Author: saimat

मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यातील शिराढोण येथील भारतीय सैन्यदलात सैनिक म्हणून तुषार वसंत ईखारे मागील कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे. ते घरी सुट्टीवर आले होते. ध्वजारोहणाच्या दिवशी सरपंच आणि उपसरपंच यांनी जातीय द्वेष भावनेतून भारतीय सैनिकाला आमंत्रित न करताच ध्वजारोहण केले. त्यामुळे भारतीय जवान मागासवर्गीय असल्याने ध्वजारोहणापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सर्व पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. जेणेकरून यापुढे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोणत्याही भारतीय सैन्याचा अवमान होणार नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. निष्ठापूर्वक देशाची सेवा करीत भारतीय सैनिक तुषार वसंत ईखारे हे शिराढोण येथे रजेवर आले होते. १५ ऑगस्ट रोजी शिराढोण गावात ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. शिराढोण…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी सहकार महर्षी व शिक्षण महर्षी स्व.दादासाहेब जे.टी.महाजन यांना ९९ व्या जयंतीनिमित्त परिसरातील मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम सकाळी त्यांच्या राहत्या घरी न्हावी गावातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. त्यानंतर न्हावी ग्रामपंचायतीच्या सभागृहात शरद महाजन, सरपंच देवेंद्र चोपडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांतर्फे दादासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. जे.टी.महाजन फ्रूट सेल सोसायटीच्या आवारातील अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर जे.टी.महाजन कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या आवारातील दादासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यांची होती उपस्थिती यावेळी संस्थाध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, आ. शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, माजी आ. अरुण…

Read More

यावल : प्रतिनिधी येथील नगरपालिकेपासून अर्धा किलोमीटर अंतरावरील शिवाजीनगर, व्यास मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ढापा तुटल्याने दुचाकी, चार चाकी वाहनांसह इतर नागरिकांना येण्याजाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणी चार चाकी गाड्या आणि रिक्षा रस्त्यावरील तुटलेल्या ढाप्यात अडकून वाहनाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे यावल नगरपालिकेने याठिकाणी नवीन ढापा टाकण्याचे बांधकाम तात्काळ करावे, अशी मागणी शिवाजीनगरमधील व इतर नागरिकांनी यावल नगरपरिषदेकडे केली आहे. ढापाचे बांधकाम तात्काळ न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशा आशयाचे निवेदन गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी यावल नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. यावल नगरपालिका ढाप्याचे बांधकाम केव्हा करणार, याकडे शिवाजीनगरमधील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवाजीनगरमधील मुख्य…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी शहरातील नागरिकांकडून नगर परिषद ३६५ दिवसांची पाणीपट्टी वसुली करते. प्रत्यक्षात मात्र, महिन्यातून दोन ते तीनच वेळा असे किमान २०० दिवसच पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरवासियांना पाणीटंचाईच्या यातना सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहराला तापी नदी पात्रातील पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, तापी नदी पात्रात पाण्याचा मुबलक प्रमाणात जलसाठा असतानांही शहरवासियांना १२ ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईच्या यातना सहन कराव्या लागत आहेत. १५ दिवसानंतर होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करावी लागत आहे. त्यामुळे साठविलेल्या पाण्यात जंतुचा प्रार्दुभाव निर्माण होत आहे. मात्र, या…

Read More

चंदीगड : पत्नीची साडी चोरली म्हणून एकाने शेजाऱ्याची गोळी झाडून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ही घटना उघडकीस आली आहे. यात साडी चोरीच्या संशयामुळं सिक्युरीटी गार्डने शेजाऱ्याची गोळी झाडून हत्या केली आहे. मयतदेखील सिक्युरिटी गार्ड होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण हा मुळचा बिहारचा असून त्याचे नाव पिंटू कुमार असं आहे. ज्या इमारतीत पिंटू राहत होत्या त्याच्या बाजूच्यात खोलीत उत्तर प्रदेशचा अजय कुमार (४२) त्याची पत्नी रीनासोबत राहत होता. पिंटू आणि अजय दोघही सिक्युरिटी गार्डम्हणून काम करत होते. साडी चोरल्याच्या संशय १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली…

