• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • पर्यटन
  • ई – पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • पर्यटन
  • ई – पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result
Home धार्मिक

धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीचे महत्त्व

Saimatlive by Saimatlive
October 22, 2022
in धार्मिक
0
धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीचे महत्त्व
Share on FacebookShare on Twitter

आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणाऱ्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती.
हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्‍यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे. त्यामुळे साधना करणार्‌या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला जातो. साधनेसाठी अनुकूलता आणि ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतात. वर्षभर योग्य मार्गाने धन कमवून वार्षिक उत्पन्नाचा 1/6 भाग धर्मकार्यासाठी अर्पण करावा.
या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.
धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम 1/6 भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.’  परात्पर गुरु पांडे महाराज पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता आणि राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न करता देत असे. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. ‘सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबलही वाढत असे.
धन्वंतरि जयंती
‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसऱ्या हातात ‘जळू’, तिसऱ्या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरि करतो.
वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
यमदीपदान
प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्‍यामयासह ।
त्रयोदश्‍यांदिपदानात्‌ सूर्यजः प्रीयतां मम ॥
यमदीपदान सूर्यास्तानंतर करणे म्हणजेच साधारणपणे सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत करणे. याला लाभाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. नंतरचा काळ गौण भाग आहे. गौण भाग जरी असला, तरी त्या वेळेत सुद्धा यमदीपदान करू शकतो.
‘धनत्रयोदशीला श्री लक्ष्मीतत्व पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येते. या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा करतांना सध्या लोक पैसे (नाणी, नोटा), दागिने या स्वरूपात करतात. या कारणाने श्री लक्ष्मीची कृपा खर्‌या अर्थाने त्यांना प्राप्त होत नाही. केवळ स्थूल धनाचे पूजन करणारा जीव मायेच्या पाशात अडकतो आणि ‘साधना करून मोक्षमिळवणे’, हा मनुष्यजन्माचा मूळ उद्देश विसरतो. या दिवशी श्री लक्ष्मीचे ध्यान आणि शास्त्र संमत पद्धतीने पूजन करणे अपेक्षित असते.’
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ
‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

ShareTweetSendShare
Previous Post

तरुणांचा किरकोळ वाद भोवला ;एकाचा सुरा भोसकुन निर्घुण खून

Next Post

ऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा परिसरावर शोककळा…

Saimatlive

Saimatlive

Next Post
ऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा परिसरावर शोककळा…

ऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा परिसरावर शोककळा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + eight =

Stay Connected

ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest
भडगाव पोलिसांची कामगिरी 48 तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

भडगाव पोलिसांची कामगिरी 48 तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

June 27, 2022
सार्वजनिक बांधकाम विभाग बनले सार्वजनिक वर्गणीचे ठिकाण

सार्वजनिक बांधकाम विभाग बनले सार्वजनिक वर्गणीचे ठिकाण

March 2, 2022
कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, ११ महिलांवर गुन्हा दाखल

कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, ११ महिलांवर गुन्हा दाखल

December 23, 2021
Alert : पुढील 48 तास मुसळधार पावसाचे, 3 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Alert : पुढील 48 तास मुसळधार पावसाचे, 3 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

July 13, 2022
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा जादूचा आकडा पार

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा जादूचा आकडा पार

1
प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण सन्मान परत केला

प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण सन्मान परत केला

0
जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम- मोहन भागवत

जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम- मोहन भागवत

0
एमडीएच मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन

एमडीएच मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन

0
रामनवमी निमित्ताने शुभ आरंभ फाऊंडेशनतर्फे बेघर निवारा केंद्रात भोजन वाटप

रामनवमी निमित्ताने शुभ आरंभ फाऊंडेशनतर्फे बेघर निवारा केंद्रात भोजन वाटप

March 31, 2023
उमरगा येथे वर्षभरात सहा खून … कायदा व सुव्यवस्था बिघडली

उमरगा येथे वर्षभरात सहा खून … कायदा व सुव्यवस्था बिघडली

March 31, 2023
पहूर शेंदुर्णी महामार्गावर शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेची बस उलटली ; ३० विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक जखमी

पहूर शेंदुर्णी महामार्गावर शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेची बस उलटली ; ३० विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक जखमी

March 31, 2023
ध्येयवाद व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या ‘नाएसो’ची शतकपूर्ती

ध्येयवाद व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या ‘नाएसो’ची शतकपूर्ती

March 31, 2023

Recent News

रामनवमी निमित्ताने शुभ आरंभ फाऊंडेशनतर्फे बेघर निवारा केंद्रात भोजन वाटप

रामनवमी निमित्ताने शुभ आरंभ फाऊंडेशनतर्फे बेघर निवारा केंद्रात भोजन वाटप

March 31, 2023
उमरगा येथे वर्षभरात सहा खून … कायदा व सुव्यवस्था बिघडली

उमरगा येथे वर्षभरात सहा खून … कायदा व सुव्यवस्था बिघडली

March 31, 2023
पहूर शेंदुर्णी महामार्गावर शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेची बस उलटली ; ३० विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक जखमी

पहूर शेंदुर्णी महामार्गावर शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेची बस उलटली ; ३० विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक जखमी

March 31, 2023
ध्येयवाद व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या ‘नाएसो’ची शतकपूर्ती

ध्येयवाद व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या ‘नाएसो’ची शतकपूर्ती

March 31, 2023
Saimat Live

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized
  • अमळनेर
  • अहमदनगर
  • अहमदाबाद
  • आयुर्वेद
  • आरोग्य
  • आर्थिक वार्ता
  • ई – पेपर
  • उस्मानाबाद
  • एरंडोल
  • औरंगाबाद
  • करिअर
  • कासोदा
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • गोंदिया
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • ठाणे
  • तंत्रज्ञान
  • देश
  • देश- विदेश
  • धरणगाव
  • धानोरा
  • धार्मिक
  • धुळे
  • नंदूरबार 
  • नाशिक
  • निधन वार्ता
  • पर्यटन
  • पर्यावरण
  • पाचोरा
  • पारोळा
  • पाळधी
  • पुणे
  • फैजपूर
  • बुलढाणा
  • बोदवड
  • भडगाव
  • भुसावळ
  • मनोरंजन
  • मलकापूर
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यवतमाळ
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • वरणगाव
  • वैभववाडी
  • व्हिडीओ
  • शेंदुर्णी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • सिंधुदुर्ग
  • सोयगाव
  • हिंगोली

Recent News

रामनवमी निमित्ताने शुभ आरंभ फाऊंडेशनतर्फे बेघर निवारा केंद्रात भोजन वाटप

रामनवमी निमित्ताने शुभ आरंभ फाऊंडेशनतर्फे बेघर निवारा केंद्रात भोजन वाटप

March 31, 2023
उमरगा येथे वर्षभरात सहा खून … कायदा व सुव्यवस्था बिघडली

उमरगा येथे वर्षभरात सहा खून … कायदा व सुव्यवस्था बिघडली

March 31, 2023
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Copyright © 2022 SaimaltLive | Website maintained by JC Techsoft Solution

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • पर्यटन
  • ई – पेपर

Copyright © 2022 SaimaltLive | Website maintained by JC Techsoft Solution

error: Content is protected !!

https://chat.whatsapp.com/DKtI0k5E6gZ1Jq65akdFzf

WhatsApp