माजी ‘रॉ’ प्रमुख ए. एस. दुलत म्हणतात, “इराण युद्ध हरणार नाही, भारताने योग्य भूमिका घेतली पाहिजे”; २० दिवसांतील संघर्षात २,०००+ जणांचा बळी साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी माजी भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ (R&AW) प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य करत, भारताने इराणच्या बाजूने उभे राहणे योग्य असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, “इराणने नेहमीच भारताच्या पाठीशी साथ दिली आहे, त्यामुळे आपणही इराणच्याच सोबत राहिले पाहिजे. हे युद्ध इराण हरणार नाही.” १. सध्याचे युद्ध आणि बळी: २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आखाती देशांमधील अमेरिकी लष्करी तळ आणि इतर…
Author: saimat
महापौरांच्या हस्ते विधीवत पूजन आणि महापुरुषांना अभिवादन साईमत /जळगाव / प्रतिनिधी मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून जळगाव शहर महानगरपालिकेच्या इतिहासात गुरुवारी, १९ मार्च रोजी प्रथमच भव्य गुढी उत्सव पार पडला. महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या सोहळ्यात भक्तीमय आणि सांस्कृतिक वातावरणाने मनपा परिसर सावरणारा ठरला. विधीवत पूजन आणि गुढी स्थापना सकाळी १० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रांगणात महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते विधीवत गुढी पूजन करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, सभागृह नेते नितीन लढ्ढा, भाजप गटनेते…
बैलगाडी चक्काचूर; वाकोद शेतकऱ्याचा पुनर्जन्म साईमत /जामनेर/ प्रतिनिधी जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाकोद येथे बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. पुण्याकडे जात असलेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत बैलगाडी चक्काचूर झाली, मात्र बैलगाडीवरील शेतकरी आश्चर्यकारकरीत्या बचावला. घटनेचे थरारक व्हिडीओ जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, जे पाहून अंगावर काटा येतो. मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वाजता जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी बस अतिवेगाने जात होती. वाकोद गावाजवळ, रस्त्याच्या कडेला एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन उभा होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने थेट बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.…
साईमत / अलिबाग / प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात २००४ साली घडलेल्या खूनप्रकरणातील तब्बल २१ वर्षे फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोयनाड पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पनवेल येथून मनोज अशोक पांडव याला अटक केली. घटनेनुसार, घेरासागरगड वडवली येथे आरोपी मनोज पांडव याची बकरी गणेश ठाकूर यांच्या आवारात मृतावस्थेत आढळली होती. ही बकरी प्रसाद ठाकूर यांनी मारल्याचा संशय मनोज पांडव याला होता. या कारणावरून त्याने न्यायालयातही तक्रार दाखल केली होती. या वादातून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. याच रागातून २ एप्रिल २००४ रोजी रात्रीच्या सुमारास मनोज पांडव याने प्रसाद ठाकूर यांना एकटे गाठून धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून केला. या…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर त्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला असून जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आजही परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १९ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज व्यक्त केला आहे. दुपारी ३ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये, अशा सूचनाही…
साईमत / भोपाळ / प्रतिनिधी भोपाळजवळील नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर मंगळवारी संध्याकाळी हृदयद्रावक घटना घडली. एका महिलेने आपल्या आठ वर्षांच्या मुलीला चालत्या रेल्वेसमोर ढकलल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गंभीर जखमी झालेली मुलगी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला सरकारी कर्मचारी असून ती माळखेडा परिसरात राहते. पतीच्या निधनानंतर तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. घटना घडण्यापूर्वी मायलेकी सुमारे तीन तास स्थानकावर थांबल्या होत्या. सायंकाळी सुमारे ७:४० वाजता तामिळनाडू एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येत असताना महिलेने अचानक मुलीला रुळावर ढकलले. मुलगी इंजिनला धडकून प्लॅटफॉर्म आणि रुळांच्या मधील जागेत अडकली. रेल्वे पुढे गेल्यानंतर उपस्थित प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ…
साईमत / मुंबई / प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून खालापूर ते पनवेल दरम्यान झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, पोलो कार अतिवेगात ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटला आणि कार पलटली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला असून वाहनातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारीही याच एक्सप्रेसवेवर चार ते पाच वाहनांच्या साखळी धडकेत तीन जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी…
मोबाईल लिंक हॅकिंग: शेतकऱ्याच्या खात्यातून लाखो रुपयांची चोरी साईमत /चाळीसगाव/ प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील रहिवासी महेश ईश्वर जामदार (वय ३१) यांचे बँक खाते अज्ञात सायबर चोरट्याने हॅक करून तब्बल ५ लाख ४९ हजार ४०१ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर जामदार यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून गुन्हा मंगळवारी १७ मार्च रोजी दुपारी ५ वाजता नोंदवण्यात आला. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या स्टेशन रोड शाखेत असलेल्या जामदार यांच्या बचत खात्याशी त्यांचा मोबाईल क्रमांक लिंक होता. २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या काळात अज्ञात चोरट्याने हा मोबाईल क्रमांक हॅक केला आणि त्याद्वारे बँक खात्याचा…
साईमत / पुणे / प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरात बुधवारी पहाटे एका भयानक अपघातामुळे एक तरुण ठार झाला. या अपघातानंतर पिकअप वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला, ज्यामुळे परिसरात चक्रीवादळासारखी खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर पिंपरी पेंढार गावाच्या हद्दीत सुमारे पाच वाजता हा अपघात घडला. ओतूरकडून आळेफाटाकडे जाणारी पिकअप (MH 14 HG 5686) आणि आळेफाट्याहून ओतूरकडे येणारी स्विफ्ट कार (MH 14 GY 2135) समोरासमोर जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. या अपघातात स्विफ्ट कारचालक अनिकेत (मयूर) नामदेव पानसरे (रा. ओतूर) यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी सांगितले की धडक इतकी जबरदस्त होती की त्यांना…
नागरिक त्रस्त, आरोग्यावरही धोकादायक परिणाम साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी: शहरातील खडका चौक परिसरातील कॉलन्यांमध्ये नागरिकांचे जीवन अक्षरशः कठीण बनले आहे. गॅलेक्सी हॉटेलच्या मागील भागातील आयान कॉलनी, जिया कॉलनी, अली रजा कॉलनी, फातिमा कॉलनी आणि हलीमा मस्जिद कॉलनीमध्ये कचरा, नाली आणि रस्त्यांच्या समस्येमुळे परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, अनेक वेळा भुसावळ नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन दिले असतानाही अद्याप मूलभूत समस्या कायम आहेत. घरगुती कचरा, प्लास्टिक, अन्नाचे उरलेले पदार्थ यांसारखा कचरा मोठ्या प्रमाणावर साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेची फिरती कचरा गाडी नियमित येत नसल्यामुळे नागरिकांना खुल्या जागेत कचरा टाकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. साचलेल्या कचऱ्यामुळे माशा, डास आणि इतर कीटकांचे प्रमाण वाढले…