Read More

नवी दिल्ली : जय श्रीराम चे नारे दिल्याने अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकांनी मारहाण केली. ही घटना ग्रेटर नोएडा या ठिकाणी एका शाळेत घडली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी या प्रकरणी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी हा आरोप केला आहे की पीटी शिक्षकांनी आमच्या मुलाला जय श्रीरामचे नारे दिल्याने मारहाण केली. एवढंच नाही तर आम्ही जेव्हा संचालकांकडे दाद मागायला गेलो तेव्हा त्यांनी तुमच्या मुलाचं नाव महाविद्यालयातून काढून टाकू अशी धमकीही आम्हाला दिली असाही आरोप सदर मुलाच्या पालकांनी केला. याबाबत मिळालेली माहिती अशी की शाळेत स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ११ वीत शिकणाऱ्या मुलाने…

Read More

श्रीनगर : मुस्लीम आधी हिंदूच होते, धर्मांतरानंतर ते मुस्लीम झाले, असे वादग्रस्त वक्तव्य डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. डोडा जिल्ह्यात एका मेळाव्यात संबोधित करताना ते बोलत होते. डोडा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात गुलाम नबी आझाद म्हणाले की, “आमच्याकडे काश्मीरचे उदाहरण आहे, ६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये एकही मुस्लिम नव्हता, काश्मिरी पंडितांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले होते. केवळ भारतातच नाही तर जगभर मुस्लिम धर्म स्वीकारला गेला. इस्लाम १५०० वर्षे जुना आहे, पण हिंदू धर्म त्याहून जुना आहे.” गुलाम नबी आझाद म्हणाले, “आम्ही हे राज्य हिंदू, मुस्लिम, दलित, काश्मिरींसाठी बनवले आहे. ही आमची भूमी आहे, इथे बाहेरून…

Read More

मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ‘इंडिया’ आणि ‘एनडीए’ आघाडीकडून विविध ठिकाणी बैठका घेतल्या जात आहे. संबंधित बैठकीतून लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. यापूर्वी बिहारमधील पाटणा आणि कर्नाटकमधील बंगळुरू येथे विरोधी पक्षाच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. या दोन्ही बैठकांमध्ये विरोधी पक्षाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. बंगळुरू येथील बैठकीतून विरोधी पक्षाच्या आघाडीचं नामकरण ‘इंडिया’ असं करण्यात आलं. यानंतर एनडीएकडूनही बैठका घेण्यात आल्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा…

Read More

शिर्डी : काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. याचे पडसाद थेट विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पडले. विरोधी पक्षांनी संभाजी भिडेंच्या अटकेचीही मागणी केली. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच महामानवांबद्दलच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतला. ते गुरुवारी (१७ ऑगस्ट) अहमदनगरमधील शिर्डी येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते. अजित पवार म्हणाले, “आपल्या सर्वांचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही सगळी महामानवं…

Read More

बारामती : घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची, वडील अशिक्षित असल्याने गवंडी कामगार. मात्र, शिक्षणाची आवड, मनात जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवल्याने बारामतीतील शंकर रामचंद्र चव्हाण हा युवक आता थेट अमेरिकेत उच्च शिक्षण घेणार आहे. शंकर हा आयआयटी गुवाहाटीमधून पदवी घेऊन एम.एस. या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना होत आहे. अनेक मुलांमध्ये आदर्श निर्माण करेल अशीच शंकरची कहाणी आहे. तेलंगणा राज्यातून उपजीविकेसाठी रामचंद्र चव्हाण हे बारामतीत कामानिमित्त स्थायिक झाले. बारामतीमध्ये ते गवंडी काम करू लागले. गवंडीकाम करता करता त्यांनी मुलगा शंकर याला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. आपण स्वतः अशिक्षित आहोत परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे…

Read More