पूर्वपट्टा हादरला; कांदा, गहू, हरभरा, टरबूज पिकांचे मोठे नुकसान साईमत /नंदुरबार/ प्रतिनिधी नंदुरबार शहर आणि तालुक्याच्या पूर्व भागाला २ एप्रिल २०२६ रोजी अवकाळी वादळी पाऊस आणि गारपीटाने जोरदार झोडपले. शहरात मंगल बाजार आणि कृषी बाजार समितीतील धान्य वाहून गेले, तर बाजार विक्रेत्यांची मोठी धावपळ सुरु राहिली. अनेक ठिकाणी झाडे पडली, विजेच्या तडाख्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली, तसेच उन्हाळ्यात तडाखापासून काही काळ दिलासा मिळाला तरी अवकाळी पावसामुळे नागरिक हैराण झाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३० व ३१ मार्च रोजी पूर्वीच्या पावसामुळे नंदुरबार तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात गारपीट झाली होती. काही मिनिटांच्या या तडाख्यात कांदा, गहू, हरभरा आणि टरबूज यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…
Author: saimat
साईमत / जळगाव जिल्ह्यातील हवामानात एप्रिलमध्ये अनपेक्षित बदल झाला आहे. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर अचानक पाऊस आणि दमट हवामान निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य डळमळीत झाले आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसंख्येवर दिसून येत असून शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णालये पूर्णपणे हाऊसफुल्ल झालेली आहेत. सध्या ताप, सर्दी, खोकला, उलट्या-जुलाब, अंगदुखी, त्वचारोग आणि श्वसनासंबंधी तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आर्द्रतेमुळे विषाणू आणि जीवाणूंना पोषक वातावरण मिळाले असून संसर्गजन्य आजारांचा फैलाव जलद होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रुग्णांची गर्दी वाढली असून औषधांचा तुटवडा आणि डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. आरोग्य विभागाने गावोगावी आरोग्य शिबिरे आणि जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून…
साईमत / नवी दिल्ली आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवण्यात आले आहे. राघव यांची जागा पंजाबमधून अशोक मित्तल यांनी घेतली आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, तसेच माजी मुख्यमंत्री व वरिष्ठ नेते आतिशी यांनी यावर टीका केली आहे. आतिशी म्हणाल्या, “भाजपची पद्धत अशी आहे की, आधी नेत्यांना घाबरवतात, नंतर धमकी देतात आणि काही वेळानंतर आमिष देतात. विरोधी पक्षातील अनेक नेते घाबरून भाजपमध्ये प्रवेश करतात. आता राघव देखील यासाठी तयार असू शकतात.” आतिशी यांनी पुढे आरोप केला की, “देश सध्या संकटातून जात आहे. लोकशाहीवर हल्ला होतोय. दिल्लीत मतदारांची नावे कमी केली जात आहेत,…
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे आणि डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे जळगाव बाजारात सोनं-चांदीचे दर घसरणीकडे साईमत / जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरु आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा मोठा उलटफेर नोंदवला गेला. मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल–इराण संघर्षामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली असून त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढली होती. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुढील दोन–तीन आठवड्यांत कारवाईचा इशारा दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. त्याचबरोबर डॉलरमध्ये ०.५ टक्क्यांची मजबुती आल्यामुळे सोन्यासारख्या धातूंवर दबाव निर्माण झाला आहे. जळगाव बाजारात बुधवारी सोन्याचे दर प्रति १०…
कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; मंचरमध्ये खळबळजनक घटना साईमत / पुणे जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव) येथे एका महिलेने अत्यंत धक्कादायक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या आईने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलगी मृत झाल्याचा समज करून घेतल्यानंतर तिने सहा वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी मारत आत्महत्येचाही प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तपनेश्वर स्मशानभूमीजवळ घडली. नेहाल आशिष बाणखेले (वय ६) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव असून, परिज्ञा बाणखेले (वय १४) व हर्षदा बाणखेले या…
