साईमत / जळगाव महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून तब्बल २२ वर्षांनंतर निवासस्थानाच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घरांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक प्रशस्त आणि आधुनिक सोयींनी युक्त निवासस्थान उपलब्ध होणार आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या निवासस्थानांसाठीचे नियम अद्ययावत करताना बदललेले राहणीमान, वाढत्या गरजा आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा विचार करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार घरांच्या क्षेत्रफळात १०० ते ७०० चौरस फूटांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा विषय गांभीर्याने घेत समितीची स्थापना केली होती. या समितीने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा आधार घेत…
Author: saimat
उजव्या कालव्याजवळ आढळला गळा चिरलेला मृतदेह साईमत चोपडा प्रतिनिधी : शहरातील नारायण नगर परिसरालगत असलेल्या हातनूरच्या उजव्या कालव्याजवळ आज सकाळी एका युवकाचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रदीप राजू माळी असे मृत युवकाचे नाव असून, त्याची निर्घृण हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी स्थानिक नागरिकांना कालव्याच्या काठावर संशयास्पद अवस्थेत एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाची स्थिती पाहता हा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून…
शुद्ध पाण्यासाठी जळगाव महापालिकेत ‘ऑन-ग्राउंड अॅक्शन’ची नवी दिशा साईमत जळगाव प्रतिनिधी : शहरात पावसाळ्यापूर्व स्वच्छता अभियानाला गती देत महापौर दीपमाला काळे यांनी प्रत्यक्ष कृतीतून प्रशासनाला नवा संदेश दिला आहे. भाऊंच्या उद्यान परिसरातील महाकाय जलकुंभाची पाहणी करताना त्यांनी थेट टाकीत उतरून स्वच्छता कामांचा सखोल आढावा घेतला. या अनोख्या आणि धाडसी पाहणीमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. शहरवासीयांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा या उद्देशाने महानगरपालिकेकडून जलकुंभ स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत भाऊंच्या उद्यानातील सुमारे १०० फूट उंच आणि २८ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभात साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू आहे. कामाची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी महापौर काळे यांनी निसरड्या शिडीवरून टाकीत उतरून…
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन; २४ तासांत अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा साईमत जळगाव प्रतिनिधी : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात आली असून, सोमवार, २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, दि. ११ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता रिंगरोड परिसरात मुकुंद सपकाळे हे त्यांच्या वाहनाने जात असताना ५ ते ६ मोटारसायकलस्वारांनी त्यांचे वाहन अडवले. आरोपींनी वाहनाला चारही बाजूंनी घेराव घालून दगडफेक…
अतिवेग, ओव्हरलोड आणि टायर फुटल्याने अपघात; केंद्राकडून मदत जाहीर साईमत / जम्मू-काश्मीर जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात आज (दि. २०) सकाळी भीषण बस अपघात घडला. रामनगरहून कगोतच्या दिशेने जाणारी बस रस्त्यावरून सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळून उलटली. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून २९ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते आणि ती अतिवेगात होती. कगोत नाल्याजवळ अचानक बसचे टायर फुटले, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. अपघातात बसचा वरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. जखमी प्रवाशांवर उधमपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी…
आरा टेकड्यांमध्ये धडकेनंतर आगीचे लोळ; प्रवाशांची संख्या अद्याप अस्पष्ट साईमत / छत्तीसगड जशपूर जिल्ह्यातील आरा टेकड्यांमध्ये एक खासगी विमान कोसळल्याची भीषण घटना घडली आहे. हे विमान डोंगराला धडकल्याने मोठी दुर्घटना झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जशपूरच्या नारायणपूर भागातील रतनपहळी जंगल परिसरात हे चार्टर्ड विमान झाडांना धडकले आणि त्यानंतर थेट डोंगरावर कोसळले. अपघातानंतर मोठा आवाज झाला असून आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट हवेत दिसत होते. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर घटनास्थळी धूर आणि आगीचे दृश्य स्पष्ट दिसत होते. विमानात किती प्रवासी होते किंवा कोण होते याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि…
परस्पर तळ, बंदरे व हवाई तळांच्या वापराला मंजुरी; संयुक्त सराव व प्रशिक्षणालाही गती मिळणार साईमत / नवी दिल्ली भारत आणि रशिया यांच्यातील नवीन संरक्षण कराराची अधिकृत अंमलबजावणी सुरू झाली असून, दोन्ही देशांतील लष्करी सहकार्याला यामुळे नवे परिमाण मिळाले आहे. या करारानुसार आता भारत आणि रशिया एकमेकांच्या भूमीवर मर्यादित संख्येने सैनिक, युद्धनौका आणि लष्करी विमाने तैनात करू शकतील. या कराराअंतर्गत दोन्ही देशांना एकमेकांच्या देशात एका वेळी जास्तीत जास्त ३,००० सैनिक, ५ युद्धनौका आणि १० लष्करी विमाने तैनात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हा करार दोन्ही देशांच्या दीर्घकालीन मैत्रीला अधिक बळकटी देणारा ठरणार आहे. रशियाच्या अधिकृत माहितीनुसार, या…
मध्य प्रदेशातील मौगंजमध्ये दुर्घटना; वेगावर नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी साईमत / मध्य प्रदेशा मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यात सोशल मीडियासाठी रील बनवण्याच्या नादात झालेल्या धोकादायक प्रकारामुळे भीषण अपघात घडला आहे. नॅशनल हायवेवर वेगाने दुचाकी चालवत आणि धोकादायक स्टंट करत असताना तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील तरुणांचा वेग नियंत्रणाबाहेर गेला. रस्त्याच्या कडेला विटांनी भरलेला ट्रेलर उभा होता. वेग अधिक असल्याने दुचाकी थेट ट्रेलरला जाऊन धडकली. या अपघातात तिन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. याच वेळी दुसऱ्या दुचाकीवर असलेले प्रशांत द्विवेदी आणि प्रदीप द्विवेदी हे दोन भाऊदेखील त्याच ट्रेलरला धडकले. या…
आरोग्य, शिक्षण व ग्रामविकास विभागांचा सखोल आढावा; त्रुटींवर तातडीच्या सुधारणा आदेश साईमत /जळगाव /कानळदा/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी जळगाव तालुक्यातील कानळदा गावाला अचानक भेट देत शासकीय यंत्रणेचा सखोल आढावा घेतला. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या धडक पाहणीमुळे स्थानिक प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून विविध विभागांची प्रत्यक्ष कामकाज तपासणी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, संस्था आणि विभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेण्याचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी कानळदा येथे अचानक भेट देत आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकास…
परतवाडा परिसरात संतापजनक प्रकार; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांची जलद कारवाई साईमत / अमरावती अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणाने संबंधित वृद्ध महिलेला “रुग्णालयात सोडतो” असे सांगून दुचाकीवर बसवले. त्यानंतर रस्त्यातील पुलाखाली संधी साधून त्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडित महिलेने धाडस दाखवत शिरसगाव कसबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला. अत्यंत…