Author: saimat

पक्षाची एकजूट आणि इतिहासाची ओळख जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार साईमत /जळगाव / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त जळगावातील पक्ष कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी पक्षासाठी आयुष्यभर झटणाऱ्या ४६ जेष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करून त्यांच्या योगदानाची उजळणी करण्यात आली. सन्मानित कार्यकर्त्यांना जनसंघाचा जुना चिन्ह असलेला “दीपक” आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास आमदार राजू मामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, तसेच नगरसेवक उदय भालेराव, विशाल त्रिपाठी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना खासदार स्मिताताई वाघ यांनी कार्यकर्त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित…

Read More

शेजारी मित्राच्या कटामुळे झालेली हत्या; ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा संशय साईमत / नागपूर शहराला हादरवून टाकणाऱ्या १४ वर्षीय अथर्व मनोरे अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, अथर्व गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. गुरुवारी हनुमान जयंतीनिमित्त गिट्टीखदान परिसरात निघालेल्या शोभायात्रेदरम्यान त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. कुटुंबीयांनी अथर्वचा शोध घेतला, मात्र काहीही माहिती मिळाली नव्हती. अखेर परवा दुपारी भरतवाडा परिसरात अथर्वचा मृतदेह सापडला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अथर्वचा शेजारी आणि मित्र जयराम गोपाल यादव हाच या अपहरणाचा मुख्य सूत्रधार होता. पैशांच्या लालसेत…

Read More

‘सुंदर जळगाव’साठी भव्य  पुतळा, महापालिकेकडे निवेदन सादर साईमत /जळगाव / प्रतिनिधी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा स्वामी समर्थ चौकात उभारावा, अशी मागणी रामेश्वर कॉलनी विकास फाउंडेशन आणि मेहरूण परिसरातील नागरिकांनी महापौर दिपमाला काळे यांच्याकडे केली आहे. सोमवारी, ६ एप्रिल रोजी या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून, आगामी महापालिका महासभेत ठराव मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, मेहरूण परिसरातील अशोक किराणा ते जकात सोसायटी आणि श्रीकृष्ण मेडिकल ते मंगलपुरी या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या स्वामी समर्थ चौकात हा पुतळा उभारला जावा. या परिसरात सर्व जाती-धर्माचे नागरिक शांततेत राहतात,…

Read More

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि महाराष्ट्र ATS यंत्रणांनी कट्टर दहशतवादाचा मोठा षडयंत्र उधळला साईमत /मुंबई मुंबईतून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र अँटी टेररिझम स्क्वॉड (ATS)च्या मदतीने ही कारवाई करून संभाव्य मोठा दहशतवादी हल्ला टाळल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार, हे दोघे दिल्लीमध्ये खेळण्याच्या कारमध्ये बॉम्ब लपवून हल्ला करण्याच्या तयारीत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख मोस्साब अहदम उर्फ कलाम कल्याण आणि मोहम्मद हमाद कोल्लारा अशी असून दोघेही मुंबईचे रहिवासी आहेत. अटकीनंतर त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले आहे. तपासात असे लक्षात आले की, दोघेही कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित झाले होते…

Read More

बारामतीच्या विकासाचा वादा; नागरिकांना कुटुंबासारखी साथ देण्याची ग्वाही साईमत / बारामती बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावूक भाषण केले. दोन महिन्यांपूर्वी चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांचं निधन झाल्याने त्यांची कमतरता अजूनही जाणवते, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. “अजितदादा आपल्यात नाहीत, आजही वाटत नाही; मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीची पोटनिवडणूक होईल,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामतीच्या प्रत्येक कोपऱ्यात अजितदादांचा ठसा आहे आणि बारामतीची प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही. “ही निवडणूक अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी आहे. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने सुरु राहील, नवीन प्रकल्प आणि गुंतवणुकीसाठी मी…

