साईमत / जळगाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. या निर्णयांमुळे माहिती तंत्रज्ञान, नियोजन, ऊर्जा व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून येणार आहेत. नियोजन व माहिती तंत्रज्ञान: महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर आता कंपनी अधिनियम, 2013 अंतर्गत कलम 8 अंतर्गत कंपनी म्हणून स्थापन होणार आहे. या निर्णयामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार – पाणलोट विकास, डोंगरी विकास योजना, ई-पंचनामा, महा अग्री टेक, कांदळवन अभ्यास, भूजल व्यवस्थापन आणि खाणींचा अभ्यास या सर्व क्षेत्रांना गती मिळणार आहे. यासोबतच महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनी स्थापन होणार आहे. भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर…
Author: saimat
लग्नाची हळद आटोपलेल्या तरुणाचे दुर्दैवी निधन साईमत /अमळनेर / प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे-शहापूर दरम्यान सुरू असलेल्या पुलकामाच्या खड्ड्यात एका बुलेट मोटारसायकलच्या अपघातात २७ वर्षीय सुनील सीताराम शिंदे याचा मृत्यू झाला. हा अपघात सुनील शिंदेच्या लग्नाची हळद आटोपून घरी परतण्याच्या मार्गावर घडला. घटनास्थळी मिळालेल्या माहितीप्रमाणे, मोटारसायकल पुलाच्या खड्ड्यातील सिमेंट पाईपच्या मधोमध अडकल्यामुळे तो संतुलन गमावून कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी ठेकेदारावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा दावा आहे की अपघातानंतरही कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना घेतल्या गेल्या नाहीत, फक्त काही सुरक्षा फलक घालून काम सुरू ठेवले गेले. मारवड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली…
मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला साईमत /मुक्ताईनगर / प्रतिनिधी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगरच्या पुनर्वसनासाठी तब्बल ३८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा परिसरासाठी विकासातील मोठा टप्पा मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर येथील पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबीत होता. या कामासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले, ज्याला अखेर आता यश आले आहे. या निधीमुळे मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आज मुंबई येथे झालेल्या संयुक्त बैठकीत जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील…
साईमत / वृत्तसंस्था 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर युक्तपणे मोठा हल्ला केला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात गंभीर तणाव निर्माण झाला आहे. हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणला 48 तासांचा अल्टीमेटम दिला असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिक घातक होत आहे. जागतिक स्तरावर युद्ध थांबवण्याची मागणी जोर धरत आहे, तरीही युद्धाची भीषण छाया सध्या स्पष्टपणे दिसत आहे. युद्धामुळे अनेक देश होरपळण्याची शक्यता असून, ऊर्जा क्षेत्रावर मोठा फटका बसण्याची भीती आहे. अमेरिकेच्या इशाऱ्यानुसार इराणमधील ऊर्जा प्रकल्प आणि महत्त्वाच्या ब्रिजवर हल्ले होणार आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले की, मंगळवारी रात्री ८ वाजता हल्ला होईल. भारतीय वेळेनुसार हा हल्ला बुधवारी…
जिल्ह्यात १,१६८ ग्रामपंचायतींवर पोहोचले राज्य शासनाचे पाऊल साईमत /जळगाव / प्रतिनिधी जिल्ह्यातील ग्रामीण प्रशासनात मोठा बदल घडवून आणत, राज्य शासनाने आठ नवीन ग्रामपंचायतींच्या स्थापनेस मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या आता ११६० वरून ११६८ वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातील स्वतंत्र ग्रामपंचायतींवर वाढत्या मागणीमुळे आणि १५व्या वित्त आयोगाच्या थेट निधी व अधिकारांच्या वाढीमुळे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यापूर्वी किमान १ हजार लोकसंख्येचा निकष होता, परंतु आता तो ७०० पर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच, मूळ गाव आणि तांड्यांमधील ३ किमी अंतराची अट रद्द केल्यामुळे अनेक लहान वस्त्या व तांड्यांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.…
