दारूच्या नशेत पतीने मारहाण, सासरच्या मंडळींनी पाठबळ; पोलीस तपास सुरू साईमत / भुसावळ / प्रतिनिधी भुसावळ भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील रिता मुकेश सुतार यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करून माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता पती मुकेश गजानन सुतार आणि सासरच्या ५ इतर सदस्यांविरुद्ध भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीनुसार, विवाह २०१२ मध्ये रितीरिवाजानुसार झाल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले तरी नंतर पती आणि सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. पती वारंवार दारूच्या नशेत घरी येऊन शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच, “तुझ्या…
Author: saimat
गुळी नदी पुलावरून ढकलले आणि डोक्यात दगड टाकून हत्या साईमत चोपडा प्रतिनिधी: चोपडा तालुक्यातील नारोद येथील एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरवून ठेवले आहे. घरगुती वादाला कंटाळलेला मोठा भाऊ, किरण पानचंद पाटील (वय ३०), यांनी आपल्या लहान भावाचा, रोहन पानचंद पाटील (वय २७), खून करण्याची कबुली दिली आहे. २१ मार्च रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास गुळी नदीच्या पात्रात रोहनचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. मृतदेहाच्या डोक्याला, गळ्याला आणि पायाला गंभीर जखमा होत्या, ज्यावरून घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ताबडतोब दाखल झाले. पोलीस तपासात समोर आले की, रात्री २० मार्च रोजी किरणने रोहनला दारू पिण्यासाठी पाच हजार रुपये दिले. त्यानंतर…
साईमत / पुणे / प्रतिनिधी पुण्यातील उच्चभ्रू बाणेर परिसरात पोलिसांनी एक मोठे ड्रग रॅकेट उध्वस्त केले आहे. हळदीच्या पाकिटांमध्ये गांजा विकल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. बाणेर पोलीसांनी आरोपी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे यांना अटक केली असून, दोघांकडून एकूण 16 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावर सुरुवातीला तीन किलो गांजा ताब्यात घेतला गेला. चौकशीदरम्यान आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील आपल्या घरात अमली पदार्थ साठवले असल्याचे मान्य केले. यानंतर पोलिसांनी तातडीने छापेमारी करून 13 किलो गांजा जप्त केला. अटक केलेले दोन्ही आरोपी एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. तपासात असे…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)–नागपूर तसेच पुणे–नागपूर या मार्गांवर या विशेष सेवा चालवण्यात येणार असून जळगाव आणि भुसावळ स्थानकांवरही थांबे देण्यात आले आहेत. एलटीटी–नागपूर विशेष गाडी (क्र. ०१०२१) ही ३ एप्रिल रोजी पहाटे १२.५५ वाजता एलटीटी येथून सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. परतीची नागपूर–एलटीटी गाडी (क्र. ०१०२२) ही ३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता एलटीटी येथे येईल. या गाड्यांना ठाणे,…
२० मिनिटांत लेवा बोर्डिंगवरील कचरा हटवला, नागरिकांचे आभार साईमत जळगाव प्रतिनिधी शहराच्या मध्यवर्ती भागातील लेवा बोर्डिंग सभागृहाबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून महापौर दीपमाला काळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शनिवारी सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सभागृहाजवळील साफसफाई केली, मात्र गोळा केलेला कचरा सभागृहाच्या मुख्य दरवाजाजवळच ढिगाऱ्याच्या स्वरूपात ठेवून कर्मचारी निघून गेले. स्थानिक नागरिकांनी दुपारी १ वाजेपर्यंत कचरा उचलण्याची विनंती केली, तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उद्घाटनासाठी सभागृहात पोहोचताच महापौरांनी कचऱ्याचे साम्राज्य पाहून नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी परिस्थितीची माहिती दिली आणि महापौरांनी क्षणाचाही विलंब न लावता आरोग्य विभागाला कचरा उचलण्याचे आदेश दिले. महापौरांच्या तत्परतेनंतर आरोग्य विभागाने तातडीने कारवाई केली. अवघ्या अर्ध्या तासात महापालिकेचे कर्मचारी…
