साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचन योजना व सोयगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सिल्लोड – सोयगाव मतदारसंघाच्या विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भरघोस निधी मंजूर करून दिला. मुख्यमंत्री होताच त्यांनी विधिज्ञांची फौज उभी करून ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिला. त्यामुळे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सिल्लोड येथे 31 जुलै रविवार रोजी भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला असून या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी तालुक्यातील प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे केले. सिल्लोड येथे होणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार व विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त सोयगाव येथे आयोजित पूर्वतयारी बाबत आढावा बैठकीत…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात तरसोद येथील व्यक्ती कामावर जात असताना अपघातात ठार झाल्याची घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी की, जळगाव – भुसावळ महामार्गावर असलेल्या गौरव हॉटेलपासून ते चौपदरीकरण झालेल्या हायवेपर्यंतचा रस्ता हा खूप अरूंद असल्याने यावर कायम लहानमोठे अपघात होत असतात. याच प्रकारे रात्री एका मोटारसायकलस्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहे. तरसोद येथील रामचंद्र चिंधू कुंभार हे रेमंड कंपनीत कामाला असून ते रात्री साडेदहाच्या सुमारास ड्युटीवर जात होते. महामार्गावरील चांडक हॉस्पीटलच्या परिसरात ते एका ट्रकच्या मागील चाकात असल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी…
यावल : तालुका प्रतिनिधी डांभुर्णी येथील रहिवाशी अर्चना राजेंद्र कोळी वय 33 यांनी आज बुधवार दि.27 रोजी दुपारी 15:30 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की,अर्चना कोळीचे माहेर हे सुरतचे असून डांभुर्णी येथे ती 16/17 वर्षांपासून लग्न होऊन आली होती.घरातील सर्व परिवार व कुंटूंबाची संपूर्ण जबाबदारी ती पर पाडत होती.सासरी ती सुखी समाधानी आनंदी होती.मात्र तीने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेने हे कुटुंब उघडे पडले आहे.आज दुपारी अर्चना ही घरात एकटी असतांना तिचे सासरे व पती हे कामानिमित्त बाहेर गेले होते व त्यांची मुले शाळेत गेलेले असतांना आपल्या घरात गळफास घेत तीने आपली…
मेष (Aries) मंगल कार्यांसाठी गुरुवार शुभ असेल. तुमचं मन प्रसन्न होईल. बर्याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणे फायद्याचे ठरेल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होऊ शकते. दिवस चांगल्या बातमीने प्रारंभ होणार आहे. वृषभ (Taurus) दिवस अतिशय खास बनविण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, मन प्रसन्न होईल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही नवीन काम सापडेल. मिथुन (Gemini) तुमचा दिवस चांगला सुरू होणार आहे. तुम्हाला व्यवसायात देखील फायदा होणार आहे. याशिवाय नोकरीत पदोन्नती मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल, एकमेकांशी चांगला वेळ घालवाल. कर्क (Cancer) शिक्षण घेण्याऱ्यांसाठी बुधवार चांगला दिवस आहे.…
पिंपळगाव बु. : प्रतिनिधी पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या जामनेर तालुका उपाध्यक्षपदी संतोष रामा पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी ही नियुक्ती केली असून यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र संतोष पांढरे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. संतोष पांढरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत उत्तर महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष दीपक वाघ, औरंगाबादचे विभागीय सचिव प्रवीण तायडे, जळगाव जिल्हाध्यक्ष विष्णू मोरे यांच्या शिफारशीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. पांढरे यांच्या निवडीबद्दल लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी दिनांक २६/०७/२०२२ रोजी फर्दापुर पोलीस ठाणेचे सपोनि / डी बी वाघमोडे यांना त्याचे गुप्तबातमीदार मार्फत माहीती मिळाली की, फर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रवळा शिवारातील गट क्रमांक ०९ मध्ये गांजा सारखी झाडे आहेत. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी पोलीस पथकासह व राजपत्रीत अधिकारी, कृषी पदविकाधारक अधिकारी असे जाऊन सदर शेताची पाहणी केली असता शेतात असलेला शेतकरी रामचंद्र दादा शिंदे रवळा यास मिळालेल्या माहीतीची थोडक्यात हकिगत सांगीतली. सदर शेताची सर्वांनी पाहणी केली असता इसम शेतकरी रामचंद्र दादा शिंदे याचे मालकीचे शेतात केळी पिकाच्या मधोमध गांजासारखी दोन झाडे दिसुन आली. इसम शेतकरी रामचंद्र दादा शिंदे…
भुसावळ – जळगाव येथील अशोक नगर मधील रहिवाशी व भुसावळ औष्णिक विद्युत वेंâद्र दीपनगरातील सेवानिवृत्त असिस्टंन इंजिनिअर खेमचंद मन्साराम भंगाळे (वय -८८) यांचे २७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सूना व नातवंडे असा परिवार आहे. ते भुसावळ येथील श्रीशिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ व के. एन.टी.सी.आय. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद एन. नारखेडे यांचे सासरे होत.
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी देश, विदेशातील पर्यटक भारतात येतात. पावसाळ्यामधील निसर्गरम्य वातावरण व हिरवाईने नटलेली जगप्रसिद्ध लेणी व त्यावर निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू,त्यातच नयनरम्य छोटे-मोठे धबधबे हे बघण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक हे लेणी बघण्यासाठी पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्या परिवारासह आनंद घेण्यासाठी येतात.या पर्यटकांना आकर्षण असलेला लेणीजवळील वनविभागाअंतर्गत सप्तकुंड धबधबा हा पाहता येत नाही याचे कारण असे की, वनविभागाच्या बेजबाबदार कर्मचाऱ्याच्या सतत गैरहजेरीमुळे गेल्या चार वर्षापासून तो बंद आहे. सप्तकुंड मधून तापी खो-याला मिळणा-या वाघुर नदीचा उगम होतो अशा ह्या उगमस्थान असणा-या या वाघुर नदीच्या उगम सप्तकुंड बघण्यासाठी पर्यटकांचा गेल्या चार वर्षापासून…
साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथे महावितरणने सक्तीच्या वसुलीने चांगलाच कहर केला असून महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक दृष्ट्या बेजबाबदारपनाच्या वागणुकीमुळे ग्रामस्थांनि तीव्र नाराजी व्यक्त केली, त्यामुळे महावीरणच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. गावात अनेक ठिकाणी कुठलीच पूर्व सूचना न देता व घरी कोणीच नसतांना सुद्धा विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. तसेच विद्युत वितरण कंपनीकडून नागरिकांना जाणून बुजून त्रास दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे , घरांचे व अन्य ठिकाणी वापर असलेल्या विद्युत पुरवठाचे महिन्याचे बिल थकीत असले तरी ग्राहकाला कुठलीच सूचना नदेता वीज कनेक्शन कट करण्याचा प्रकार व गोरगरिबांना वेटीस धरण्याचा प्रकार सुरू आहे…
भुसावळ – कै गीताबाई काशिनाथ बानाईत यांचे दि २७/०७/२०२२ राजे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याची अंतयात्रा दि २७/०७/२०२२ रोजी संध्याकाळी ८.३० वाजता राहत्या घरून फेकरी, भुसावल ता. जि. जलगांव येथून निघेल. ते गजानन काशिनाथ बानाईत यांच्या आई होत्या.