साईमत, मुंबई : प्रतिनिधी आयर्लंडविरुद्ध भारताच्या पहिल्या टी२० सामन्याच्या एक दिवस अगोदर जसप्रित बुमराह म्हणाला, जेव्हा दुखापत बरी होण्यास व्ोळ लागतो तेव्हा तो काळ हा खूप निराशाजनक असतो. मी स्वतःवर शंका घेण्याऐवजी तंदुरुस्त कसे व्हाव्ो आणि पुनरागमन कसे कराव्ो याचा विचार अधिक करत होतो. विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात पूर्ण १० षटके टाकण्यासाठी शरीराला व्ोळ आणि आराम देणे महत्त्वाचे होते. मी याला कधीही वाईट टप्पा म्हणून घेतले नाही. माझं करिअर संपलं असे मला एकदाही वाटलं नाही. मी या सर्व काळात माझ्या परिस्थितीवर उपाय शोधत होतो आणि जेव्हा उपाय सुचला तेव्हा माझ्या डोक्यातील विचार कमी झाले. व्ोगवान गोलंदाज जसप्रीत पुढे म्हणाला, जेव्हा तुम्ही…
Author: Saimat
साईमत, दुबई ः वृत्तसंस्था एकदिवसीय विश्वचषक २०११ नंतर प्रथमच भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. याव्ोळीही भारत घरच्या मैदानावर विश्वविजेता होईल, अशी आशा चाहत्यांना आहे. गेल्या दोन टी-२० विश्वचषकात भारताला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर म्हणतो की, भारताच्या कामगिरीचे प्रमुख कारण देशातील मीडिया आहे, जे संघावर दबाव आणते. याच दबावामुळे २०२१ साली भारताला पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. शोएब अख्तरने रेज स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतीय मीडिया आपल्या खेळाडूंची काळजी करत नाही. ते त्यांच्यावर खूप दबाव टाकतात जे चुकीचे आहे. रावळिंपडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू म्हणाला, मी मीडियाच्या लोकांना सांगू…
साईमत, अयोध्या ः वृत्तसंस्था राम मंदिर आंदोलनात बलिदान देणाऱ्या रामभक्तांनाही योग्य तो सन्मान दिला जावा, यावर ट्रस्टच्या बैठकीत गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. काही सदस्यांनी या राम भक्तांच्या मूर्ती ठिकठिकाणी बसवण्याचा प्रस्ताव मांडला आहे, तर काहींनी अयोध्येतील रस्त्यांना आणि चौकांना त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एका हिंदी दैनिकाने वृत्त दिले आहे. मंदिर आंदोलनात किती राम भक्तांना जीव गमवावा लागला, याची नेमकी संख्या माहीत नाही. जवळपास पाचशे वर्षे चाललेल्या राम मंदिर आंदोलनात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातो. १९९० च्या दशकापूर्वी आंदोलनात प्राण गमावलेल्या रामभक्तांची अचूक माहिती मिळणेही कठीण होऊ शकते. त्यांची संख्या देखील खूप जास्त असू शकते आणि…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील लॉर्ड गणेशा स्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे नुकत्याच तालुकास्तरीय शालेय शासकीय खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत १४ वर्ष मुले गटात दादासाहेब अ.चि. पाटील माध्यमिक विद्यालय, रोटवद तर १७ वर्ष मुले गटात नि. प. पाटील, पळासखेडा मिराचे विजयी ठरले आहेत. स्पर्धेत जामनेर तालुक्यातून १६ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन लॉर्ड गणेशा स्कूलचे प्रशासकीय संचालक सतीश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटवद अ. चि.पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.ए.पाटील, तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, विकास पाटील, डी.आर.चौधरी, हरिभाऊ राऊत,…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी येथील गोकुळधाम सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघ नगरात आ.राजूमामा भोळे यांच्या आमदार निधीतून हायमास्टचे लोकार्पण परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रमही घेण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विकी जगदाळे, किरण लाडवंजारी, योगेश सपकाळे, हेमंत मंडोले, विशाल जगदाळे, भीमराव सुरदास, गोविंदा शुक्ला, सचिन माळी, महेंद्र उदमले आदींची होती. रस्ते काँक्रिटीकरणाचे आश्वासन वृक्षारोपणा संदर्भात सुनील वाणी यांनी महत्त्व विशद केले. वृक्ष नागरिकांना पाहिजे असल्यास ते मोफत आम्ही पुरवू, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी आ.राजूमामा भोळे यांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर निराकरण करू. तसेच या भागातील रस्ते काँक्रिटीकरण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी कॉलनीतील रहिवासी पंकज…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील प.न.लुंकड कन्याशाळेच्या इ.पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना चांडक कॅन्सर हॉस्पिटलात मोफत कॅन्सर प्रतिबंधक लस देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या ५०० विद्यार्थिनींनी मोफत लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. यावेळी लसीकरण ठिकाणी लस घ्यायला जाण्यासाठी शाळेतूनच चांडक कॅन्सर हॉस्पिटलतर्फे वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. लस घेणे ऐच्छिक असल्यामुळे पालकांच्या संमतीने विद्यार्थिनींना ही लस देण्यात आली. यासाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सहकार्य केले.