नग्न करून खांब्याला बांधून मारहाण, पत्नीचे अपहरण ५ आरोपी अटकेत गंभीर जखमी तरुण रुग्णालयात जिल्हाभरात संतापाची लाट साईमत भुसावळ प्रतिनिधी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणावर अमानुष अत्याचार करून त्याला नग्न अवस्थेत खांब्याला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. याच वेळी संबंधित तरुणाच्या पत्नीचे जबरदस्तीने अपहरण केल्याची संतापजनक बाब समोर आली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. चेतन दिलीप जंगले (वय २५, रा. खडका) याने शिरपूर कन्हाळा येथील एका तरुणीसोबत १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथील पंचवटी परिसरात प्रेमविवाह केला…
रेल्वे अपघातात गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्यास आईच्या नुकसानभरपाईव्यतिरिक्त ८ लाख रुपये स्वतंत्र द्यावे साईमत / अलाहाबाद / प्रतिनिधी अलाहाबाद उच्च न्यायालयाने गर्भातील बाळाच्या मृत्यूपर्यायी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, जर आईच्या गर्भात ५ महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळाचे बाळ असेल, तर त्याला जिवंत मुलासारखे मानले जावे. अशा परिस्थितीत, रेल्वे अपघातात गर्भातील बाळाचा मृत्यू झाला, तर रेल्वेला आईच्या नुकसानभरपाईव्यतिरिक्त वेगळी (स्वतंत्र) भरपाई द्यावी लागेल, असे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. ‘लाईव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, एका गर्भवती महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. आधी रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनल ने केवळ महिलेच्या मृत्यूसाठी भरपाई मंजूर केली होती, पण गर्भातील बाळासाठी…
साईमत / वृत्तसंस्था / प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणात त्यांनी इराणी जनतेला नवरोज आणि ईद या सणांच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी आशा व्यक्त केली की, या सणांच्या काळात पश्चिम आशियात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी नांदो. संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आखाती प्रदेशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील अलीकडील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मी या प्रदेशातील पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. यामुळे प्रादेशिक स्थिरतेला धोका निर्माण होईल आणि जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होईल.” याचवेळी पंतप्रधानांनी जागतिक व्यापारासाठी महत्वाच्या सागरी मार्गांचे संरक्षण करण्यावर भर दिला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेल…
राष्ट्रवादीकडे राहणार महिला आयोगाचे अध्यक्षपद? साईमत मुंबई प्रतिनिधी रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून आपला राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय व महिला अधिकार मंडळांमध्ये मोठी हलचाल उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यापाठीमागील पार्श्वभूमी म्हणून भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यावर सुरू असलेली गंभीर घोटाळ्यांची चर्चा व आरोप प्रमुख आहेत. फेब्रुवारी महिन्यात अशोक खरात यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर, त्यांच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो सोशल मीडियावर फिरू लागल्याने प्रकरणाची गंभीरता उघडकीस आली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीविषयीही प्रश्न उपस्थित झाले. विविध धार्मिक कार्यक्रमांत अशोक खरातसोबत दिसलेल्या फोटोच्या माध्यमातून विरोधकांनी चाकणकर यांना निशाणा साधला. वाढत्या राजकीय दबावामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे…
२४ मार्चपासून आरक्षण सुरु, तिकीट मिळवण्यासाठी रेल्वे संकेतस्थळ वापरा साईमत भुसावळ प्रतिनिधी मध्य रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून, आगामी ३ आणि ४ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर तसेच पुणे–नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर मार्गावरील विशेष गाडी क्र. ०१०२१ ही ३ एप्रिल रोजी रात्री १२.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. नागपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस परतीची गाडी क्र. ०१०२२ ३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल. या गाड्यांचे प्रमुख थांबे ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर,…