Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी स्वायत्त जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागातील विविध अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय आलेल्या विध्यार्थ्यांना गोल्ड व सिल्वर मेडल देवून सन्मानित करण्यात आले. तसेच “पीअर टीचर” म्हणजेच हा प्रोग्राम विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करण्यास मदत करते जसे महाविद्यालयात सध्याला शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात तसेच प्रॅक्टिकल ज्ञानात अधून मधून भर घालत मार्गदर्शन करणाऱ्या सिनिअर विध्यार्थ्यांना पीअर टीचर्स म्हणतात अशा विध्यार्थ्यांचा शोध घेत या कार्यक्रमात त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी आर.सी.पटेल फार्मसीचे प्राचार्य व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. संजय सुराणा…

Read More

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अथवा सुरुवातीच्या पहिलया दिवशी गोवत्सद्वादशी अर्थात वसुबारस हा सण सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी गाईची पाडसासह पूजा, अर्चा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवंत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत असल्याने सर्व ठिकाणी पूजा करण्यात आली. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत. त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घातली जाते. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घातला जातो. अशा पद्धतीने शहरासह ग्रामीण भागात रितीरिवाजानुसार वसूबारस सण सर्वत्र साजरा करण्यात आला.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी गोदावरी फाउंडेशन संचलित इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च जळगाव आणि डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन महाविद्यालयात दिवाळी साजरी केली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी महालक्ष्मीचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा केली. याप्रसंगी ते म्हणाले की दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक. विद्यार्थ्यानी नेहमी अद्ययावत राहून नवीन ज्ञान आत्मसात करून दुर्गुणावर मात करू असा संकल्प करायला पाहिजे. यावेळी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ वर्षा पाटील वुमेंस कॉलेज ऑफ कॉम्प्युटर प्लिकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ निलिमा वारके यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थीत होते.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय इसमाचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर उल्हासराव चंद्रराव पाटील (वय-५२) हे पत्नी, दोन मुलांसह राहिवासाला आहे. ते ममुराबाद येथील जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृदा चाचणी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून नोकरीला आहे. सध्या दिवाळी असल्याने गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये साफसाफाईचे काम करत होते. साफसाफाई करतांना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येत्या ११ व १२ नोव्हेंबर रोजी शनिवार, रविवारच्या सुट्ट्या आहेत. त्यास जोडूनच दीपावलीच्या काळात १३ ते १४ नोव्हेंबर दरम्यानही सुट्ट्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणची सर्व वीज बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी दिले आहेत. या शिवाय, महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थाळावर जाऊन view and pay bill वरही ग्राहकांना वीजबिल भरता येईल. महावितरण मोबाईल ॲपसह इतर सर्वच ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या ग्राहकांना त्यांची वीजदेयके ऑनलाईन भरता येतील.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दिवाळी उत्साहा मध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अविनाश धर्माधिकारी, शाळेचे प्राचार्य प्रविण सोनवणे, समन्वयिक संगीता तळेले , स्वातीअहिरराव, अनघा सागडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी हेम पाटील ,पार्थ नारखेडे, ऋषिकेश बारी, पियुष करडे देवेश पाटील देवंश जैस्वाल, श्रुती बराठे,हितांश पाटील अन्वेषा देशपांडे, मिथिलेश वाघ, कृष्णा चौधरी, कुलश्री कुलकर्णी प्रत्यूशा शर्मा, अन्विता सोनवणे, खुशी पुष्पकुमार मुंधरा, लीशा फुलफगर या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पाच दिवसाचे महत्त्व सांगितले. संगीत शिक्षक गणेश देसले तसेच ओजस्विनी देसले या विद्यार्थिनीने दिवाळीचे गीत सादर केले तर इयत्ता चौथीची वैष्णवी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाची विद्यार्थिनी गायत्री ठाकूर हिची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हेरिटेज सौंदर्यवती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गायत्री ठाकूर हिने गतवर्षी “मिस हेरिटेज ऑफ इंडिया” हा राष्ट्रीय किताब पटकावला होता. आपला अभ्यासक्रम पुर्ण करतांना भारतातील वारस स्थळे, शिल्पकला, जगप्रसिध्द अंजिठा बुध्द लेण्यातील चित्रकला या अनुषंगाने देशभर ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जागृतीचे कार्य केले. यावर्षी थायलँड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हेरिटेज सौंदर्यवती स्पर्धेसाठी गायत्री ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या यशाबद्दल प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. अजय पाटील, विभागप्रमुख प्रा. राकेश रामटेके, डॉ. विजय घोरपडे, डॉ. समाधान बनसोडे आदीनी अभिनंदन केले.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व राज्यशासनाच्या निर्देशानुसार शहरातील वायु प्रदूषणात वाढ होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असून दिवाळीच्या पार्श्वभूमिवर शहरात १२५ डेसीबलच्यावर आवाज असलेल्या फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी १२५ डेसीबल पेक्षा जास्त आवाजाचे फटाके विक्री करतांना किंवा फोडतांना आढळून आले तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मनपाच्या सहाय्यक आयुक्त अश्विनी भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, शहरात रात्री ७ ते १० वाजेपर्यंत कमी आवाजातील फटाके येतील परंतु मोठ्या आवाजाचे फटाके फोडतांना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी  महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी आज केलेला सामजंस्य करार महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असे पर्यटनमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन वाढीसाठी मॉरिशस प्रजासत्ताकचे पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी मॉरिशसच्या पर्यटन मंत्रालयचे दुष्यंतकुमार बकोटवार, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री.महाजन म्हणाले, महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये झालेला सामंजस्य करार हा पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.दोन्ही प्रदेशातील पर्यटन-संबंधित उद्योग वाढवण्याच्या उद्देशाने पर्यटन क्षेत्रातील क्षमता वाढविणे,परस्पर भेटी, बैठका आणि सुसंवाद दृढ करणे,आपल्या क्षेत्रातील अनुभव, कौशल्य आणि सर्वोत्तम यशोगाथांची माहिती देणे यावर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी रमाई घरकुल आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना असून ज्यांना निवासाची व्यवस्था नाही अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या व सर्वसामान्यांना नागरिकांना स्वतःच्या जागेवरती राज्य सरकार पक्क्या स्वरूपाची घरबांधणीची व्यवस्था करून देत असल्याने ही योजना वरदान ठरत असल्याचे माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १८४५ घरकुलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. तालुका निहाय मंजूर घरकुले जळगाव…

Read More