साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील गायरान आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १७५ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, पुरुषांना कपडे,ब्लॅकेट, आंघोळीचे रुमाल, स्वेटर, फराळ, शैक्षणिक साहित्य,गहू तांदूळ, पणत्या, साबण, अगरबत्ती, बिस्किट, चॉकलेट आणि यांचे वाटप करण्यात आले. दीपाेत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद तर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गाेड करू या’ असे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांतर्गत गाेळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील गायरान येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला.यंदा उपक्रमाचे सातवे वर्ष होते. उपक्रमाचे दाते राजेश्वरी संधानशिवे, हर्षद महाजन, दीपक चौधरी, राजेश…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. अशा शब्दात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमा केली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना सुषमा अंधारे यांनी अनेक दिग्गज नेत्यांची उपमा दिवाळी फराळाशी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेथीच्या लाडूसारखे राजकारणात पौष्टिक आहेत. तर उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत, असं अंधारे म्हणाले. शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली. तर राजकारणातले रॉकेट शंकरपाळे गुलाब जामून यासह…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी- प्रेमातून पळवून नेत कुंटणखान्यात ढकललेल्या तरुणीची सुटका केल्याच्या कामाची रोटरी क्लबने दखल घेत जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अंमलदार योगिता पाचपांडे यांना सन्मानपत्र देऊन गौरविले. रोटरी क्लबच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष राजेश वेद, मानद सचिव गिरीश कुळकर्णी, कॅप्टन मोहन कुळकर्णी, डॉ. कीर्ती देशमुख व पूनम मानुधने उपस्थित होत्या. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या तरुण-तरुणीने प्रेमाच्या आणाभाका घेत पलायन केले होते. पुण्यात त्यांनी काही दिवसच संसार केला. ानंतर या तरुणाने त्याच्या नातेवाईक महिलेच्या माध्यमातून या तरुणीला कुंटणखान्यात ढकलले होते. तेथून तिची सुटका होणे अवघड होते. यासंदर्भात तालुका पोलिसांत संबंधित तरूणी हरविल्याची नोंद होती. या मुलीवर ओढवलेल्या…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण राजकारणातले फटाके कोणत्याही वेळी फुटत असतात. असे म्हणत शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज असून, यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपमध्ये विलीन करून घेतील. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असा खोचक सवाल शिवसेनेने विचारला आहे. “शिंदे यांचा रामदास आठवले होईल, हे त्यांच्याच गटातील एका नेत्याने खासगीत केलेले विधान बोलके आहे. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. शिंदे यांनाही उद्या भाजपमध्येच विलीन व्हावे लागेल व त्यावेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील, हे भाजपचे नेते सांगत आहेत. मग शिंदे यांनी…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी :- शहर पोलिसांकडून जिल्हा दूध संघाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संघात जाऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतली. याबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, जिल्हा दूध संघाने दाखल केलेल्या तक्रारीची अजूनही नोंद झाली नाही आणि याचाच जिल्हा दूध संघात तपास सुरू आहे. पोलिस नेमका कशाचा तपास करीत आहे. त्यांनी दहा ट्रक कागदपत्रे घेऊन जावीत; परंतु गुन्हा आगोदर नोंद करावा, याबाबत आम्ही न्यायालयात अवमान याचिकाही दाखल केली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. पुढे खडसे यांनी सांगितले की, जिल्हा दूध संघात पोलिस पाच वर्षांच्या कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. वास्तविक हा चोरीचा गुन्हा आहे,…
साईमत लाईव्ह मलकापुर प्रतिनिधी पोलीस स्टेशन बोराखेडी ता . मोताळा येथील स.पो.नि. विकास पाटील यांनी काही दिवसापुर्वी स.पो. नि . सुखदेव भोरकडे मलकापुर शहर यांना फोनव्दारे कळविले होते की , बोराखेडी पो.स्टेशनला दाखल गुन्हा.क्रं .२६७/२०२२ कलम ४६१,३८०,३४ भा.दं.वि. प्रमाणे कृषि दुकानाचे शटर तोडून ऐन पेरणीचे वेळी सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा कृषि मुद्देमाल चोरुन नेल्याच्या गुन्हयातील एक आरोपी आरीफ खान कौसर खान (वय २५ वर्ष )हा मलकापुर शहर हद्दीतील राहणारा असुन तो गुन्हा घडल्यानंतर काही दिवस गाव सोडुन पळुन गेला होता; मात्र मागील काही दिवसांपासून तो मलकापुर शहरात ये जा करीत होता. त्यामुळे तो मिळुन आल्यास त्याला पकडुन…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील मौजे कंकराळा येथे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांचा औरंगाबाद जिल्हा नुकसान पाहणी दौरा दरम्यान कृषी मंत्री यांनी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर यामहिन्यात सतत पावसामुळे शेत पिकांचे ३३% टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे वस्तुस्थिती पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले, असून याबाबत स्वतः कृषी मंत्री शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांन सोबत संवाद केला व नुकसान झालेल्या बांधित पिकांची पाहणी केली. त्यावेळी कृषी मंत्री यांनी सांगितले की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत आहे एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले, त्यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी संदीप पाटील,…
साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी (करण शिंदे) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २१ नोव्हेंबर २०२१ घेतलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (महाटीईटी)अंतरिम निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना हा पेपर पहिला (इयत्ता १ली ते ५ वी गट) व पेपर दुसरा (इयत्ता ६वी ते ८वी गट) परिक्षेचा निकाल काल सायंकाळी ५ वाजेपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या हींींिी://ारहरींशीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांना गुणपडताळणी करायची असेल त्यांनी आपल्या लॉगइनमधून ५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. अन्य पध्दतीने विनंती किंवा नोंदणी मान्य केली जाणार नाही. ज्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत त्यांनी ५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत ऑनलाईन…
साईमत लाईव्ह धानोरा ता. चोपडा : वार्ताहर महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र अशा गड किल्ल्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील दुर्ग या प्रकारातील गड किल्यांपैकी एक असलेल्या चोपडा तालुक्यातील चौगाव येथील सुमारे सत्तावीस एकर मध्ये विस्तारलेला व साडे सहाशे मीटर उंच अशा विजयगडावर दर वर्षाप्रमाणे यावर्षीही 16 रविवारी सकाळी दहा वाजता गड पुजनाचा कार्यक्रम राजा शिवछत्रपती परीवाराचे विभागीय अध्यक्ष डॉ.संतोष पाटील,ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.पंकज शिंदे ,खान्देश एक्सप्लोर टिमचे सदस्य प्रा.संजय बारी ,पिपल्स बँकेचे अडावद शाखेचे शाखा प्रमुख गुजराथी ,शिवशंभू प्रतिष्ठाने जिल्हाध्यक्ष विश्राम तेले,अक्षय महा ई…
साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी जामीनावर सुटलेले आरोपी यांनी नियम व शर्तीचा भंग केल्याने ते गावातून मलकापूरकडे येत असल्याची माहिती मिळाल्यावरून गावातील नागरिकांनी वडजी ते मलकापूर ही बस थांबवून त्या आरोपींना मलकापूर शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिल्याची घटना घडली. तर हद्दीतील आरोपींना ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आले तर बस थांबविल्याच्या कारणावरून चालक यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मोताळा तालुक्यातील मौजे निपाणा येथील एका प्रकरणामध्ये मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये आरोपींपैकी तीन महिला व दोन पुरुष बळीराम तांदुळकर, विनोद सिताराम तांदुळकर हे न्यायालयाच्या जामीनावर नियम, शर्ती, अधीन राहून बाहेर आलेले होते. त्यांना…