साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत मोठी फूट पाडली आहे. अद्यापही शिवसेनेत मोठी गळती सुरु आहे. यापार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आपले खरे गुरू आहेत. त्यांच्या विचारच्या प्रेरणेने आपण वाटचाल करीत आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेनेत फूट पाडली, असे कोणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊनच पुढील कार्य करीत आहोत, असे वक्तव्य पाटील यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे गुलाबराव पाटील नतमस्तक झाले.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे खरे दैवत आहेत. त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत…
Author: Saimat
साईमत लाईव्ह फैजपूर प्रतिनिधी परमेश्वर हा परमेश्वरच आहे. आपण गुरूंच्या आहारी एवढे जाऊ नका की परमेश्वरचा विसर पडेल. विवेक पूर्ण जीवन जगण्यासाठी आत्मचिंतन करणे म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणे आहे असा मौलिक संदेश सतपंथ संस्थानचे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आशीर्वचन देताना सांगितले. मी आणि माझे इष्ट एकच आहे हा भाव म्हणजे गुरुभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. संसारिक जीवनात आपण जे काही काम कराल ते मनापासून करा. गुरु गीता ही मा पार्वतीने भगवान शंकरांना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा सार आहे. संसारिक जीवनात पती-पत्नीच्या संवादातून वाद न होता गुरुगीते सारखे अमृत निर्माण होणे आवश्यक आहे. गुरु गीता ही गुरु शिष्याचे संबंध,…
साईमत लाईव्ह जामनेर,प्रतिनिधी जामनेर (Jamner) तालुक्यातील पहुर विभागातील जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख भानुदास तायडे यांच्या वादग्रस्त भुमिके वरून पहुर येथील जिल्हा परिषद शाळेतल्या ४२ शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी गट शिक्षण अधिकारी रामकृष्ण लोहार पं.स.जामनेर यांच्या कडे दि.१७ जुन २०२२ रोजी ४२ शिक्षकांचे स्वाक्षरी असलेले तक्रार अर्ज दिला होता. त्यात शिक्षकांच्या मांगण्या होत्या कि पहुर जिल्हा परिषद शाळेतल्या केंद्र प्रमुख भानुदास रामशंकर तायडे यांची तात्काळ बदली करावी अन्यथा पहुर केंद्रातील आम्ही सर्व ४२ शिक्षकांची तात्काळ बदली करावी. कारण या आधी मागील सहा महिन्यापुर्वी दि.१६ जानेवारी २०२२ रोजी गट शिक्षण अधिकारी पं.स.जामनेर आणि १४ मार्च २०२२ रोजी शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव…
जळगाव : प्रतिनिधी शिवाजी नगरातील मुख्य रस्त्यावर रस्त्यांपेक्षा खड्डेजास्त झाल्याने पावसाळ्याच्या पाण्यामुळे हे खड्डे पूर्णपणे पाण्याने भरुन जात असल्याने येथून जाणारे येणारे नागरिक याठिकाणी खड्ड्यात पडत आहे. त्यामुळे आज सकाळी 10 वाजेपासून छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळाने येथील रस्त्यावर ठिय्या देवून प्रशासनाला बोलविण्याची विनंती पोलिस अधिकाऱ्यांनी केली. या परिसरातील खड्ड्याबाबत छत्रपती शिवाजी नगरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी महानगरपालिका प्रशासन व खा.उन्मेशदादा पाटील, आ.राजुमामा भोळे तर स्थानिक नगरसेवकांनाही निवेदने देवून पाठपुरावा केला परंतु कुठलीही याठिकाणी उपाययोजना होत नाही तर फक्त आश्वासन येथील नागरिकांना भेटत असल्याचाही आरोप येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे. सकाळी 10 वाजेपासून हे आंदोलन नागरिकांनी सुरु केले होते.…
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागातील नागरिक गटारी व रस्त्यामुळे खूप वैतागले आहे.या भागातल्या नगरसेवकांनी सुद्धा गेल्या पाच वर्षात गटारी आणि रस्त्याचे काम करू शकले नाही.याची नागरिकांना खंत व्यक्त करावी वाटत आहे.पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागांत कामगार कल्याण केंद्रा पासून तर पंचमुखी हनुमान चौक व परधाडे रोड या भागात रस्त्यावर वाहन चालवणे मुस्किल होईल इतके मोठे खंडे पडलेले आहे. काही भागात गटारी सुद्धा बांधण्यात आलेल्या नाही. तसेच या भागात गटारी काढण्यासाठी १५-१५ दिवस नगरपालिकेचे कर्मचारी येत नाही.फवारणी मारणारे येत नाही. या मुळे डास मच्छर यांचे खुप मोठे प्रमाण वाढले आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे अनेकांच्या घरात कोण्ही ना कोण्ही आजारी…
यावल : प्रतिनिधी साईमत लाईव्ह पहूर येथून औरंगाबादकडे जाताना महामार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे याकडे संपूर्ण शासकीय यंत्रणेचे राजकीय नेत्यांचे विविध संघटनांचे समाजसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रवासी वाहनधारकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भुसावळ जामनेर मार्गे तसेच जळगाव पहूर मार्गे औरंगाबाद जाताना पहूर गावाच्या पुढे अनेक ठिकाणी महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकी चार चाकी वाहने चालविणे अशक्य आणि जिकरीचे झाले आहे. या महामार्गाचे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम अत्यंत कासव गतीने सुरू आहे,महामार्गावरील प्रवासी वाहनधारक आणि इतर अवजड़ वाहतूकदारांच्या सुविधांकडे संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचे दुर्लक्ष होत असून महामार्गावर एखाद्या वेळेस मोठी अप्रिय घटना घडण्याचे…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. सत्ता पालटल्यानंतर भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांचे पुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने मोठी खेळी खेळात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पाडली. आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजपने मंत्रिपदाची ऑफर देऊ केली आहे. अमित यांना मंत्री करण्याचा निर्णय हा शिवसेनेतील ठाकरे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्याचा भाजपचा आणखी एक प्रयत्न असू शकतो.भाजपाने नुकतेच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले तर…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी प्रभाग क्रमांक 3 सह शहरवासीयांना त्रासदायक ठरत असणाऱ्या हॉटेल दयानंद ते खरजई नाका रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होत होती. तसेच चाळीसगाव शहरात भुयारी गटार योजनेच्या कामामुळे काळी माती वर आल्याने अनेक प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली होती. नुकताच राज्यात सत्ता बदल झाल्याने शहरासाठी भरीव निधी आणण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी प्रयत्न सुरु केले असून पहिल्या टप्प्यात लवकरच ५ कोटींच्या कामांना मंजुरी मिळणार आहे मात्र सातत्याने चाळीसगाव तालुक्यात सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांची तात्पुरती का होईना तातडीने दुरुस्ती आवश्यक होती. यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून स्वखर्चाने दयानंद ते खरजई नाका रस्त्यासह…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी राज्यात पावसाचा जोर आजही कायम पहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील 48 तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात काही भागांत अतिवष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (14 जुलै 2022) राज्यातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे. 14 जुलैचं हवामान अंदाज रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे ऑरेंज अलर्ट – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर यल्लो अलर्ट -…