पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा साईमत पाचोरा प्रतिनिधी: पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध समाजाभिमुख मागण्यांसाठी समता सैनिक दलाने आज प्रांताधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मोर्चाने प्रांताधिकारी कार्यालय गाठत उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनात नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, शहर अध्यक्ष गंगाराम तेली यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी या…
Author: saimat
मुस्लिम बहुल भागात मराठी वर्तमानपत्रांचे वाचनालय सुरू साईमत जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेतर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला गेला आहे. मुस्लिम बहुल वस्तीमध्ये मराठी वृत्तपत्रांचे वाचनालय सुरू करून सामाजिक व भाषिक एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. या वाचनालयात जळगाव शहरातून प्रकाशित होणारी सर्व प्रमुख मराठी वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दररोज सुमारे दहा विविध मराठी वृत्तपत्रे वाचकांसाठी उपलब्ध राहणार असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मराठी वाचनाची गोडी निर्माण होईल आणि माहिती व ज्ञानाचा नवा दरवाजा खुला होईल, असा उद्देश या उपक्रमामागे आहे. वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क अध्यक्ष ढोल-ताशांच्या…
कुसुंबा- जळगाव रस्त्यावर अपघात वृद्ध महिलेवर अज्ञात वाहनाची धडक साईमत जळगाव प्रतिनिधी शनिवारी, २८ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास जळगाव शहराजवळील कुसुंबा गावाजवळ एका भयानक रस्ते अपघातात ७० वर्षीय विमलबाई रूपचंद पाटील यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती अशी की, विमलबाई आपल्या कुटुंबियांसह कुसुंबा गावात वास्तव्य करत होत्या. सकाळी गावाजवळून जात असताना रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेने असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे विमलबाई गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळल्या. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिक सुरेश पाटील यांनी जखमी महिलांना तातडीने जळगाव येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच विमलबाईंच्या…
साईमत / मुंबई सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये गेल्या आठवड्यात चढ-उतार सुरु होते. रामनवमीच्या सुट्टीनंतर शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सोन्याचा भाव किंचित वाढला, तर चांदीची किंमत सुरुवातीच्या दिवसांमध्ये वाढल्यावर शेवटी घसरली. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती त्यांच्या पूर्वीच्या उच्चांकांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहेत. MCX वरील चांदीच्या वायदे दर चार ट्रेडिंग दिवसांत काही दिवस वाढले तर काही दिवस घसरले. शुक्रवारी, 5 मे रोजी चांदीचा भाव 2,27,750 रुपये प्रति किलोवर बंद झाला, आठवड्याच्या सुरुवातीच्या किंमतीच्या तुलनेत किंचित घसरण दिसली. चांदीच्या उच्च दराशी तुलना केली तर, MCX वर याचा आतापर्यंतचा उच्चांक ₹4,39,337 प्रति किलो होता. सध्याच्या दरापासून हा मौल्यवान धातू ₹2,11,578 प्रति किलोने स्वस्त झाला आहे. सोन्याच्या…
गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह तिघे जेरबंद साईमत जळगाव प्रतिनिधी: शहरातील अवैध शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारी कारवायांविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलीसांनी केलेल्या धाडसिक कारवाईत तिघे संशयित जेरबंद झाले. या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुस आणि एक महागडी दुचाकी जप्त केली आहे. एकूण जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांच्या आसपास आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता जळगाव-संभाजीनगर रोडवरील एअरपोर्ट समोरच्या नेस पार्कजवळ पोलीस गस्त घालत होते. यावेळी एका दुचाकीवरून तीन संशयित येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा दिला असता, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न…
साईमत / बुलढाणा / प्रतिनिधी जिल्ह्यात एका भीषण अपघातात दोन अल्पवयीन युवकांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात असलेल्या वाहनाचा अपघात झाला असून, कुटुंबातील या दोघांना जीव गमवावा लागला. अपघाताच्या वेळी वाहनामध्ये एकाच कुटुंबातील 23 भाविक प्रवास करत होते, ज्यापैकी 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील बागवान कुटुंब सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. मेहकर तालुक्यातील नांद्रा फाटा जवळ चालकाचे वाहन नियंत्रणाबाहेर गेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाची झोप लागल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता आहे. अपघातात जागीच मृत्यू झालेल्यांमध्ये अरमान शरीफ बागवान (वय 16) आणि रिहान सैदु बागवान (वय 17)…
साईमत / अहिल्यानगर राज्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच, अहिल्यानगर- जामखेड-कर्जत रोडवर शनिवारी एक भीषण अपघात घडला. नववी व दहावीत शिकणाऱ्या मित्रांची चारचाकी उलटली असून यात ७ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांनी जामखेडकडे जाऊन अकलूज वॉटर पार्कला भेट देण्याचा निर्णय घेतला होता. वाहन चालवणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्याने कार एका ठिकाणी उलटली आणि त्यानंतर एक ते दोन वेळा फिरली. अपघातातील सर्व विद्यार्थी हे नववी आणि दहावीतील मित्र असल्याचे समजते. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने हस्तक्षेप करून सर्व विद्यार्थ्यांना कारमधून बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने जामखेड रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांचे कुटुंबीय देखील…
एकाच दोरीवर गळफास घेत दुहेरी आत्महत्येची घटना साईमत चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर शिवारात एका शेतकरी दांपत्याने आपले जीवन संपवले, अशी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय २७) या दांपत्याने घराजवळील आपल्या शेतात एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन मृत्यू स्वीकारला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवापूर तांडा येथील जाधव दांपत्याने घरापासून अवघ्या ३०० फूट अंतरावर असलेल्या शेतातील उंबराच्या झाडाला दोरी बांधून हा टोकाचा निर्णय घेतला. शेतातच ही घटना घडली असली तरी, स्थानिकांनी तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दोघांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी…
साईमत / बाराबंकी (उत्तर प्रदेश) उत्तर प्रदेशमध्ये एका भयानक आणि निर्घृण घटनेमुळे समाज हादरला आहे. बाराबंकी जिल्ह्यातील सरयू नदीच्या पलीकडे वसलेल्या परसावल गावात शनिवारी दुपारी आईस्क्रीम खाल्ल्याचे पैसे मागितल्यावर संतप्त झालेल्या एका व्यक्तीने तरुणाची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, बेहटा गावातील बबलू राजभर (वय 26) हा आपल्या 12 वर्षांच्या चुलत भावासोबत घरापासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर परसावल गावात आईस्क्रीम विकायला गेला होता. तो माजरा नैपुरा परिसरात फिरून आईस्क्रीम विकत असताना, गावातील शंकर यादव (वय 52) यांनी 3 आईस्क्रीम खाल्ली. जेव्हा बबलूने त्याच्याकडून पैसे मागितले, तेव्हा शंकर यादव संतप्त झाले आणि त्याने जवळच्या घरातून विळा आणून बबलूवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात…
२२ टन कचरा हटवून महापौरांचा विक्रेत्यांना कडक इशारा साईमत जळगाव प्रतिनिधी: शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून सुरू असलेल्या विशेष स्वच्छता अभियानांतर्गत रविवारी (२९ मार्च) गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करत या मोहिमेला नेतृत्व दिल्याने प्रशासनासोबतच नागरिकांमध्येही मोठी जनजागृती निर्माण झाली. गोलाणी मार्केटमधील स्वच्छतेचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित होता. गाळेधारकांनी न्यायालयीन दाद घेतल्यामुळे स्वच्छतेच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापौरांनी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावत, “स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून दुकानदारांनीही…