Read More

आंदोलनातून यश नागेश्वर रेल्वे पूल वाहतुकीस खुला साईमत /भुसावळ / प्रतिनिधी वरंगाव ते बोदवड या महत्त्वाच्या मार्गावरील नागेश्वर रेल्वे पूल अनेक वर्षे नागरिकांसाठी दुःखदायक समस्या ठरला होता. पुलाची रुंदी आणि उंची अत्यंत कमी असल्यामुळे मोठ्या वाहनांची ये-जा अशक्य होती. पावसाळ्यात पूलाखाली पाणी साचत असल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत होती, ज्यामुळे शेतकरी, व्यापारी तसेच दैनंदिन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संघटनांसह जनआंदोलन उभे केले. रास्ता रोको, निवेदने आणि आंदोलने यासारख्या सातत्यपूर्ण उपक्रमांनी प्रशासनावर दबाव निर्माण केला. अखेरीस नगरपरिषदेमार्फत रेल्वे विभागाला भुयारी पूल उभारण्याचा प्रस्ताव सादर…

Read More

पुलावर वाहनांची लांबलचक रांग प्रशासनावर नागरिकांचा संताप साईमत /जळगाव / प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर पुलावर सोमवारी अचानक भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पुलावर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनांची लांबलचक रांग लागली होती. परिणामी, वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला असून अनेक वाहनचालकांना तासन्‌तास अडकून राहावे लागले. दुपारच्या सुमारास वाढलेल्या वाहनांच्या ओघामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली. पुलावरून दोन्ही बाजूंनी ये-जा करणाऱ्या वाहनांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कोंडी अधिक वाढली. काही ठिकाणी वाहनचालकांमध्ये किरकोळ वादावादीही झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या, अरुंद होत चाललेले रस्ते आणि सुरू असलेली विविध विकासकामे यामुळे वाहतुकीवर ताण वाढत…

Read More

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध जनजागृतीसह मोफत लसीकरण; तज्ज्ञांकडून विद्यार्थिनी व पालकांना मार्गदर्शन साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी  येथील वरणगावमधील महात्मा गांधी विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र, तपत कठोरा यांच्या विद्यमाने आयोजित एचपीव्ही लसीकरण अभियानांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळच्या सत्रात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींना आरोग्याविषयी जागरूक करण्याबरोबरच गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ८ मार्च ‘जागतिक महिला दिना’पासून १४ ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थिनींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. प्रशांत जैस्वाल यांनी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींना…

Read More

दक्षिणा न दिल्याच्या कारणावरून संताप; ढाबा मालकासह कामगारांविरोधात गुन्हा दाखल साईमत / पालघर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाडा-खडकोना गावाजवळ एका ढाब्यावर टेम्पो चालकावर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चालकाला बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दानिश खान (वय ३०) या टेम्पो चालकावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ढाबा मालकासह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास दानिश खान हा त्याचा सहाय्यक…

Read More

रविवारी भव्य शोभायात्रेने गावभर उत्साहाचे वातावरण निर्माण केले साईमत /जळगाव / प्रतिनिधी  पिंप्राळ्यात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री केसरी नंदन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित पाच दिवसीय कथा सोहळा उत्साहात पार पडला. कथाकार ह. भ. प. प्रा. मनोज महाराज कुलकर्णी यांनी आपल्या सुमधूर वाणातून भक्तांना हनुमानाच्या जीवनप्रवासाची माहिती व आनंददायी कथा ऐकवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कथेदरम्यान सजीव आरास दाखवून प्रेक्षकांना दृश्यात्मक आनंद देण्यात आला. रविवारच्या भव्य शोभायात्रेत विविध रंगीबेरंगी पुतळे, धार्मिक नाट्यदृश्ये आणि सजीव देखावे शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. संध्याकाळी भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले, ज्यामध्ये उपस्थितांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष मोहन बारी, उपाध्यक्ष रुपेश महाजन, सचिव गणेश कोळी,…

Read More