साईमत, नाशिक: प्रतिनिधी पेठ मार्गावरील अपघातप्रवण कोटंबी घाटातील वळणावर तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. ही वाहने आपसात धडकल्याने वाहतूक बंद पडली आहे. सततच्या पावसामुळे या मार्गावरील सावळघाट व कोटंबी घाट वाहनांसाठी धोकादायक झालेले असतानाच शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नाशिककडे जेसीबी घेऊन जाणारा ट्रक आणि पेठकडे येणारा आयशर ट्रकवर जेसीबी उलटला. दोन्ही वाहनांवर टँकर धडकल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघातामध्ये सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे.
साईमत जळगाव प्रतिनिधी रक्तदानाचे समाजात महत्त्व वाढले पाहिजे. यामुळे नागरिक स्वतःहून उस्फूर्तपणे रक्तदान करण्यासाठी उत्सुक झाले पाहिजेत. यासाठी समाजात रक्तादानाविषयी जाणीव जागृती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी तथा रेडक्रास सोसायटीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी गुरुवारी येथे केल्या. जळगाव जिल्हा रेडकॉस सोसायटीचे जिल्हाधिकारी श्री.प्रसाद अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला रेडकॉस सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, समुपदेशनाच्या गरजा समजून घेण्यासाठी रेड क्रॉस सदस्यांनी तुरुंग अधीक्षकांची भेट घ्यावी. नवीन सदस्यांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी अध्यक्षासह 6 सदस्यांची समिती स्थापन करण्यात यावी. सोसायटी परिसरात मासिक रक्तदान मोहीम आयोजित करण्यात यावी . नियोजित दिवशी रक्तदान करण्यासाठी विविध संस्थांना प्रवृत्त करावे, असा सूचनाही…
साईमत प्रतिनिधी जळगाव येथील सराफ बाजारातील राजमल लखीचंद अर्थात आर. एल. ग्रुपवर गुरुवारी सकाळी 8 वाजता ईडी तथा सक्तवसुली संचलनालयाची धाड पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. सकाळी ईडीच्या पथकाने छापा टाकून तपासणी करण्यास प्रारंभ केला. त्यांची तपासणी सायंकाळपर्यत सुरू होती. मात्र या ग्रुपच्या पेढीसमोर पथकातील दोन चारचाकी वाहने लागलेली दिसून आली. याबाबत अधिकृत माहिती मात्र समूहातर्फे कोणीच दिली नाही. पथक आतमध्ये तपासणी करत असल्याचे ‘साईमत’च्या प्रतिनिधीने येथे भेट दिली असता दिसून आले. या फर्मचे सर्व दरवाजे बंद करून आतमध्ये तपासणी होत असल्याचे निदर्शनास आले .कामावरील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्यामुळे कर्मचारी जुन्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बसलेले होते.
साईमत, प्रतिनिधी, जळगाव तालुक्यातील उमाळा बसस्थानकाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सायंकाळी 5 वाजता कारवरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, उमाळा येथील बसस्थानकाजवळ बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रिक्षा क्रमांक (एमएच 19 व्ही 3768) या प्रवाशी रिक्षाला भरधाव कार क्रमांक (एमएच 02 बीआर 4391) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा चालक राजू ओमप्रकाश साहू (वय 45) यांचा मृत्यू झाला. तर रिक्षातील प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या अपघातात रिक्षासह…