटाजवळ खळखळणाऱ्या नर्मदा नदीत कोसळली. रात्री 10 ते 10.15 च्या दरम्यान खलघाट येथील दुपदरी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना बस अनियंत्रित झाली. चालकाचा तोल गेला आणि बस रेलिंग तोडून नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 40 प्रवासी होते. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 15 प्रवाशांना जिवंत बाहेर काढल्याचा दावा केला आहे. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितले की, आतापर्यंत…
जळगाव ः प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स वं सावरिया फ्युचर वर्क्स लि.च्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरातील अंत्यविधी वेळी येणारी अडचण पाहून जनतेच्या सेवेसाठी एक नवीन सुसज्ज असलेला स्वर्गरथ लोकार्पण सोहळा काल रोजी रोटरी हॉल, गणपती नगर येथे झाला . लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, महापौर जयश्रीताई महाजन,रमण अग्रवाल,माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, उपमहापौर कुलभूषण पाटील, नंदु अडवानी,सहाय्यक प्रांतपाल डॉ.मुर्तझा अमरेलीवाला, माजी अध्यक्ष नीरज अग्रवाल, विद्यमान अध्यक्ष जिनल जैन, मानद सचिव चेतन सोनी, विपुल पटेल, माजी अध्यक्ष सागर मुंदडा, धनराज कासट, योगेश कलंत्री,धर्मेश गादिया, नरेश मंधान, हर्षल कटारिया,चिराग शाह, योगेश साखला, गणेश सुर्यवंशी, करण ललवाणी, स्वरूप मल्हारा, जिगर पटेल,…
इंदूर : वृत्तसंस्था मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील इंदूर-खरगोन दरम्यान आज सकाळी मोठा अपघात झाला. इंदूरहून पुण्याला जाणारी बस सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास धामनोद येथील खलघाटाजवळील पुलावरून कठडे तोडत नर्मदा नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० ते ६० प्रवासी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले, असून अद्याप १५ जणांना वाचवण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. इंदूरपासून 80 किमी अंतरावर हा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदोरवरून पुण्याला जाणारी महाराष्ट्र एसटी मंडळाची बस ( एम एच ४० एन ९८४८ ) धार येथून अंमळनेरकडे निघाली होती, अंमळनेरकडे…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील थोर लेवा पाटीदार समाजातर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात सामाजिक सभागृहाची मागणी केली आहे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही सामाजिक कार्यकर्ते यांना तात्काळ आपल्या मागणीच्या अनुषंगाने मंजुरी मिळवून देतो असे आश्वासित केले. मुक्ताईनगर नगरसेवक श्री ललित महाजन,महेश प्रल्हाद झोपे अध्यक्ष- काळ भैरव मंदिर ट्रस्ट ,अरविंद पंडित झोपे सचिव -काळ भैरव मंदिर ट्रस्ट .उमाकांत वसंत बाऊस्कर अध्यक्ष-थोरसमित्र युवा फाऊंडेशन ,नितीन काशिनाथ चौधरी ग्रामपंचायत सदस्य ,सिद्धेस्वर शशिकांत पाटील सदस्य ,उमेश खंडू कोल्हे सहसचिव – काळ भैरव मंदिर ट्रस्ट कुणाल विजय राणे ,योगेश भागवत झोपे ,भगवान चौधरी ,विलास चौधरी ,पंकज कोल्हे ,दिपक…