महिलांसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन लोकार्पित साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन शनिवारी (२१ मार्च) उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. सकाळी साडे-दहा वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातून झाली. त्यानंतर महापालिकेच्या प्रांगणातील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापती सिंधूताई कोल्हे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि इतर…
Author: saimat
“स्कार्फ अडकून ४५ वर्षीय कामगार महिलेची प्राणज्योत गेली” साईमत जळगाव प्रतिनिधी,: जळगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करत असताना ४५ वर्षीय जमुना रामकरण पाटील (रा. जामोद, जि. खंडवा, मध्य प्रदेश) या महिलेचा मशीनमध्ये स्कार्फ अडकल्यामुळे झालेल्या गंभीर जखमेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जमुना पाटील आणि त्यांचे पती रामकरण पाटील हे एमआयडीसीमधील ‘डी-६’ सेक्टरमधील आर.सी. फूड कंपनीत काम करीत होते. १७ मार्च रोजी नेहमीप्रमाणे काम करत असताना जमुना यांच्या गळ्यातील स्कार्फ अचानक मशीनमध्ये अडकला. स्कार्फसह त्यांच्या केसाही मशीनमध्ये ओढले गेले, ज्यामुळे त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जमुनाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात…
साईमत / धरणगाव / प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील बांभोरी-टाकरखेडा फाटा जवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, याप्रकरणी गुरूवारी, १९ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संदर्भानुसार, स्वप्निल दत्तात्रय निकम (वय ३८, रा. वाटिका आश्रम जवळ) हे १८ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून बांभोरी फाट्याकडे जात होते. या वेळी संशयित आरोपी अमोल लांडगे (रा. शिव कॉलनी) यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून स्वतंत्र फोरव्हीलर गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर स्वप्निल यांनी “तू धडक का दिली?” असे विचारले असता, आरोपी अमोल लांडगे यांनी गाडीतून…
साईमत / मुंबई / प्रतिनिधी मुंबई – जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम आता भारतातील इंधन दरांवर जाणवत आहे. तेल कंपन्यांनी आज प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत वाढ केली आहे, तर साध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही. यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना सध्या दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, इस्रायल-इराण संघर्षामुळे आखाती प्रदेशातील ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाल्याने जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. परिणामी बीपीसीएलच्या ‘स्पीड’, एचपीसीएलच्या ‘पॉवर’ आणि आयओसीएलच्या ‘XP95’ पेट्रोलच्या दरात २.०९ ते २.३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एचपीसीएलने पेट्रोल पंप मालकांना ‘पॉवर ९५’ मध्ये दरवाढ लागू करण्याची सूचना दिली आहे. तथापि, दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये…
साईमत / नंदुरबार / प्रतिनिधी नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तब्बल २० लाख ५० हजार १४८ रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. तपासात असे स्पष्ट झाले आहे की तत्कालीन तालुका कृषी अधिकारी व निवृत्त कृषी उपसंचालक वसंत धर्मराज चौधरी आणि कर सल्लागार राकेश भालचंद्र कोठावदे यांनी GST रक्कम संगनमताने अपहार केली. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून राकेश कोठावदे याला अटक करण्यात आली आहे. प्रशासनात या घोटाळ्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१८ ते २०२० दरम्यान वसंत चौधरी नवापूर तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या काळात मृद व जलसंधारण योजनेअंतर्गत…
साईमत / मुंबई / प्रतिनिधी मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून बांधकामासाठी खोदलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बांधकाम स्थळांवरील सुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दिव्यांश राजेश मौर्य (वय ८) असे मृत मुलाचे नाव आहे. तो आंबेवाडीतील चगन पटेल चाळीत राहात होता. घराबाहेर खेळत असताना त्याचा चेंडू जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या खड्ड्यात गेला. हा खड्डा पाण्याने भरलेला असल्याने चेंडू काढण्यासाठी गेलेल्या दिव्यांशचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. घटनेची माहिती मिळताच कुरार व्हिलेज पोलीस घटनास्थळी दाखल झाले.…
साईमत / पुणे / प्रतिनिधी खेड तालुक्यातील जैदवाडी गावच्या हद्दीत ३३ वर्षीय तरुणाचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील धनंजय मारुती घेवडे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो १६ मार्चपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असतानाच जैदवाडी परिसरात त्याचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून डोक्यावर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी सुकलेल्या रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. तसेच मृतदेहाजवळ त्याची दुचाकीही आढळली आहे. या घटनेवरून खून अत्यंत नियोजनपूर्वक आणि क्रूरपणे करण्यात आल्याचा…
साईमत / मुंबई / प्रतिनिधी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगावसह राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्यात अद्यापही अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाडा भागात हवेचा कमी…
ऑईलभरलेला ट्रक पलटला, दुचाकी बचावाने अपघात टळला साईमत /पाचोरा/ प्रतिनिधी पाचोरा शहरातील बायपास रोडवर आज दुपारी एका भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. भडगावकडून पहूरकडे जात असलेला ट्रक (MH 19 CX 4699) समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना पलटी झाली, मात्र मोठी जीवितहानी टळली. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक भरधाव वेगाने बायपासवरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक दुभाजकावरील इलेक्ट्रिक पोलला धडकला आणि विरुद्ध दिशेला पलटी झाली. ट्रकमध्ये ऑईल भरलेले असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती होती.घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परतेने हस्तक्षेप करून चालकाला सुरक्षित बाहेर काढले. त्याला किरकोळ दुखापत झाली असून सध्या त्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पाचोरा बायपास हा रस्त्यावर…
चैत्र शुद्ध प्रतिपदा : हजारो साधक-भक्तांसह भव्य स्वागत यात्रा साईमत /जळगाव/ प्रतिनिधी – चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू नववर्षाच्या शुभ अवसरानिमित्त जळगाव शहरात जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आयोजित स्वागत यात्रा भव्यतेने पार पडली. शहरातील प्रमुख मार्ग भगव्या रंगाने न्हालेल्या आणि हजारो साधक-भक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले. यात्रेचे आयोजन जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या वतीने करण्यात आले होते. चिमुकले राममंदिर येथून सुरू झालेल्या यात्रेने शिवाजी पुतळा चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चौबे शाळा, सुभाष चौक मार्गे ग्रामदैवत श्रीराम मंदिर रथ चौक येथे आपली सांगता केली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात्रेचे मनापासून स्वागत केले. यात्रेच्या प्रारंभी रथामध्ये गुरुपूजन…