Author: Saimat

साईमत लाईव्ह फैजपूर  प्रतिनीधी येथून जवळच असलेल्या आमोदा येथील रहिवाशी पूजा पाटील, अरुणा तायडे, धीरज चौधरी असे तीन जीवांचे गेल्या पंधरा दिवसात अकस्मात निधन झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा गावावर शोककळा पसरली आहे. पूजा निलेश पाटील या किडनीच्या आजाराने चार महिने झाले आजारी होत्या. पती निलेश पाटील हा नाशिक येथील कंपनीमध्ये नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तर निलेश चे वडील सुरेश पाटील हे शेतकरी व्यवसाय करतात घरी जेमतेम शेती असल्याने व दोन मुले असल्याने त्यांनी  निलेश यास उदरनिर्वाहासाठी नाशिक येथे नोकरीस पाठवले. त्याचे लग्न लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील पूजाशी लावण्यात आले. पूजाचे आई-वडील हे आधीच मृत्यू पावलेले असून तिला…

Read More

आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणाऱ्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्‍यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे. त्यामुळे साधना करणार्‌या जिवासाठी हा…

Read More

साईमत लाईव्ह मलकापूर  प्रतिनिधी तालुक्यातील रणगाव-भालेगाव येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन तरुणांमधील किरकोळ कारणाचा शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने एका २८ वर्षीय तरुणाने ३५ वर्षीय तरुणाचा लोखंडी सुरा भोसकत जीवे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मलकापूर तालुक्यातील रणगाव-भालेगाव येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ग्रामस्थ भोजन आटोपून चौकात गप्पा मारत असतांना प्रदिप पद्माकर वानखेडे (वय ३५) व अशांत उर्फ कडू अशोक वानखेडे (वय २८) या दोन तरुणांमध्ये कसल्यातरी किरकोळ कारणावरुन शाब्दीक वाद सुरु झाला. हा शाब्दीक वाद शब्दाशब्दाने पुढे जात…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अस्तितकुमार पांडेय यांनी तहसीलदार रमेश जसवंत यांना गुरुवारी दिले. सोयगाव तालुक्यातील सोयगाव, जरंडी, बनोटी आणि सावळदबारा या चारही मंडळात सलग चार दिवस अतिवृष्टी झाली या पावसाने कपाशी,मका, सोयाबीन ज्वारी बाजरी आदी पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे, परंतु पंचनामा करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत होती गुरुवारी जिल्हाधिकारी अस्तितकुमार पांडेय यांनी याबाबत आदेश दिल्यानंतर तहसीलदार रमेश यशवंत यांनी सायंकाळी सहा वाजता आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली यामध्ये महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पारदर्शक पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या तालुक्यातील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचा…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी (भूषण पाटील) महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. पण आता शिंदे- फडणवीस सरकार ने हा नियमांमध्ये बद्दल केले. महाविकास आघाडी सरकार असताना केंद्रातील सरकार तपास यंत्रनेचा गैरवापर करत आहे असे आरोप होते. त्यानंतर २१ आॅक्टोबर २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकार ने सीबीआयबाबत मोठा निर्णय घेतला होता. त्या साठी सरकार ला राज्य सरकार ची परवानगी घ्यावी लागत होती. एकनाथ शिंदेनी बंड केल्यामुळे मात्र काही दिवसांपुर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात शिंदे गटाने भाजपा सोबत सरकार स्थापन केले. शिंदे सरकार महाविकास आघाडी ने घेतलेले सर्व निर्णय धुळकावत लावत आहे. त्यात…

Read More

साईमत लाईव्ह  उस्मानाबाद प्रतिनिधी:- नळदुर्ग-आयुष्मान भारत ही आरोग्याशी निगड़ित महत्वपूर्ण योजना असून, केंद्र सरकारने सन २०१८ साली याची घोषणा केली होती. परंतु सन २०१०-११ च्या जनगणनानुसार सर्व्हे केल्याचे समजत आहे. वास्तविक पाहता आताच्या जनगणनेनुसार सर्व्हे होणे अपेक्षित आहे. किंवा या योजनेसाठी स्वतंत्र सर्व्हे होऊन आर्थिक दृष्टया दुर्बल, गरजवंत, गरीब लोकांचा या योजनेत समावेश व्हावा कारण नळदुर्ग शहरातील आताच्या याद्या पाहल्या तर अनेक गरीब कुटुंबाची नावेच या योजनेत नाहीत. हा सर्व्हे नेमका कधी,कसा, कोणत्या आधारे झाला असा प्रश्न नागरिकातुन विचारला जात आहे. त्यामुळे या योजनेचा सर्वसामान्याना लाभ मिळवून देण्यासाठी स्वंतत्र सर्व्हे व्हावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री…

Read More

साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी:- नळदुर्ग येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने तयार केले इको फ्रेंडली आकाश कंदील. जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत अशा प्रकारचे उपक्रम वर्षभर घेतले जातात. नळदुर्ग येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा शहरांतील सर्वात जुनी शाळा आहे. या शाळेची गुणवत्ता दर्जेदार व चांगली आहे. त्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. दिवाळीच्या सुट्टीपुर्वी कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांला आकाश कंदील घरातुन तयार करून आणण्यास सांगितले होते. हे आकाश कंदील इको फ्रेंडली असावेत असे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने अतीशय सुंदर व विविध प्रकारचे इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करून आणले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अशा वस्तु तयार करण्याची आवड निर्माण होते.…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी (आमीन पिंजारी)  कर्तव्य दक्ष वर्ग एक चे अधिकारी हे जनतेच्या सेवे करीता २४ तास सेवेत असतात. मात्र भडगाव येथिल गट विकास अधिकारी यांनी ऑन ड्युटी शासकीय वाहनाने(MH19M0742) कजगावं च्या हॉटेल मधे येऊन भर दिवसा दारू पार्टी केली. आधीच भडगाव पंचायत समितीवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. अशात हा ऑन ड्युटी दारू पार्टी चा प्रकार म्हणजे एखादे प्रकरण रफादफा तर होत नाहीं ना याची शंका आहे. सोबतच वर्ग एक चे ऑन ड्युटी वरिष्ठ अधिकारी ज्या लोकांसोबत दारू पार्टी करत बसले होते ते लोक कोण हा मोठा प्रश्न पडला आहे. नुकताच मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशियाना यांचा भडगाव…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी (भूषण पाटील) T20 World Cup 2022 ला सुरुवात झाली आहे. यावेळी टीम इंडिया आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. याआधी सराव सामने खेळवले जात आहेत. यामध्ये भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला होता. आता दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. यापूर्वी महान खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) यावेळी कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील हे सांगितले. 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघांच्या यादीत सचिनने भारताचे नावही नोंदवले आहे. एका न्यूज वेबसाईटच्या बातमीनुसार, सचिनने या यादीत भारतासोबतच पाकिस्तानचाही समावेश केला आहे. या दोन संघांशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे.  भाजपच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे वेगळं वळण मिळालं. त्यानंतर वेगाने घडामोडी सुरु झाल्या आणि अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांना ही माहिती दिली. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी…

Read More