महापालिकेवर सवाल; MPCB अधिकारी कॉल उचलले नाहीत साईमत जळगाव प्रतिनिधी: लक्ष्मी नारायण नगर कॉलनी आणि अयोध्या नगर परिसरात पुन्हा एकदा नाल्यात रासायनिक व ऑईलयुक्त पाणी सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना काही पहिल्याच प्रकाराची नसून मागील तीन वर्षांत चार-पाच वेळा अशाच प्रकारची घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये संताप, भीती आणि आरोग्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. नाल्यात सोडण्यात आलेल्या रासायनिक पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, पाण्याचा रंग बदललेला दिसतो. नाल्याजवळील हवा आणि पाणी दूषित झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा…
Author: saimat
शॉर्टसर्किटचा फटका बोदवडच्या जिनिंगमध्ये भीषण आग साईमत बोदवड प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील जामनेर रोड परिसरात असलेल्या अरिहंत जिनिंगमध्ये अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरिहंत जिनिंगमध्ये अचानक धूर व ज्वाळा उसळू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत जिनिंगमधील साठवून ठेवलेला कापूस पूर्णपणे जळून खाक झाला असून नुकसान…
साईमत / अयोध्या अयोध्या येथे शनिवारी शरयू नदीच्या तीरावर सुरू असलेल्या महायज्ञादरम्यान अचानक भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आगीच्या ज्वाळांनी काही क्षणांतच वेग घेत मंडप जळून खाक झाला. या घटनेमुळे उपस्थित भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. या महायज्ञासाठी सुमारे ५० हजार भाविक उपस्थित होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, यज्ञात आहुती म्हणून अर्पण केलेला नारळ अचानक फुटल्याने ठिणगी पडून आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही क्षणांतच आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि संपूर्ण मंडप…
गप्पांच्या मैफलीत घडली शोकांतिका कट्ट्याने घेतला बळी साईमत अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गावठी कट्टा हाताळताना झालेल्या मिसफायरमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अरुण महाजन असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील माळीवाडा परिसरात मंडप व्यवसाय करणारा अरुण महाजन हा आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. यावेळी त्याचा मित्र भूषण महाजन याने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्याबाबत माहिती देत असताना अचानक बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी थेट अरुणच्या छातीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर उपस्थित मित्रांनी तत्काळ अरुणला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही…
साईमत / मुंबई / प्रतिनिधी सण-उत्सवांच्या सुट्ट्यांमुळे पुढील आठवड्यात शेअर बाजाराच्या व्यवहारावर स्पष्ट परिणाम दिसून येणार आहे. National Stock Exchange (NSE) आणि Bombay Stock Exchange (BSE) हे दोन्ही प्रमुख शेअर बाजार महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी आणि Good Friday निमित्त ३ एप्रिल रोजी बंद राहणार आहेत. त्यानंतर शनिवार-रविवारी नियमित सुट्टी असल्याने सलग चार दिवस व्यवहार ठप्प राहणार आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीलाही Ram Navami निमित्त गुरुवारी बाजार बंद होता, त्यामुळे व्यवहाराच्या वेळेत घट झाली होती. परिणामी, गुंतवणूकदारांच्या व्यवहारांवर मर्यादा आल्या होत्या. दरम्यान, Multi Commodity Exchange of India (MCX) वर महावीर जयंतीदिवशी पूर्ण बंद राहणार नाही. सकाळचे सत्र बंद राहील, मात्र सायंकाळचे…
मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सची जोरदार धडक २९ प्रवासी जखमी साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी भीषण अपघात घडला. सुरतहून अमरावतीकडे प्रवासी घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने २९ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॅव्हल्स सुरत येथून अमरावतीकडे जात होती. दरम्यान, मुक्ताईनगरजवळील महामार्गावर एका ट्रकने काही कारणास्तव थांबले असताना ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने ट्रकला मागून धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅव्हल्समधील अनेक प्रवासी जागीच जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत…
साईमत / नाशिक / प्रतिनिधी चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त सप्तशृंगगड येथे होणाऱ्या यात्रेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने व्यापक नियोजन केले असून, एकूण २५० जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी निमाणी बसस्थानकातून दर १५ मिनिटांनी, तर नांदुरी पायथ्यापासून दर ५ मिनिटांनी गडाकडे बस सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक या धार्मिक सोहळ्यासाठी गडावर येत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने विशेष व्यवस्था केली आहे. ३ एप्रिलपर्यंत ही अतिरिक्त बससेवा सुरू राहणार असून, निमाणी, नांदुरी पायथा आणि गड वाहनतळ येथे यात्रा वाहतूक केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच मालेगाव, मनमाड, सटाणा आणि नांदगाव येथूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.…
साईमत / यवतमाळ/ प्रतिनिधी पुसद शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात अवैधरीत्या गॅस सिलिंडर साठवून त्यांची व्यावसायिक विक्री करणाऱ्या प्रकरणावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत २१ गॅस सिलिंडर जप्त केले. या कारवाईत सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मधुकरलाल जाट यांच्या निवासस्थानी घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलिंडर बेकायदेशीररीत्या साठवून ते व्यावसायिक वापरासाठी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. यावेळी १९ किलो वजनाचे १९ आणि पाच किलोचे २ असे एकूण २१ सिलिंडर जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान संबंधित व्यक्तीकडे आवश्यक परवानग्या व कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी सिलिंडर जप्त करून…
साप्ताहिक विशेष गाडी आता ११ जुलै (बिकानेर–शिर्डी) व १२ जुलै (शिर्डी–बिकानेर) २०२६ पर्यंत चालणार साईमत / जळगांव / प्रतिनिधी देशभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या आणि राजस्थानकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेचा कालावधी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांसह व्यावसायिक, पर्यटक आणि विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. शिर्डी हे देशातील अत्यंत महत्त्वाचे धार्मिक तीर्थक्षेत्र असून, येथे दरवर्षी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. सुट्ट्यांच्या काळात, सणासुदीच्या दिवसांत आणि गुरुवार-शनिवार या दिवशी गर्दी अधिक वाढते. अशा परिस्थितीत साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष गाडी भाविकांसाठी अत्यंत सोयीची ठरते. याशिवाय, राजस्थानातील…
साईमत / मुंबई / प्रतिनिधी अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी १० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम तेल कंपन्या आणि केंद्र सरकार स्वतः सहन करत असल्यामुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. त्यामुळे इंधन दरांमध्ये अनावश्यक वाढ होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात पेट्रोल पंपांवर लागलेल्या रांगांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या कोणतीही टंचाई नाही. भारताकडे सुमारे एका महिन्याचा…