हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक विधींसह रक्तदान शिबिर लोण्याच्या साडेआठ फूट मूर्तीने वेधले लक्ष साईमत /जळगाव / प्रतिनिधी जळगाव शहरापासून सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या अवचित हनुमान या जागृत देवस्थानात हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. हनुमान जयंतीच्या निमित्ताने दिवसभर मंदिरात अभिषेक, पूजन, आरती आदी धार्मिक विधी पार पडले. विशेष आकर्षण ठरली ती सुमारे साडेआठ फूट उंचीची लोण्यापासून साकारलेली हनुमानाची भव्य मूर्ती. या अद्वितीय मूर्तीमागे स्थानिक श्रद्धा आणि परंपरेचा वारसा दडलेला आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार, परिसरातील शेतकरी आणि भाविक आपल्या जनावरांकडून भरपूर दूध मिळावे तसेच शेतीत…
Author: saimat
साईमत / मुंबई देशभरात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असताना मुंबईतही अशाच एका धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला आहे. ताडदेव परिसरात एका न्यायमूर्तीची तब्बल ९३ हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय तक्रारदार हे ताडदेव येथे वास्तव्यास असून लघुवाद न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये बिघाड झाल्याने त्यांनी गुगलवर कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक शोधला. त्यानंतर एका व्यक्तीने स्वतःला मोबाईल कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत त्यांचा विश्वास जिंकला. सदर व्यक्तीने तक्रार नोंदवण्याच्या बहाण्याने कस्टमर सपोर्ट अॅप डाउनलोड करण्यास सांगत एपीके फाईल पाठवली. न्यायमूर्तींनी…
इन्स्टाग्रामवरील ‘भाई’ स्टाइल रील ठरली डोकेदुखी; जळगाव पोलिसांची धडक कारवाई साईमत /जळगाव / प्रतिनिधी सोशल मीडियावर ‘भाईगिरी’चे प्रदर्शन करून प्रसिद्धी मिळवण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडल्याची घटना जळगावमध्ये समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर गुंडशाहीची भाषा वापरत रील पोस्ट करणाऱ्या चेतन सोळंके या तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत चांगलाच धडा शिकवला. या कारवाईनंतर संबंधित तरुणाचा माफीनामा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या तरुणांमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी वेगवेगळे ट्रेंड फॉलो करण्याची स्पर्धा लागलेली दिसते. यात काही जण ‘भाईगिरी’, शस्त्रांचे प्रदर्शन किंवा गुंडशाहीचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्स तयार करताना दिसतात. अशाच प्रकारची एक रील चेतन सोळंके या तरुणाने तयार…
धारदार शस्त्राने वार करून अज्ञात हल्लेखोराचा थरकाप; आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना साईमत / पुणे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकर वस्ती परिसरात एका वृद्ध महिलेची आणि सहा वर्षांच्या चिमुकलीची अज्ञात व्यक्तीकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवाची आळंदी येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मंगला चंद्रकांत शिंदे (वय ७०) आणि धनश्री केदारे (वय ६) या दोघी घरात झोपलेल्या असताना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या दोघींचा अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला. धनश्रीची आजी संगीता केदारे (वय ४७) या नेहमीप्रमाणे…
पहाटेपासून भाविकांची गर्दी, पूजन-अर्चना, भजन-कीर्तनांनी संपूर्ण परिसर झाला भक्तीमय साईमत /जळगाव / प्रतिनिधी हनुमान जयंतीच्या पावन निमित्ताने जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. शहरातील पुरातन पंचमुखी हनुमान मंदिरात यंदा भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक कार्यक्रम, आकर्षक सजावट आणि भाविकांची मोठी उपस्थिती यामुळे मंदिर परिसर दिवसभर गजबजलेला होता. पहाटे पाच वाजताच मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आणि त्याच क्षणापासून दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या. श्रीरामभक्त हनुमानाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विशेष पूजन, महाआरती आणि गदा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधींमध्ये हजारो भाविकांनी श्रद्धेने सहभाग घेतला. दिवसभर मंदिर परिसरात भजन, कीर्तन आणि मंत्रोच्चारांचा अखंड…
साईमत / जळगांव एप्रिल महिन्याची सुरुवात साधारणतः कडक उन्हाने होत असते. मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळे पाहायला मिळत असून जळगावसह राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट यामुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनियमित पावसाचे सत्र सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच बदलत्या हवामानामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी चिंता अधिक वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून 3 आणि 4 एप्रिलसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात मुसळधार…
साईमत / जळगांव महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पडताळणी प्रक्रियेनंतर तब्बल ६८ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी सुमारे २ कोटी ४३ लाख महिलांनी नोंदणी केली होती. पात्र लाभार्थींना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे ४३,७४० कोटी रुपयांचा भार येत होता. आर्थिक ताण लक्षात घेऊन महिला व बालकल्याण विभागाने लाभार्थ्यांची पडताळणी मोहीम राबवली. या तपासणीत काही शासकीय कर्मचारी तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले. सरकारने यानंतर सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी सक्तीचे केले. ३१ मार्च २०२६ पर्यंत दिलेल्या मुदतीत १…
८३४ कोटीचा निधी पूर्णपणे वापरून जळगाव जिल्ह्याचा विकास उत्कर्षावर साईमत /जळगाव / प्रतिनिधी: जिल्हा वार्षिक योजना (DPDC) निधीच्या काटेकोर नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ८३४ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करून जिल्ह्याने सलग चौथ्या वर्षी हा विक्रम राखला आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती (SCP) आणि आदिवासी घटक (TSP/OTSP) योजनांमधील निधीचा शंभर टक्के वापर करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार आणि…
कचरा साचल्यामुळे दुर्गंधी; महापौरांनी काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश साईमत /जळगाव / प्रतिनिधी: शहरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या घनकचरा डंपिंग ग्राऊंडवरील समस्यांवर अखेर निर्णायक हालचाल सुरू झाली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. बैठकीत कचरा डेपोच्या कंपाऊंड वॉल, रॅम्प आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक अडचणींमुळे ही कामे दीर्घकाळ रखडली होती. नागरिकांकडून वाढलेल्या तक्रारींमुळे दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली गेली. श्री श्री इन्फ्रा या मक्तेदारांनी सांगितले की, सुमारे ८५ हजार चौ.फुट क्षेत्रात ६…
साईमत / जळगाव नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षेत मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व डिजिटल पेमेंटसाठी आता टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अनिवार्य करण्यात आले आहे. या बदलानुसार, केवळ ओटीपीच्या आधारे व्यवहार पूर्ण करणे आता शक्य राहणार नाही. प्रत्येक व्यवहारासाठी किमान दोन वेगवेगळ्या पडताळणी पद्धतींचा वापर करणे आवश्यक असेल. यामध्ये पिन, पासवर्ड किंवा गुप्त पासफ्रेज, ओटीपी किंवा हार्डवेअर टोकन, तसेच फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा आयरीस स्कॅन यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. हे नियम केवळ देशांतर्गत व्यवहारांपुरते मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय व्यवहारांनाही लागू करण्यात येणार आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय कार्ड पेमेंटसाठी या प्रणालीची पूर्ण अंमलबजावणी ऑक्टोबर…