धार्मिक प्रवास ठरला अखेरचा; कार अपघातात ठाकूर कुटुंबावर शोककळा साईमत भुसावळ प्रतिनिधी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये श्याम विक्रम ठाकूर (४५), शोभा विक्रम ठाकूर (६०) आणि पाच वर्षीय शिवन्या श्याम ठाकूर यांचा समावेश आहे. ठाकूर कुटुंबीय उज्जैन, ओंकारेश्वर आणि सिहोर येथे धार्मिक दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून आपल्या मूळ गावी परतत असताना पहाटेच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर पलटी झाली. अपघाताची तीव्रता…
Author: saimat
नाहाटा कॉलेज परिसरात थरार, चालक थोडक्यात बचावला साईमत भुसावळ प्रतिनिधी शहरात आज दुपारी एक अत्यंत थरारक आणि भीषण घटना घडली. जामनेर रोडवरील नाहाटा कॉलेज परिसरात चालत्या रिक्षाला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. काही क्षणांतच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण रिक्षाला वेढा घातला आणि पाहता पाहता वाहन जळून खाक झाले. सुदैवाने रिक्षा चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रिक्षातून अचानक धूर आणि ज्वाळा उठू लागल्याचे लक्षात येताच चालकाने तातडीने रिक्षा थांबवून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अक्षरशः जीव वाचवणारा ठरला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील…
साईमत / उत्तर प्रदेशा उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील छावनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. मलौली गोसाई गावात एका लग्नसमारंभादरम्यान केटरिंग कामगार आचाऱ्याने रागाच्या भरात 11 वर्षीय मुलाला पेटत्या तंदूरमध्ये फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लखनऊ मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चमन (वय 11) हा आपल्या आजीसोबत नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. लग्नात खेळत असताना तो जेवणाच्या ठिकाणी गेला आणि तिथे ठेवलेले रसगुल्ले खाऊ लागला. याच कारणावरून केटरिंग काम करणारा आचारी संतापला. आरोपीने संतापाच्या भरात मुलाला पकडून थेट पेटत्या तंदूरजवळ नेले आणि त्याला तंदूरमध्ये फेकल्याचे सांगितले…
साईमत / आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली असून, कौटुंबिक वादाने भयावह वळण घेतल्याचे चित्र दिसत आहे. मुप्पल्ला मंडलमधील थोंडपी गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेल्लेपु लक्ष्मैया या रोजंदारी मजुराने आपल्या पत्नीवर अवैध संबंधांचा संशय घेतला होता. या संशयातून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. गुरुवारी (दि. घटना) हा वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात आरोपीने पत्नी भूलक्ष्मी हिच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला. हल्ल्यानंतर आरोपीने धक्कादायक कृत्य करत कापलेला पाय हातात घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले आणि आत्मसमर्पण केले.…
जळगावला दिलासा: टँकर नाही, पाणी-वीज सेवा सुरळीत ठेवण्यावर भर साईमत जळगाव प्रतिनिधी उन्हाळ्याच्या तीव्रतेत नागरिकांना पाणी व वीज या अत्यावश्यक सेवांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून अखंडित सेवा द्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन सभागृहात पाणीटंचाई व महावितरणशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री उपस्थित होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पाणीपुरवठा योजनांच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित…
साईमत / जळगांव जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. गुरुवारी (१६ एप्रिल) मोसमातील सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र ही परिस्थिती अजून तीव्र होण्याची शक्यता असून पुढील ४८ तास अधिक कठीण ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १७ आणि १८ एप्रिल रोजी तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उष्णतेची ही लाट पुढील काही दिवसांनंतर हवामानातील बदलांसोबत कमी होण्याची शक्यता…
धक्कादायक प्रकार अंतिम सामन्यात थेट मैदानावर नांगर फिरवल साईमत धरणगाव प्रतिनिधीजळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे सुरू असलेल्या ‘जळगाव ग्रामीण आमदार चषक’ क्रिकेट स्पर्धेला रविवारी अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक वळण लागले. अंतिम सामना सुरू असताना अचानक एका व्यक्तीने ट्रॅक्टर घेऊन थेट मैदानात प्रवेश केला आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळपट्टीवर नांगर फिरवून संपूर्ण सामना विस्कळीत केला. या घटनेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतिम सामना अत्यंत चुरशीच्या वातावरणात सुरू होता. खेळाडू विजयासाठी पूर्ण ताकदीने झुंज देत होते, तर प्रेक्षक उत्साहात सामना अनुभवत होते. मात्र काही क्षणांतच एका ट्रॅक्टरने मैदानात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला…
साईमत / वृत्तसंस्था इंडोनेशियामध्ये एक भीषण हेलिकॉप्टर अपघात घडला असून यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या सुमारे २४ तास आधीच हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मिळालेल्या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्याचे दिसून येत आहे. जंगलात कोसळल्यानंतर प्रशासनाने तत्काळ बचाव आणि मदतकार्य हाती घेतले. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, बोर्नियो बेटावरील पाम तेलाच्या मळ्यांवरून उड्डाण करत असताना ही दुर्घटना घडली. रडार संपर्क तुटल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. संबंधित हेलिकॉप्टर एअरबस H130 मॉडेलचे असून ते पीटी मॅथ्यू एअर नुसंतारा या कंपनीच्या मालकीचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हेलिकॉप्टर नेमके कुठे जात होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सीएनएन इंडोनेशियाच्या वृत्तानुसार, उड्डाणासाठी सुमारे…
साईमत / जळगांव राज्यातील एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण घोषणा करत येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर दौऱ्यात दिली. यासोबतच, एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बस टप्प्याटप्प्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दाखल होणार असून त्यामुळे एसटी सेवेत लक्षणीय वाढ होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे बस स्थानकांवरील कॅन्टीनमध्ये माफक दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे. आता कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे.…
लाचखोरी प्रकरणानंतर नाईक बडतर्फ, निरीक्षकांची तातडीने बदली साईमत जळगाव प्रतिनिधीशहरातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आणि त्यातच उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणामुळे शनिपेठ पोलीस ठाण्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कठोर भूमिका घेत पोलीस नाईक विनोद अहिरे याला सेवेतून थेट बडतर्फ केले असून, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शनिपेठ परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनांमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, पोलीस नाईक विनोद अहिरे याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.…