साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागातील नागरिक गटारी व रस्त्यामुळे खूप वैतागले आहे.या भागातल्या नगरसेवकांनी सुद्धा गेल्या पाच वर्षात गटारी आणि रस्त्याचे काम करू शकले नाही.याची नागरिकांना खंत व्यक्त करावी वाटत आहे.पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागांत कामगार कल्याण केंद्रा पासून तर पंचमुखी हनुमान चौक व परधाडे रोड या भागात रस्त्यावर वाहन चालवणे मुस्किल होईल इतके मोठे खंडे पडलेले आहे. काही भागात गटारी सुद्धा बांधण्यात आलेल्या नाही. तसेच या भागात गटारी काढण्यासाठी १५-१५ दिवस नगरपालिकेचे कर्मचारी येत नाही.फवारणी मारणारे येत नाही.
या मुळे डास मच्छर यांचे खुप मोठे प्रमाण वाढले आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे अनेकांच्या घरात कोण्ही ना कोण्ही आजारी आहे.या भागात आ किशोर पाटील यांनी विकासाच्या नावावर मतदान घेतले आहे.निवडणुकीत जो विश्वास दाखवला होता.त्या विश्वासाने काही कामे केली नाही संपूर्ण मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचे विकास कामे झाले आहे.मग या भागात गेल्या ५ वर्षात रस्ते व गटारीच्या कामांचा काही विकास झाला नाही .?.आता नगरपालिका निवडणुका जवळ येत आहे.गेल्या पाच वर्षांपासून रस्ते व गटारीचे कामे केलीत नाही.आणि निवडणुकीच्या तोंडावर रस्ता मजूर झाला आहे.
हे टेंडर निघाले आहे. रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.असे सांगितल जात मग पाच वर्ष झोपले होते का.?असा प्रश्न या भागात उपस्थित होत आहे. आता पावसामुळे रस्त्याची अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे.खडे मुरूम टाकून बुजले पाहिजे पण त्या खड्यामध्ये मुरूम सुद्धा टाकायला नगरपालिका कडे पैसे नसतील का.? या बाबत माजी नगरसेवक प्रकाश एकनाथ चौधरी यांनी स्वता अनेक महिला पुरुष अश्या नागरिकांच्या सह्या घेऊन नगरपालिका प्रशासनाला लेखी स्वरूपात तक्रार केली आहे.तरी सुद्धा नगरपालिक
केने दखल घेतली नाही.इतक्या बेशिस्त पणे नगरपालिकेचे कामकाज सुरू आहे.रस्त्याच्या खड्या मुळे जर मोठा अपघात झाला तर याला नगरपालिका जबाबदार असेल.याची नगरपालिकेने नोंद घावी