दैवी उपचाराच्या नावाखाली फसवणूक; संगमनेरमधील भोंदूबाबाला अटक साईमत / संगमनेर संगमनेर तालुक्यात “माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, मी कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करतो” असे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील राजेंद्र बापू गडगे उर्फ भोंदू महाराज याच्यासह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, आरोपीने “कॅन्सर बरा करणे, मूल नसलेल्या…
Author: saimat
साईमत / पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरात भ्रष्टाचाराच्या आरोपांना वाचा फोडणाऱ्या तक्रारदारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात तीव्र खळबळ उडाली आहे. तसेच स्थानिक राजकीय वर्तुळातही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सांगवी ते बोपोडी परिसराला जोडणाऱ्या सुमारे 32 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पुलाच्या तसेच त्याच्या सुशोभीकरणासाठी झालेल्या अंदाजे 19 कोटी रुपयांच्या खर्चावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या कामातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबत सांगवी परिसरातील ‘काँग्रेच्युलेशन’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तक्रारदार दिलीप मारुतीराव तनपुरे यांनी आक्षेप नोंदवत संबंधितांकडून स्पष्टीकरण मागितले होते. याच वादातून राग धरून काही जणांनी तनपुरे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी…
संतापाचा उद्रेक; दोषींना अटक करण्याची जोरदार मागणी साईमत जळगाव प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील आमोदा येथे आदिवासी टोकरे कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या मूर्तीची समाजकंटकांकडून विटंबना झाल्याच्या संतप्त निषेधार्थ आज जळगाव शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, दोषींना तात्काळ अटक करून कठोरातील कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. शिवतीर्थावरून मोर्चाची सुरुवात या निषेध मोर्चाला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (शिवतीर्थ मैदान) येथून सुरुवात झाली. शेकडोच्या संख्येने जमलेल्या आदिवासी टोकरे कोळी समाजबांधवांनी हातात निषेधाचे फलक घेत “दोषींना अटक करा”, “आमच्या श्रद्धेचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा जोरदार घोषणा देत…
साईमत / मेहकर समृद्धी महामार्गावर चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि मोबाईलवर रील बनवण्याच्या व्यसनामुळे एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत दीड वर्षाच्या लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ घडली. नेमकी घटना काय घडली : मुंबईहून पुसदकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना मेहकर टोल नाक्याजवळ आली. याचवेळी बसमधील चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात गुंतले असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या निष्काळजीपणामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण…
किसान क्रेडिट कार्डमुळे ‘शून्य व्याज’ कर्जाची संधी साईमत पुणे प्रतिनिधी राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन तसेच वराहपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधनाच्या देखभालीसाठी आणि दैनंदिन खर्च भागविण्यासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, दूध संस्थेची हमी असल्यास ही कर्जमर्यादा तब्बल ३ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची तरतूद आहे. याशिवाय, आधीपासून KCC धारक असलेल्या पशुपालकांना त्यांच्या पतमर्यादेत वाढ करून…
भूषण कॉलनीत घरफोडी; ३३ हजारांचा मुद्देमाल गायब साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील भूषण कॉलनी परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घर उघडे असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लॅपटॉप व तीन मोबाईल असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण कॉलनीतील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या एका तरुणाच्या घरात कोणीही नसताना घराचे मुख्य दार उघडे असल्याचे पाहून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तूंवर डोळा ठेवत चोरट्याने लॅपटॉप आणि तीन मोबाईल असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटना लक्षात येताच संबंधित फिर्यादीने तातडीने रामानंद…
तक्रारदारांनाच ‘थर्ड डिग्री’ची धमकी; आंदोलनानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई साईमत चोपडा प्रतिनिधी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. गो-रक्षकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आणि तक्रारदारांनाच ‘थर्ड डिग्री’ देण्याची धमकी दिल्याचे प्रकरण साळवे यांना महागात पडले असून, वाढत्या दबावानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. घटनेचा उगम चोपडा येथील रामपुरा कचरा डेपो परिसरात झालेल्या एका संशयित गो-वंश तस्करी प्रकरणातून झाला. या ठिकाणी गो-रक्षकांवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. मात्र, तक्रार नोंदवण्याऐवजी पोलीस निरीक्षक साळवे यांनी तक्रारदारांवरच गुन्हे दाखल करण्याची भाषा केल्याचा आरोप आहे. एवढेच…
मोबाईल कॉल ठरला घातक? तरुणाची गोळी झाडून आत्महत्या साईमत भडगाव प्रतिनिधी शहरातील खुशाल आप्पा नगर परिसरात रविवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, २२ वर्षीय तरुणाने गावठी पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून जीवनयात्रा संपविल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्वप्निल प्रवीण शिंपी असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल हा सकाळपासून नेहमीप्रमाणे कुटुंबीय व मित्रांसोबत वावरत होता. कोणत्याही प्रकारची अस्वस्थता त्याच्या वागण्यात जाणवत नव्हती. मात्र दुपारच्या सुमारास त्याला एक संशयास्पद फोन आला. या फोननंतर तो अचानक चिंताग्रस्त झाला आणि कोणालाही काहीही न सांगता घरातील आपल्या खोलीत गेला. त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला.…
अचानक लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य नष्ट अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील मेहरुण परिसरात शुक्रवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या आगीत घरातील कपडे, धान्य, गाद्या, चादरी तसेच दैनंदिन वापराचे सर्व साहित्य पूर्णपणे नष्ट झाले असून, कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानुसार, शुक्रवार दि. १७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजता भगवान बुधा कोळी यांच्या राहत्या घरात अचानक आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे स्पष्ट होत आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण…
७ दिवसांत शहराबाहेर हलवण्याचे आदेश, अन्यथा कठोर पावले साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील वाढत्या भटक्या वराहांच्या (डुक्कर) समस्येमुळे निर्माण झालेल्या अस्वच्छता आणि आरोग्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर महानगरपालिकेने अखेर कठोर भूमिका घेतली आहे. विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने डुक्कर पालन करणाऱ्यांवर कारवाई करत मनपाने संबंधितांना नोटीस बजावत ७ दिवसांत सर्व डुक्कर शहर हद्दीबाहेर हलवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. महानगरपालिका हद्दीत काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात डुक्करांचे भटकंती स्वरूपात संचार होत असल्याने स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तसेच नागरिकांच्या आरोग्यावर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याची तक्रार सातत्याने प्रशासनाकडे येत होती. या पार्श्वभूमीवर मनपाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३७६ अंतर्गत कारवाईचा बडगा…