Author: saimat

नागरिकांची मागणी प्रशासनाने तातडीने कचरा निर्मूलन केले पाहिजे साईमत / जळगाव / प्रतिनिधी शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य मार्ग आता ‘कचरा डेपो’मध्ये परिवर्तित झाल्याचे चित्र समोर आले आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुन्या जकात नाक्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ढिगारे टाकले गेले असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मेहरुण तलावाच्या निसर्गरम्य परिसरात स्थित हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणामुळे सुरकुत्या व अडथळ्यांपासून मुक्त झाला असला, तरी सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे त्याचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे. या मार्गावर अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, जैन हिल्ससारख्या महत्त्वाच्या संस्था तसेच अनेक मंगल कार्यालये असल्याने सतत वर्दळ राहते. पाचोरा, चाळीसगाव तसेच नाशिक-पुण्याकडे जाण्यासाठीही हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे.…

Read More

रात्रीच्या डंपरवर कारवाई, ग्रामस्थांचे समाधान व्यक्त साईमत /शिरसोली / प्रतिनिधी – तालुक्यातील शिरसोली ते कुऱ्हाडदा रस्त्यावर रात्री बेफाम अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरविरोधात सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने ठोस कारवाई केली. नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देत तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली आहे. शिरसोली परिसरातील ग्रामस्थांनी रात्री वाळू माफियांचे डंपर बेफामपणे धावत असल्याने झालेल्या त्रासाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या वाहतुकीमुळे नुसती झोप खंडित होत नाही तर नदीतील वाळू उपशामुळे खड्डे पडत असून महसूलही बुडत असल्याचे ग्रामस्थांनी तक्रार केली होती. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या तक्रारी गंभीरपणे घेत तहसीलदारांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी रात्री १० वाजता झुलेलाल वॉटर पार्कजवळ एका डंपरला शिरसोली…

Read More

नगरपालिकेच्या अग्निशमन दलामुळे आग आटोक्यात; मोठे नुकसान टळले साईमत /  भुसावळ  / प्रतिनिधी भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनसमोर रेल्वे रुळांच्या अगदी जवळ टाकण्यात आलेल्या कचऱ्याला अचानक आग लागल्याने आज परिसरात मोठी खळबळ उडाली. आग वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मते, रेल्वे रुळांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्यामुळे हा भाग आधीपासूनच धोकादायक होता. आज लागलेल्या आगीने कचऱ्याला अधिक भडकवले. सुदैवाने त्या वेळी कोणतीही रेल्वे गाडी त्या मार्गावरून जात नव्हती, अन्यथा मोठा अपघात होऊ शकला असता. आग लागल्यानंतर परिसरात दाट धूर पसरल्याने रस्त्याने…

Read More

‘देवदूत’ ठरलेल्या ओमच्या शिक्षणाची जबाबदारी जैन इरिगेशनकडे साईमत / चोपडा / प्रतिनिधी अनेर नदीत बुडणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय १४) या धाडसी मुलाच्या कार्याला समाजातून मोठी दाद मिळत आहे. ओमच्या या अतुलनीय धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने त्याच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. चोपडा तालुक्यातील गणपूर येथील चार मुलं अनेर नदीत आंघोळीसाठी उतरली होती. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. याचवेळी तेथून जात असलेल्या ओम पाटीलने क्षणाचाही विलंब न करता नदीतील डोहात उडी घेत चारही मुलांना सुरक्षित बाहेर काढले. स्वतःला…

Read More

३२ बॅनर हटवले आणि गाड्या जप्त रिंग रोड व आंबेडकर उद्यान परिसरात विशेष मोहीम साईमत / जळगाव / प्रतिनिधी – शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेने सोमवारी (दि. २३ मार्च) मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. शहरातील विविध भागांत राबविलेल्या या विशेष मोहिमेत अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासोबतच बेकायदेशीर बॅनर काढण्यात आले, तर काही गाड्या आणि काऊंटरही जप्त करण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या वतीने ह्या कारवाईत रिंग रोड परिसर, आंबेडकर उद्यान परिसर, कन्या शाळा परिसर आणि मुलींची आयटीआय परिसर यांचा समावेश होता. या ठिकाणी रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या आणि एक अनधिकृत काऊंटर जप्त करण्यात आला, ज्यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा कमी झाला. याशिवाय, शहरात विविध…

