राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्येच्या शपथविधीवर ऐतिहासिक टप्पा साईमत/मुंबई/प्रतिनिधी –: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या सत्तासमीकरणात नवा अध्याय सुरू केला आहे. सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत, ही ऐतिहासिक बाब मानली जात आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या शोकाकुल वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्यास छगन भुजबळ…
Author: saimat
वाहतूक नियम पाळा – सुरक्षित जीवन जगा’ या संदेशासह रॅली शहरातील प्रमुख चौक आणि मार्गांवरून काढण्यात आली. साईमत/मलकापूर /प्रतिनिधी –: रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मलकापूर शहरात वाहतूक पोलिसांच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली मलकापूर शहर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. ‘वाहतूक नियम पाळा – सुरक्षित जीवन जगा’ या संदेशासह रॅली शहरातील प्रमुख चौक आणि मार्गांवरून काढण्यात आली. रॅलीदरम्यान दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करण्याचे, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावण्याचे, मद्यपान करून वाहन न चालवण्याचे, वेगमर्यादा पाळण्याचे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याचे संदेश फलकांवरून नागरिकांपर्यंत पोहोचवले…
‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘भारत मातेचा विजय असो’, ‘हिंदू एकजुटीचा विजय असो’, ‘हिंदूंनो जागे व्हा’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. साईमत/जळगाव /प्रतिनिधी – हिंदूंवर होणारे अन्याय व अत्याचार समाजासमोर मांडणे, धर्मशिक्षणाच्या माध्यमातून हिंदूंना संघटित करणे आणि ‘हिंदू राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले. हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी काढण्यात आलेल्या या वाहनफेरीला शेकडो हिंदुत्वनिष्ठ व धर्मप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भगवे ध्वज, भगवे फेटे व टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून वाहनफेरी काढत संपूर्ण जळगाव शहर भगवेमय केले. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘भारत…
अवकाळी पावसाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा साईमत/धरणगाव/प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करून शासनाच्या नियमांनुसार मदत दिली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींमध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, गारखेडा, पष्टाने बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील करंज, धानोरा आणि…
भाजप ६, शिवसेना २ अर्जांसह मैदानात साईमत/जळगाव /प्रतिनिधी –: जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी राजकीय रंगरंगोटी उत्कंठेत भरली. शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी, भाजपकडून प्रत्येकी ६ अर्ज तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रत्येकी २ अर्ज ताब्यात घेण्यात आले. आता २ फेब्रुवारी रोजी कोण अर्ज भरणार, याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने ४६ तर शिवसेना शिंदे गटाने २२ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्षाचे मिळून महायुतीकडे ७० संख्याबळ असल्यामुळे महापौर पद भाजपकडे व उपमहापौर पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता निश्चित झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया गंगालेली होती.…
स्थानिक गुन्हे शाखेच्या गुप्त माहितीच्या आधारे वाहनचोरांचा पर्दाफाश; नागरिकांमध्ये समाधानाची लहर साईमत/भुसावळ /प्रतिनिधी –: स्थानिक गुन्हे शाखेने भुसावळ आणि जामनेर परिसरातील चोरीच्या मोटारसायकलींच्या प्रकरणात धाडसी कारवाई करत तीन दुचाकी जप्त केल्या आणि दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले. ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली असून यामुळे वाहनचोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार जामनेर परिसरातील अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९, रा. वाकी रोड, हरी ॐ नगर, जामनेर) आणि दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८, रा. संत सेवालाल नगर, जामनेर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी एका साथीदारासह मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तपासात समोर…
सकाळी ट्रॅक्टर पलटी, बाजारात धावपळ; जीवितहानी टळली साईमत/जळगाव /प्रतिनिधी – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी सकाळी एका अनियंत्रित ट्रॅक्टरने महामार्गावर पलटी घेतली; सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (३० जानेवारी) सकाळी सुमारे १० वाजता शेतकऱ्यांचा माल खाली करून ट्रॅक्टर (क्र. MH 19 BG 8416) भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटमधून बाहेर पडत होता. मात्र, मार्केट परिसरातून बाहेर येताच राष्ट्रीय महामार्गावर वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर अचानक पलटी घेतली. सकाळी १० वाजेच्या वेळेमुळे बाजार समिती परिसरात गर्दी होती आणि ट्रॅक्टर पलटी झाल्याने जोराचा आवाज झाला, ज्यामुळे परिसरात धावपळ उडाली. अपघातात चालकासह कुणालाही दुखापत झालेली नाही, ही…
पोलिसांच्या कारवाईत दोन संशयित ताब्यात साईमत/अमळनेर /प्रतिनिधी – अमळनेर शहरातील मेहेतर कॉलनी परिसरात जुन्या वादातून २७ जानेवारीच्या रात्री एका तरुणावर बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरूवारी, २९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये दोन संशयित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरुख खान रहिम खान पठाण (वय ३४, रा. चुनाधामी, गांधीलीपुरा) हे मंगळवारी, २७ जानेवारी रोजी रात्री सुमारे १ वाजता मुस्लिम कब्रस्तान परिसरातून जात असताना ही घटना घडली. जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित आरोपी विक्की घोगले आणि दिपक प्रभुदास लोहरे यांनी शाहरुख यांना अडवून शिवीगाळ…
खळबळजनक चोपड्यात दोन चिमुकल्यांसह महिलेची विहिरीत उडी साईमत/चोपडा /प्रतिनिधी –: जळगाव-चोपडा तालुक्यातील उमर्टी गावातून एका धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. २८ वर्षीय पमिता डोंगरसिंग पावरा या महिलेने दोन लहान मुलांसह स्वतःच्या घरातील विहिरीत उडी घेतली, ज्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अडीच वर्षांचा विरेन आणि १५ दिवसांचे बाळ यांचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पमिता काही दिवसांपूर्वीच बाळंत झाली होती आणि माहेरी आली होती. तिचा मोठा मुलगा विरेन काही दिवसांसाठी वडिलांकडे होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लोकांत दुःख आणि भीती पसरली आहे. बुधवारी स्थानिकांनी विहिरीत तिघांचे मृतदेह तरंगताना पाहिले. तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, त्यानंतर रात्रीच अंत्यसंस्कार…
महिलेला हात धरून मोटारसायकलीवर बसवण्याचा प्रयत्न साईमत/पाचोरा/प्रतिनिधी –: पाचोरा शहरातील पुजारी नगर परिसरात बुधवारी दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास एका २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली. कामाच्या निमित्ताने शहरात आलेली पीडित महिला एका रिकाम्या प्लॉटजवळून जात असताना, आरोपी निलेश कुमावत दुचाकीवर येऊन तिचा उजवा हात धरून बळजबरीने मोटारसायकलीवर बसवण्याचा प्रयत्न केला. महिलेवर लज्जास्पद कृत्य केल्याने तिने जोरात आरडाओरड केली, त्यावर आरोपी तिथून पसार झाला. घाबरलेली महिला ताबडतोब पाचोरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास पोलीस पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू ठेवला असून, आरोपीच्या शोधासाठी शहरभर पथक तैनात करण्यात आले आहे.पोलीसांनी नागरिकांना…