साईमत / दिल्ली देशाची राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये चार सरकारी अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे महानगरपालिका आणि पुरातत्व विभागातील कथित भ्रष्टाचार उघडकीस आला असून शहरात खळबळ उडाली आहे. पहिल्या प्रकरणात, ३१ मार्च रोजी दिल्ली महानगरपालिकेच्या शाहदरा उत्तर विभागातील एका अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. तक्रारदाराचे नुकतेच नूतनीकरण केलेले घर पाडू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्याने ८०,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. या तक्रारीची दखल घेत सीबीआयने १ एप्रिल रोजी सापळा रचत संबंधित अधिकारी आणि त्याच्या शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडले. दुसऱ्या प्रकरणात, ३० मार्च रोजी जंतर मंतर उप-मंडळात कार्यरत भारतीय…
एकलग्न-बोरगाव खुर्दमध्ये २५ लाखांच्या सभामंडपांचे भूमिपूजन जल्लोषात साईमत /पाळधी, ता.धरणगाव / प्रतिनिधी– हनुमान जयंती हा केवळ धार्मिक सण नाही, तर श्रद्धा, शक्ती आणि सेवाभाव जागवणारा दिवस आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. मारुती मंदिर हे गावकऱ्यांचे प्रमुख श्रद्धास्थान असून त्याचा विकास म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान होतो, असेही ते म्हणाले. हनुमान जयंतीच्या पावन व उत्साहपूर्ण वातावरणात एकलग्न (१० लाख रुपये) आणि बोरगाव खुर्द (१५ लाख रुपये) येथे आमदार निधीतून मारुती मंदिर परिसरात सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन जल्लोषात पार पडले. तसेच, बांभोरी बुद्रुक येथील उजाड मारुती मंदिराच्या सुशोभीकरणासाठी १० लाख तर जळगाव तालुक्यातील खिर्डी येथे सभा मंडपासाठी २० लाख रुपये निधी…
नागरिकांचा वेळ व प्रवास वाचवण्यासाठी लोकशाही दिनात ऑनलाईन सुविधा सुरू साईमत /जळगाव / प्रतिनिधी– दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन यंदा ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात पार पडणार आहे, अशी माहिती रहिवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली. या दिवसाचे मुख्य उद्देश नागरिकांच्या वैयक्तिक हितसंबंधातील तक्रारींचा त्वरित विचार करणे आणि प्रशासनाकडून तत्काळ मार्गदर्शन मिळवून देणे आहे. रहिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी जर यापूर्वी तालुका स्तरावर लोकशाही दिनात अर्ज केला असेल आणि एका महिन्याच्या आत उत्तर मिळाले नसेल, तर त्या अर्जासंबंधी तक्रारी घेऊन त्यांनी या लोकशाही दिनी उपस्थित रहावे. यामुळे…
दुचाकीस्वारावर दोन वाहनांची धडक तरूणाचा दुर्दैवी मृत्यू साईमत /जळगाव / प्रतिनिधी जळगाव-भुसावळ महामार्गावरील खेडी गावाजवळ बुधवारी दुपारी झालेल्या दुहेरी अपघातात भालगावच्या समाधान बापू भोई (वय ३२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव मालवाहू रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर, मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीनेही त्यांना ठार मारल्याने हा गंभीर अपघात घडला. या घटनेने भालगाव परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताची सविस्तर माहिती मिळालेल्या माहितीनुसार, समाधान भोई हे व्यवसायाने फळविक्रेते होते. १ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजता ते भुसावळकडून जळगावकडे जात होते. समोरून येणाऱ्या एका भरधाव मालवाहू रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते रस्त्यावर फेकले गेले आणि त्याच वेळी रिक्षाच्या…
सिंधुदुर्ग हादरला; जीवावर उदार होऊन बचावकार्य, परिसरात हळहळ साईमत / सिंधुदुर्ग करूळ घाट येथे सिमेंटने भरलेला ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट वाहतूक करणारा ट्रक घाटातून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने तो सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात विजापूर येथील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, करूळ परिसरातील सह्याद्री जीवरक्षक टीमच्या मदतीने बचावकार्य हाती घेण्यात आले. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या बचावकार्यावेळी…