Read More

६६ वर्षीय वृद्धाचा कासोदा नाक्यावर ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू,  साईमत /एरंडोल  / प्रतिनिधी रविवारी दुपारी कासोदा नाक्यावर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मंगेश शिवदास पाटील (रा. पाटीलवाडा, एरंडोल) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. २२ मार्च रोजी दुपारी पाटील हे आपल्या मोटारसायकलने (क्र. एम एच १९ डीएक्स १०९४) शेताकडे जात होते. जळगावकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर ट्रकने (क्र. डीडी ०१५ ९१०३) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत पाटील यांना डोक्याला आणि हात-पायांना गंभीर दुखापत झाली, तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. घटनेनंतर स्थानिक नातेवाईक…

Read More

 समाजबांधवांचा मोठा सहभाग साईमत / जळगाव / प्रतिनिधी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी के.बी.एस. समाजमंदिर येथे उत्साहात पार पडली. या सभेत सर्वानुमते योगेश अनिल बागडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सभेची सुरुवात सचिव राहुल नेतलेकर यांनी प्रास्ताविक करून केली. त्यांनी मागील बैठकीच्या कार्यवाहीचे वाचन केले तसेच संस्थेचा वार्षिक अहवाल उपस्थितांसमोर सादर केला. कार्यक्रमात मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे यांसह विजय अभंगे, नरेश बागडे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, गणेश बागडे, वीर दहियेकर, गौतम बागडे, क्रांती बाटूंगे, संदीप बागडे, पंकज गागडे, कार्तिक बाटूंगे, सुमित माछरे, जयेश माछरे आदी समाजबांधव…

Read More

धूर उठताच चालकाने गाडी थांबवली; भीषण आग नियंत्रणात साईमत / वरणगाव  / प्रतिनिधी भरधाव आयशर मालवाहू गाडीत अचानक आग लागल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झाले, मात्र चालकाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना जळगाव-वरणगाव फॅक्टरी फाट्याजवळ घडली, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, दिपनगरहून मुक्ताईनगरकडे सिमेंटचे ब्लॉक नेणारी आयशर गाडी (क्र. एमएच ४८ एजी २२६८) लाल माती परिसरात पोहोचल्यावर अचानक धूर उठू लागला. चालक शाहेद खान यांनी परिस्थिती ओळखत गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली व स्वतः बाहेर पडत आपले जीव वाचवले. काही क्षणांतच भीषण आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे…

Read More

साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महत्त्वाचे भाषण करत भारताची भूमिका स्पष्ट केली. गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परदेशातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, होर्मुज सामुद्रधुनीत कोणताही अडथळा निर्माण होणे भारताला मान्य नाही. देशातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल, गॅस आणि खतांची आयात या मार्गावर अवलंबून असल्याने या मार्गातील अडथळ्यांचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे भारताने विविध देशांशी सातत्याने संपर्क ठेवत पर्यायी पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर दिला आहे. यासाठी आयात करणाऱ्या देशांची संख्या…

Read More

CEO कॅम्पबेल विल्सनच्या पत्रात सांगितले – मध्यपूर्वेतील संघर्षामुळे केवळ एअर इंडियाच नव्हे, तर संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रावर परिणाम; इंधन दर दुपटीने वाढले साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे एअर इंडियाने गेल्या तीन आठवड्यांत सुमारे २,५०० उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या या भागातील एअर इंडियाच्या नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत केवळ ३० टक्के उड्डाणे सुरू असल्याची माहिती CEO कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे. विल्सन यांनी नमूद केले की, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे केवळ एअर इंडियाच नव्हे, तर संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रावर आर्थिक परिणाम होत आहेत. विमान इंधनाचे दर दुपटीने वाढल्यामुळे कंपनीला आपली ७० टक्के उड्डाणे स्थगित करावी लागली…

Read More