Author: saimat

जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततामय आंदोलन ओबीसींच्या हक्कांसाठी आवाज साईमत  जळगांव  प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज भारत मुक्ती मोर्चा व पिछडावर्ग ओबीसी संघटनेतर्फे एक मोठा मोर्चा काढला गेला. मोर्च्यातील प्रमुख मागण्या ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या तातडीने आयोजनाची आणि २०११ पूर्वी शिक्षक भरती झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सोडण्याची होत्या. मोर्चाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम यांनी केले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना स्पष्ट केले की, ओबीसींच्या वास्तव आकडेवारीची जनगणना होत नसल्यामुळे समाजाच्या हक्कांचे न्यायसंगत वितरण होऊ शकत नाही. त्याचबरोबर, २०११ पूर्वी शिक्षक भरती झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेची अट लादली जात असल्याने ते शिक्षक असताना मिळालेल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेऊ शकत नाहीत,…

Read More

साईमत / नागपूर / प्रतिनिधी  राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी परिवहन मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून एसटी महामंडळाच्या ताफ्यात ३ हजार आत्याधुनिक स्मार्ट बसची भर घालण्यात येत आहे. या नवीन बसचे उद्घाटन २४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बस प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देणार आहेत. या बसमध्ये ३×२ आसनरचना असून एकूण ५६ आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्याच्या बसच्या तुलनेत १६ अतिरिक्त आसने उपलब्ध असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली, पॅनिक बटण, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांसारख्या…

Read More

साईमत / जळगाव / प्रतिनिधी देशातील एकूण कृषी लागवडीखालील क्षेत्र सुमारे १८०२ लाख हेक्टर असून खरीप, रब्बी, उन्हाळी हंगाम तसेच बारमाही व फलोत्पादन पिकांमध्ये भारत अग्रस्थानी आहे. जगात कृषी उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक म्हणून भारताची ओळख असली, तरी १४० कोटी लोकसंख्येची गरज भागविल्यानंतर निर्यातीसाठी उपलब्ध होणारा माल अत्यल्प आहे. याशिवाय, भारतीय शेतीमाल अनेकदा अमेरिका व युरोपच्या कठोर खाद्य निकषांवर उतरू शकत नसल्याने निर्यात मर्यादित राहते. दरम्यान, महाराष्ट्रात फलोत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली असून द्राक्षे, डाळिंब, केळी आणि हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. मात्र, अमेरिका–मध्यपूर्व तणाव आणि होर्मुज सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी,…

Read More

एक संशयित ताब्यात; पोलिसांचा तपास वेगात साईमत पाळधी  प्रतिनिधी  धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी पहाटे एका ३५ वर्षीय मजुराचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दारुड्यांमधील वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पिंटू आमशा बारेला (वय ३५, रा. बरेली, जि. बडवानी, मध्यप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो रेल्वे रुळांवर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी (दि. २३ मार्च) पहाटे सुमारे दीड वाजेच्या सुमारास रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाळधी स्थानकाजवळ एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत…

Read More

रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली; संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात, नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप साईमत जळगाव   प्रतिनिधी शहरातील जैनाबाद परिसरात अत्यंत किरकोळ कारणावरून घडलेल्या खूनाच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. केवळ ५०० रुपयांच्या वादातून झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीन नाना काळे (वय ३५) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी याने नितीन काळे याच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली होती. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. संतापाच्या भरात आरोपीने धारदार शस्त्राने नितीनवर अनेक वार केले. हे…

Read More

७९ हजारांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त, साकरीत सापळा साईमत भुसावळ  प्रतिनिधी तालुक्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बाबुराव माळी (वय ३५, रा. सिध्देश्वर नगर, वरणगाव) हा अॅक्टिव्हावर  क्र. एम.एच.१९ डी.डी.६९१२ वरून भुसावळकडून साकरीकडे अवैध दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यावरून पोलिस पथकाने साकरी गावाजवळ सापळा रचला. सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन आल्यावर पोलिसांनी थांबवून तपासणी केली. तपासणीत अॅक्टिव्हावर ठेवलेल्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात दारू सापडली. आरोपीकडे दारू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना…

Read More

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावर राज्य सरकारची कठोर कारवाई साईमत नाशिक प्रतिनिधी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून, दोषींवर नक्कीच कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. अशोक खरात याने दैवी शक्ती असल्याचा दावा करत अनेक महिलांची फसवणूक करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणामुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून, सरकारने तपासाला गती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मुख्य आरोपीला कोणत्याही परिस्थितीत वाचवले जाणार नाही.” ते पुढे म्हणाले की, सामाजिक दबावामुळे अनेक पीडित महिला पुढे येण्यास घाबरत…

Read More

साईमत / जळगाव / प्रतिनिधी युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून, ग्राहकांकडून सिलिंडर वेळेत मिळत नसल्याची तक्रार होत आहे. तसेच, काही घरगुती सिलिंडर व्यावसायिक कारणासाठी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाने धाडसत्र राबविले. गेल्या आठवडाभरात २८१ ठिकाणी धाडी टाकल्यानंतर घरगुती १९ सिलिंडरचा व्यावसायिक वापर स्पष्ट झाला असून, प्रशासनाने १८ हजार १३४ रुपये किमतीचे सिलिंडर जप्त केले आहेत. महसूल विभागाचे पथक ठिकठिकाणी हॉटेल, खानावळी व लहान व्यावसायिकांकडून घरगुती गॅसचा गैरवापर शोधत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने दि. १३ मार्चपासून गॅस कंपन्यांकडून उपलब्ध साठ्याचा दैनंदिन अहवाल घेणे सुरू केले असून, तीनही गॅस…

Read More

धुळे–सुरत महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवास बनला धोक्याचा, नागरिकांनी केला आवाज साईमत  नवापूर  प्रतिनिधी धुळे–सुरत महामार्गावरील पानबारा परिसरात आज सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. एमएच 06 बीई 3640 क्रमांकाची बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली, ज्यात पाच मजूर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जामोद येथील मजूरांना बडोद्याकडे कामासाठी घेऊन जात असलेल्या या बोलेरो गाडीचा अचानक एका खोल खड्ड्यात आदळून चालकाचे नियंत्रण सुटलं. अपघात इतका अचानक झाला की प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. जखमींची नावे: राजेश चिमण भोसले (वय 55),कृष्णा देवा पवार (वय 23),प्रतिमा पवार (वय 20),कल्पना भोसले (वय 40),वास्तव पवार (सर्व रा. जामोद, ता. साक्री) स्थानिक नागरिकांनी धाव…

Read More

८,९३१ दिवस सत्तेवर; पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडीत काढला; डिजिटल आणि राजकीय वर्चस्व कायम साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील कोणत्याही निवडून आलेल्या सरकारचे ‘सर्वाधिक काळ प्रमुख’ म्हणून पद भूषवणारे ते पहिले नेते ठरले आहेत. सत्तेच्या सर्वोच्च पदावर त्यांचे ८,९३१ दिवस पूर्ण झाले आहेत. मोदींच्या या कामगिरीमुळे सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग (८,९३० दिवस) यांचा विक्रम मोडीत काढला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे पंतप्रधान असा दोन्ही कार्यकाळ मिळून मोदींनी हा टप्पा गाठला असून, त्यांनी सत्ताप्रमुख म्हणून २५व्या वर्षात पदार्पण केले आहे. मोदींच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण…

Read More