साईमत /नवी दिल्ली पश्चिम आशियामध्ये युद्धाची स्थिती पेटलेली असतानाच भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या भडकाऊ वक्तव्यांनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इस्लामाबादला गंभीर इशारा दिला आहे. राजनाथ सिंह म्हणाले, “जर पाकिस्तानाने बंगालकडे नजर टाकली, तर त्याचे किती तुकडे होतील हे फक्त देवच जाणे.” सिंह यांनी पाकिस्तानला ऐतिहासिक विभाजनाचा संदर्भ देत, भविष्यात अशा तणाव वाढवणाऱ्या वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताला धमकी देताना सांगितले होते की, भविष्यात भारताने काही कारवाई केली, तर कोलकात्यात हल्ला करून प्रत्युत्तर दिले जाईल. या वक्तव्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र…
साईमत / विशाखापट्टणम शहरातील क्रिकेट स्पर्धेत घडलेली हिंसक घटना शहरभर खळबळ उडवून टाकणारी आहे. रन आऊटच्या निर्णयावरून सामन्यात झालेल्या वादातून संतप्त झालेल्या खेळाडूने आणि प्रेक्षकांनी अंपायरवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत अंपायर डोला अजिब बाबू यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा अंपायर बुदुमुरी चिरंजीवी गंभीर जखमी झाला. माहितीप्रमाणे, सामन्यादरम्यान दोन्ही अंपायर परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मैदानातील काही प्रेक्षक आणि खेळाडूंचा राग तणावात बदलला. कांता किशोर नावाच्या २६ वर्षीय प्रेक्षकाने अंपायरांना शिवीगाळ करत वातावरण आणखी चिघळवले. सामन्यानंतर अजित बाबू चिंरंजीवी आणि त्यांचे मित्र परस्पर वादात अडकले. त्या वादात किशोरने अचानक अंपायर बाबूच्या छातीत चाकू खुपसला. या हल्ल्यात अंपायर…
पाळधी ते तरसोद बायपासवर ट्रकखाली झोकून मृत्यू साईमत /जळगाव / प्रतिनिधी पाळधी ते तरसोद हायवे बायपासवर एका ३० वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत स्वतःला ट्रकखाली झोकून दिल्याने धक्कादायक घटना घडली आहे. मृतक तरुणाचे नाव विशाल राजेंद्र बाविस्कर (रा. लिंगा, ता. नेपानगर, ह.मु. आसोदा) असे आहे. घटनेनुसार, विशाल बाविस्कर हा पाळधी ते तरसोद बायपास रस्त्यावर ट्रॅक्टर घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या टाटा पंच कारशी त्याचा अपघात झाला. या अपघातानंतर, दारूच्या नशेत असलेल्या विशालभोवती नातेवाईक आणि टाटा पंचमधील व्यक्ती जमा झाले होते. सर्वजण त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना, अचानक विशालने समोरून येणाऱ्या ट्रक कंटेनरखाली स्वतःला झोकून दिले. या भीषण घटनेत त्याला गंभीर…
साईमत / जळगाव जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने काही दिवस उसंत घेतली असून आता वातावरण पुन्हा उष्णतेकडे वळू लागले आहे. मिळालेला गारव्याचा दिलासा कमी होत असून नागरिकांना पुन्हा उन्हाची तीव्रता आणि वाढता उकाडा जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांतील पावसामुळे तापमानात घट झाली होती, त्यामुळे उन्हापासून काहीसा आराम मिळाला होता. मात्र, हा आराम तात्पुरता ठरला असून आकाश स्वच्छ होताच तापमानात पुन्हा वाढ होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ ते १० एप्रिलदरम्यान वातावरण प्रामुख्याने कोरडे आणि निरभ्र राहणार आहे. या काळात दिवसाचे तापमान सुरुवातीला सुमारे ३६ अंश सेल्सिअस राहून हळूहळू वाढत ४० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, रात्रीचे तापमान…
जेसीबीसमोर आदिवासींचा ठिय्या; महापालिकेला माघार घ्यावी लागली साईमत /जळगाव / प्रतिनिधी शहरालगतच्या मोहाडी शिवारातील एकलव्य नगर परिसरात मंगळवार, ७ एप्रिल रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. गेल्या वीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांनी अचानक सुरू झालेल्या कारवाईला तीव्र विरोध करत रस्त्यावर उतरल्याने परिसर काही काळ रणांगणात परिवर्तित झाला होता. प्रशासन आणि नागरिकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे वातावरण चिघळले होते. महापालिकेच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या एकलव्य नगर झोपडपट्टी हटवण्यासाठी प्रशासनाने तीन जेसीबींसह पथक पाठवले होते. मात्र, कारवाईची माहिती मिळताच महिलांसह शेकडो आदिवासी बांधव घटनास्थळी एकत्र जमले. “आम्ही दोन दशकांपासून येथे राहत आहोत, आमच्या डोक्यावर छप्पर आहे तेही हिरावून घेणार…