साईमत / जळगाव जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने काही दिवस उसंत घेतली असून आता वातावरण पुन्हा उष्णतेकडे वळू लागले आहे. मिळालेला गारव्याचा दिलासा कमी होत असून नागरिकांना पुन्हा उन्हाची तीव्रता आणि वाढता उकाडा जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांतील पावसामुळे तापमानात घट झाली होती, त्यामुळे उन्हापासून काहीसा आराम मिळाला होता. मात्र, हा आराम तात्पुरता ठरला असून आकाश स्वच्छ होताच तापमानात पुन्हा वाढ होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ ते १० एप्रिलदरम्यान वातावरण प्रामुख्याने कोरडे आणि निरभ्र राहणार आहे. या काळात दिवसाचे तापमान सुरुवातीला सुमारे ३६ अंश सेल्सिअस राहून हळूहळू वाढत ४० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, रात्रीचे तापमान…
Author: saimat
जेसीबीसमोर आदिवासींचा ठिय्या; महापालिकेला माघार घ्यावी लागली साईमत /जळगाव / प्रतिनिधी शहरालगतच्या मोहाडी शिवारातील एकलव्य नगर परिसरात मंगळवार, ७ एप्रिल रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. गेल्या वीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांनी अचानक सुरू झालेल्या कारवाईला तीव्र विरोध करत रस्त्यावर उतरल्याने परिसर काही काळ रणांगणात परिवर्तित झाला होता. प्रशासन आणि नागरिकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे वातावरण चिघळले होते. महापालिकेच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या एकलव्य नगर झोपडपट्टी हटवण्यासाठी प्रशासनाने तीन जेसीबींसह पथक पाठवले होते. मात्र, कारवाईची माहिती मिळताच महिलांसह शेकडो आदिवासी बांधव घटनास्थळी एकत्र जमले. “आम्ही दोन दशकांपासून येथे राहत आहोत, आमच्या डोक्यावर छप्पर आहे तेही हिरावून घेणार…
साईमत / जळगाव घरापासून दूर शहरात शिक्षण किंवा रोजगारासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यां व स्थलांतरित कामगारांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इराण-अमेरिका तणावामुळे इंधन पुरवठ्यावर निर्माण झालेल्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने ५ किलोच्या एलपीजी (LPG) सिलिंडरचा पुरवठा दुप्पट करण्याचे आदेश दिले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीमुळे इंधन वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन, शहरांमध्ये राहणाऱ्या कामगारांना गॅसची कमतरता भासू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी गॅस मिळवण्यासाठी होणारी धावपळ तसेच काळाबाजारातील महागडे दर टाळण्यास मदत होणार आहे. ६ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, ५ किलो फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलिंडरचा पुरवठा वाढवण्यात येणार…
साईमत / जळगाव लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी सरकारने महत्त्वाचा दिलासा दिला आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे केवायसी अपूर्ण किंवा चुकीचे आहे, त्यांना सुधारणा करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. योजनेअंतर्गत यापूर्वी डिसेंबरपर्यंत केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अनेक महिलांकडून माहिती भरताना चुका झाल्यामुळे त्यांचा लाभ अडकला. त्यामुळे सरकारने या महिलांना अंतिम संधी देत मुदत वाढवली आहे. केवायसीतील त्रुटींमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. डिसेंबरपासून मिळणारी रक्कम त्यांना मिळाली नव्हती. आता केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या महिलांना चार महिन्यांचे थकित पैसे एकाच वेळी मिळण्याची शक्यता…
महापौरांचा इशारा; उघड्या विहिरी त्वरित बंद करा, अन्यथा कारवाई साईमत /जळगाव / प्रतिनिधी शहरातील विविध भागांत असलेल्या उघड्या आणि असुरक्षित विहिरींमुळे संभाव्य अपघाताचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला मनोज काळे यांनी कठोर भूमिका घेत प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी मनपा आयुक्तांना लेखी पत्राद्वारे स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जळगाव शहरात पाणीपुरवठ्यासाठी अनेक सार्वजनिक विहिरींचा वापर केला जात असला, तरी सध्या अनेक विहिरी उघड्या अवस्थेत असून त्यांची कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी गंभीर चिंता महापौरांनी व्यक्त केली आहे. महापौर काळे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, महानगरपालिकेच्या मालकीच्या…
जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये मिळवले तिसरे बक्षीस साईमत /जळगाव / प्रतिनिधी जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात नानाश्री फाऊंडेशन संघाने आपल्या अफलातून सांघिक कामगिरीने क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केले. किरण पाटील युवा मंच सतखेडा संघ विजेतेपदावर उभा राहिला तरीही नानाश्री फाऊंडेशनने आपल्या दमदार कामगिरीने तिसरे बक्षीस जिंकत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवला. जळगाव ग्रामीण स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या आयोजनाखाली १ ते ५ एप्रिल दरम्यान शिवतीर्थ मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल २२ संघांनी भाग घेतला. नानाश्री फाऊंडेशन संघाचे नेतृत्व जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे आणि युवासेनेचे स्वप्निल सोनवणे यांनी केले. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नानाश्री फाऊंडेशनने चंद्रावर्षा इंटरप्रायजेस संघाला ९ बळीवर रोखत एकतर्फी विजय मिळवून…
शेतकऱ्याचे ५० क्विंटल मका नष्ट ५० हजारांचे नुकसान ग्रामस्थांची तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी साईमत /जामनेर/फत्तेपूर / प्रतिनिधी जळोद्री शिवारात वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचे सुमारे २ एकर मका शेत जळून खाक झाले आहे. या घटनेत भारत सुपडू सुरवाडे (वय ५५) यांच्या कुटुंबाचे अंदाजे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. तालुक्यातील जळोद्री येथील गट क्रमांक १४ मधील शेतात रविवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास मका कापणीचे काम सुरू होते. या वेळी शेतावरून गेलेल्या महावितरणच्या वीज वाहक तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन घर्षण झाले आणि त्यातून निघालेली आगीची ठिणगी सुक्या मका पिकावर…
छोट्या विद्यार्थ्यांच्या अश्रूंनी जिल्हाधिकारी कार्यालय गाजवले साईमत /जळगाव / प्रतिनिधी पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका उज्वला सावकारे यांची बदली होऊ नये, अशी आर्त मागणी विद्यार्थ्यांनी पालकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि शिक्षणातील उत्साहासाठी मॅडमच्या योगदानाचे कौतुक करत त्यांनी बदली रद्द करण्याची विनंती केली. पालकांनी सांगितले की, उज्वला सावकारे यांच्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली असून शिक्षणाबद्दलची आवड आणि उत्साह लक्षणीयरीत्या वाढला आहे. “मॅडम जाऊ नयेत” असे छोट्या-छोट्या मुलांनीही जिल्हाधिकाऱ्यांसमोर भावपूर्णपणे व्यक्त केले, तर काही विद्यार्थ्यांच्या अश्रूंनी उपस्थितांची भावना गहिरीत केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या भावनिक अपीलवर गांभीर्याने लक्ष दिले आणि विद्यार्थी व पालकांशी थेट संवाद साधून त्यांची बाजू ऐकली. त्यांनी या…
दुपारी झालेल्या हल्ल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेला धक्का साईमत /जळगाव / प्रतिनिधी शहरातील डॉ. आंबेडकर मार्केट परिसरात दुचाकी लावण्याच्या वादातून रविवारी दुपारी २७ वर्षीय चंदन संचानंद भारती यांच्यावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. या घटनेत चंदन गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या मित्रांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदन भारती (रा. कुंवर नगर, सिंधी कॉलनी) ५ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ४:१५ वाजता आंबेडकर मार्केटच्या मागील बाजूस गेले. तेथे दुचाकी लावण्याच्या कारणावरून चार अनोळखी तरुणांशी वाद झाला. वाद हळूहळू हाणामारीत रूपांतरित झाला आणि एका आरोपीने धारदार शस्त्राने चंदन यांच्या कमरेखाली दोन वार केले. तर दुसऱ्या आरोपीने त्यांच्या डोक्यावर फायटरने…
कोव्हिड काळाप्रमाणे धोरणशून्य कारभार; गरीब आणि प्रवासी मजुरांना स्वयंपाकासाठी सिलिंडरही मिळत नाही साईमत / नवी दिल्ली देशभरात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवत असून स्वयंपाकासाठी नागरिकांना सिलिंडर मिळत नाही, अशी गंभीर स्थिती उभी आहे. यावर विरोधक म्हणून सतत आवाज उठवत आहोत, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही पावलं उचलत नसल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एलपीजी तुटवड्याबाबत कुठलंही धोरण नाही. लोकांकडे चूल पेटवायलाही पैसे नाहीत. तरीही पंतप्रधानांचा कारभार कोव्हिड काळातील नीतीशून्य कारभारासारखाच आहे.” एलपीजीच्या तुटवड्यामुळे सर्वाधिक फटका गरीब लोकांना आणि प्रवासी मजुरांना बसला आहे, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधींच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे…