जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी, किनारी भागात भीतीचे वातावरण साईमत / टोकियो वृत्तसंस्था उत्तर जपानमध्ये आज 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भूकंप झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या भूकंपानंतर जपानच्या हवामान संस्थेने (JMA) तात्काळ त्सुनामीचा इशारा जारी केला असून किनारी भागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान संस्थेच्या माहितीनुसार, या भूकंपानंतर 3 मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5.32 वाजता 70 सेंटीमीटर उंचीची पहिली लाट किनार्यावर धडकली. इवाते प्रांतातील कुजी बंदरात 5.34 वाजता आणखी एक त्सुनामी लाट नोंदवण्यात आली. त्यापूर्वी 40 सेंटीमीटर उंचीची छोटी लाटही किनाऱ्यावर धडकल्याची माहिती मिळाली…
Author: saimat
तांत्रिक बिघाडामुळे प्लॅटफॉर्म गोंधळ; मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, मध्य रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत साईमत / मुंबई मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या CSMT स्थानकात आज दुपारी मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली आहे. दुपारी सुमारे ३:१५ ते ३:२० च्या दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरहून येणारी एक जलद लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ऐवजी चुकून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ कडे वळवण्यात आली. त्याच वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आधीच एक लोकल उभी होती. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्याचे लक्षात येताच मोटरमनने तात्काळ प्रसंगावधान राखत ब्रेक…
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द करत निरोप घेतला साईमत जळगाव प्रतिनिधी : जिल्हा पोलीस दलात आज झालेल्या पदभार हस्तांतरण सोहळ्यात नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिकृतपणे जिल्ह्याच्या पोलीस दलाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द करत भावपूर्ण वातावरणात निरोप घेतला. या सोहळ्याला जळगाव पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कार्यकाळाचा विशेष उल्लेख करण्यात आला. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, गुन्हेगारीवर घालण्यात आलेला प्रभावी वचक तसेच जनहितासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यशैलीमुळे…
शहापूरमध्ये बिबट्याचा भीषण हल्ला; ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, वनविभागाच्या उशिरामुळे संतापाची लाट साईमत / शहापूर शहापूर तालुक्यातील वाशाळा वनपरिक्षेत्रातील कळभोंडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृत मुलाचे नाव कृष्णा भागवत अगीवले असे असून तो नेहमीप्रमाणे मित्रांसोबत आंबे तोडण्यासाठी जंगल परिसरात गेला होता. मे महिन्याच्या सुट्टीमुळे परिसरातील मुले सकाळी शाळेनंतर आंबे गोळा करण्यासाठी जंगलात जात होती. परंतु या वेळी जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कृष्णावर हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. काही क्षणांतच घडलेल्या…
“जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.” साईमत जळगाव प्रतिनिधी :राज्यातील सरकारी, निम-सरकारी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी अखेर तीव्र पवित्रा घेत मंगळवार, २१ एप्रिलपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अक्षरशः विस्कळीत झाली आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्याजिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकत्र येत जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजी, फलकबाजी आणि एकजुटीच्या जोरावर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष…
रायगडच्या लोणेरेमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; लॉजमधील खोलीत निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह, काही तासांत आरोपीला अटक साईमत / रायगड रायगड जिल्ह्यातील लोणेरे परिसरात रविवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका लॉजच्या खोलीत २४ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून, तिची धारदार शस्त्राने डोक्यावर आणि शरीरावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत तरुणीचे नाव पल्लवी मोरे असून ती रायगडच्या वडगाव परिसरातील रहिवासी होती. लॉजमधील खोलीत तिचा मृतदेह आढळताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणाच्या तपासासाठी फिंगरप्रिंट तज्ज्ञ, फॉरेन्सिक पथक आणि…
अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग; रहदारीला अडथळा ठरणारे अनधिकृत व्यवसाय जमीनदोस्त साईमत जळगाव प्रतिनिधी : शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव महापालिकेने सुरू केलेल्या धडक मोहिमेने आज मंगळवारी (दि. २१ एप्रिल) पुन्हा एकदा जोरदार कारवाई करत शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठा बदल घडवून आणला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आकाशवाणी चौक आणि प्रभात चौक परिसरात दाखल झाले आणि अनधिकृत हातगाड्या व टपऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिनधास्तपणे थाटलेल्या हॉकर्सच्या गाड्या आणि टपऱ्यांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता. परिणामी नागरिकांना सतत कोंडीचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका…
विदर्भात उन्हाचा तडाखा तर खान्देश-मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी; आयएमडीकडून अनेक भागांना सतर्कतेचा इशारा साईमत / मुंबई राज्यात सध्या उन्हाळा आणि पावसाचा अनोखा संगम पाहायला मिळत असून हवामानात मोठे बदल नोंदवले जात आहेत. एका बाजूला विदर्भात कडाक्याचे ऊन नागरिकांना हैराण करत असताना, दुसरीकडे खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरींची हजेरी लागत आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, २० ते २४ एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात…
साईमत / जळगाव सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र सोन्याच्या सातत्याने वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण येत आहे. सोन्याचा दर प्रति तोळा दीड लाख रुपयांच्या पुढे पोहोचल्याने खरेदीदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहक सध्या खरेदी टाळून बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेताना दिसत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असले तरी आज मात्र त्यात कोणताही बदल झालेला नाही. दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी उच्च किमतीमुळे खरेदीवर मर्यादा येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात आज मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.…
सुदैवाने जीवितहानी टळली, आकाशवाणी चौकात क्षणभर तणाव साईमत जळगाव प्रतिनिधी : शहरातील अत्यंत गजबजलेल्या आकाशवाणी चौकात मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने कारला दिलेल्या जोरदार धडकेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास आकाशवाणी चौकातून वेगाने जात असलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला अचानक जोराची धडक दिली. धडकेचा आवाज आणि तीव्रता इतकी मोठी होती की परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर ट्रक चालक आणि कार चालक यांच्यात रस्त्याच्या मधोमधच शाब्दिक वाद झाला. त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले…