साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहरातील ख्वॉजामिया दर्गाजवळील मोकळ्या जागेत गांजाचा नशा करणाऱ्या एका तरूणावर जिल्हापेठ पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गणेश कॉलनी भागातील ख्वॉजामिया दर्गा परिसरात असलेल्या भिंतीच्या आडोश्ाात रहिम निसार बिस्ती (वय-37) रा. शाहूनगर, जळगाव हा तरूण अवैधरित्या गांजाचे सेवन करत असताना शनिवारी रात्री आढळून आला. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत नशाचे साहित्य त्याच्याकडून हस्तगत केले. त्यानंतर पोकॉ कैलास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रहिम बिस्ती याच्याविरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.
Author: Saimat
साईमत सावदा तालुका रावेर प्रतिनिधी येत्या २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सी.टी.इ.टी.परीक्षेच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेत बसणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे. ही परीक्षा त्यांना अवघड जाऊ नये, यासाठी येथील सोहेल खान फाउंडेशनच्या वतीने एक दिवशी सी.टी.इ.टी.मार्गदर्शन शिबीर शहरातील ख्वाजा नगर हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. सोहेल खान फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल खान सैईदुल्ला खान,अय्यूब सर, पत्रकार फरीद शे, युसूफ शाह आदींनी सदर शिबीराचे आयोजण केले होते. शिबिरास जिल्ह्याभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक अली अंजूम रिज़वी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कॅम्पचे अध्यक्षस्थानी सावदा येथील डॉ.अन्सार खान गुलाम गौस खान होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा राष्ट्रवादीची मझहर खान, जळगाव उदगटृष्टीचे अनीस शाह, शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष…
साईमत भुसावळ प्रतिनिधी शहरातील तापी नदीकाठावरील महादेव मंदिराजवळ तीन दिवसीय पुरूष जातीचे मृत अर्भक आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. मृत अर्भक तापीच्या पाण्यात वाहून आले असावे किंवा अज्ञात मातेने आणून टाकले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. तापी नदीकाठावरील महादेव मंदिराजवळील मोकळ्या जागेत पुरूष जातीचे तीन दिवसीय बालकाचे मृत व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन याप्रकरणी सोनी सपकाळे (२९, भिलवाडी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार फिरोज रज्जाक तडवी करत आहे.
साईमत सोयगाव प्रतिनिधी तालुक्यातील फर्दापूर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांची 3 कोटी 75 लाख अडकले असून याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना ठेवीदारांनी लेखी निवेदन देऊन पत संस्थेत अडकलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी करून रक्कम परत न मिळाल्यास आमच्या कडे आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नसल्याची खंत व्यक्त केली आहे. दोनशे दोन कोटींचा घोटाळा उघड झालेल्या व सध्या अटकेत असलेल्या अंबादास मानकापे यांच्या आदर्श नागरी पतसंस्थेची फर्दापूर येथे एकमेव शाखा आहे या शाखेत फर्दापूर परिसरातील छोटे व्यापारी, शेतकरी मजूर कष्टकरी सेवानिवृत्त कर्मचारी व्यावसायिक असे साडे तीनशे पेक्षा जास्त सभासदांनी आपली फिक्स डिपॉजिट सेविंग व पिग्मी अशी वेगवेगळी खाते उघडून आपली…
साईमत सावदा प्रतिनिधी सावदा येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर, श्री.आ. गं. हायस्कूल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात स्व.नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरीब व होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी दादासाहेब वसंतराव विष्णू पाटील औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मनोज पाटील, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे, मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे , उपनगराध्यक्क्षा नंदाबाई लोखंडे, शिक्षक पालक संघाचे सदस्य शामकांत पाटील, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कल्पना ठोसरे , श्रीकांत वाणी, बी.जी. भालेराव, जे.व्ही. तायडे आदिंची उपस्थिती होती. श्री.आ. गं. हायस्कूलच्या इयत्ता सहावी तुषार कोळी, योगेश चौधरी, तन्मय अजहर शहा फकीर, इयत्ता सातवी कार्तिक साळी, आदित्य सरोदे, फाल्गुन…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी यशासाठी मेहनत घेण्याची नेहमी तयारी ठेवली पाहिजे. मेहनतीतूनच आपल्याला अपेक्षित यश मिळत असते. यशासाठी कुठलाच शॉर्टकट नाही. निरंतर अभ्यास आणि अपेक्षित यश असे हे समीकरण असून विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार राजूमामा भोळे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हटकर समाज प्रगती मंडळ, धनगर समाज उन्नती मंडळ आणि सकल धनगर समाज मौर्य क्रांती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी आ. राजूमामा भोळे उपस्थित होते. प्रसंगी मंचावर आ. लताताई सोनवणे, माजी आ. स्मिता वाघ, माजी…
साईमत भुसावळ प्रतिनिधी मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील अल्पवयीन तरुण – तरुणी रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने त्यांना ताब्यात घेत समतोल प्रकल्पाच्या स्वाधीन केले. मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील विजय राघवगढ (खलवारा) येथील १७ वर्षीय मुलगी व १६ वर्षांचा मुलगा शाळेतून कोणालाही काहिही न सांगता रेल्वेतून पसार होताना भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर आढळून आले, त्यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी ताब्यात घेत विचारपूस करत ताब्यात घेतले होते. दरम्यान, शाळेच्या ड्रेसवरच हे विद्यार्थी बाहेर पडले होते. विद्यार्थिनी व विद्यार्थी या दोघांनी मित्र असल्याचे सांगत आम्ही शाळेत कोणालाही काही न सांगता तेथून निघून आल्याचे सांगत सुरतला जात…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी मानवी आरोग्याला आवश्यक असणारी खनिजे, महत्त्वाची अन्नद्रव्ये व अनेक औषधी गुणधर्म फक्त रानभाज्यांमध्ये आढळून येतात. आपल्या संस्कृती, परंपरेतून आलेल्या भाज्या म्हणून आपण रानभाज्यांना ओळखतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी मायादेवी नगरातील रोटरी हॉल व परिसरात आयोजित रानभाजी महोत्सवात केले. प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर, आत्माचे प्रकल्प संचालक पांडुरंग साळवे, रोटरीच्या सरिता खाचणे, मुनीरा तरवारी,…
साईमत फैजपूर प्रतिनिधी शासनाच्या ‘झाडे लावा, झाडे जगवा…’ या अभियानाला अनुसरून येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज स्व-खर्चाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करीत असून परिसरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षारोपण करून ती जगवत आहे. वृक्षारोपण करून जबाबदारी न झटकता त्यांचे संगोपन होत आहे, की नाही हे ही ते पाहत असतात. यावर्षी त्यांनी रोपवाटीकेतून तब्बल चारशे कडुलिंबाची मोठी रोपे विकत आणली. आणि ती शेताच्या बांधावर लावण्याचा संकल्प केला. तो आज पूर्णत्वास येत आहे. विशेष म्हणजे खड्डे खोदण्यापासून ते रोपण करणे पर्यंत स्व-खर्चाने मजूर लावून वढोडा परिसरातील शेताच्या बांधावर या सर्व वृक्षांची लागवड करण्यात येते आहे. ज्या प्रमाणात वृक्षांची…
साईमत फैजपूर प्रतिनिधी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुमारे पाच वर्षापासून बंद आहे. नंतर ही कारखान्याची यंत्रे काही कारणास्तव कायम स्वरूपाची बंद झालीत. परिणामी कारखान्यात कामकरणारे कर्मचारी देशोधडीला लागले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मुला – मुलींचे शिक्षण, कार्य ठप्प होण्याची मार्गावर आलीत. कोरोना सारख्या जगभर आलेल्या संकटामुळे आर्थिक चलनवलन बंद झाल्याने कर्मचाऱ्यांजवळील जमापुंजी संपुष्टात आली आहे. त्यासाठी कामावर जाण्याचे निवेदन मधुकर साखर कारखाना राष्ट्रीय कामगार युनियनचे सेक्रेटरी सुनील कोलते यांच्याकडे पटावरील कामगारांनी दिले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये जिल्हा सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू होईल, या आशेने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी कामगार,…