साईमत, जळगाव : प्रतिनिधी तालुक्यासह जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. यापुढे प्रशासन अक्षरश: हतबल झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आता वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून शनिवारी पहाटे नाशिक येथील महसूल खात्याचे पथक, स्थानिक महसूल व पोलीस प्रशासन थेट शहरापासून जवळच असलेल्या गिरणा नदीच्या पात्रात उतरत कारवाई केली. यावेळी पोलिसांनी अनेक अधिकृत वाळू वाहून नेणारे जवळपास १०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स व डंपर्स जप्त केले आहेत. त्यामुळे वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जात असल्याचे दिसून आले. मात्र, याकडे महसूल खात्यासह पोलिसांनी अक्षरशः कानाडोळा…
Author: Saimat
साईमत, पुणे : प्रतिनिधी सध्या राजकारणी अतिशय वाह्यात बोलतात, तरीही त्यांची वक्तव्ये माध्यमे वारंवार का दाखवतात?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. िंपपरी येथे पत्रकारांच्या गौरव संमारंभात ते बोलत होते. याव्ोळी त्यांनी महाराष्ट्रात पत्रकारिता अजूनही जिवंत आहे, ती कायम जिवंत ठेवा, असे आवाहन करत माध्यमांवर खोचक टीकाही केली व काही सूचनाही केल्या. राज म्हणाले, सध्याची पत्रकारिता म्हणजे, हा नेता काय म्हटला आणि त्यावर तो नेता काय बोलला? एवढेच सुरू आहे. अशा राजकारण्याला एकट्याला बोंबलू द्या ना शौचालयात. तिथे जे बाहेर पडायचं ते माध्यमे समोर आले की त्याच्या तोंडातून बाहेर पडते आणि माध्यमेही वारंवार त्याच्यासमोर आपला…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आला. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी एका छोटेखानी समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, टाटा सन्सचे चेअरमन तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील राजमल लखीचंद ज्व्ोलर्स समुहाच्या राज्यभरातील सहा ते सात फर्मवर ईडीने छापे टाकून कारवाई केली. सलग दोन दिवस साठ अधिकारी तपासणी करीत होते. शनिवारी सकाळ पर्यंत कारवाई सुरू होती. या कारवाईत ९० लाखाची रोकड आणि विक्रीसाठी असलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, ईडीने या फर्मचे मालक, माजी खासदार ईश्वरलाल जैन, त्यांच्या पत्नी, माजी आमदार मनिष जैन, त्यांच्या पत्नी अशा चौघांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे या सर्वांना ईडी कार्यालयात चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. चौकशीला सामोरे जाऊ : ईश्वरलाल जैन या कारवाईनंतर राजमल लखीचंद ज्व्ोलर्स समुहाचे मालक ईश्वर जैन म्हणाले की, ईडीची कारवाई चुकीची असून न्यायासाठी…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील बंद घर फोडून ६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे सोने- चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लांबवणाऱ्या चार संशयिताना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून इतर चोरीचा एकूण १० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत इतर चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी दुपारी ३ वाजता दिली. गोजोरे येथील मालतीबाई अभिमान चौधरी (वय ५७) ह्या घराला कुलूप लावून पुण्याला गेलेल्या होत्या. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी बंद घर फोडून ६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले होते. याप्रकरणी…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव जपानमधील वाकायामा येथे आशियाई आणि ओशनियन हायस्कूल विद्यार्थी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या ‘शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण परिषद’मध्ये भारतातर्फे एकमेव शाळा, अनुभूती रेसिडेन्शिअल स्कूलचा विद्यार्थी, अतिशय जैन याने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत ‘भारतातील जल समस्या आणि त्यावरील उपाययोजना’ या विषयावर संशोधन सादर केले. या परिषदेत विविध 22 देशांतील शाळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यांत विद्यार्थी प्रतिनिधींद्वारे जागतिक पातळीवर होणारे बदल आणि त्याचा त्यांच्या देशातील वातावरण, भौगोलिक, पर्यावरण, शिक्षण आदी घटकांवर होणारे परिणाम आणि त्यावर करता येऊ शकणाऱ्या उपाययोजनांवर संशोधन सादर केली जातात. या परिषदेमध्ये अनुभूती स्कूलचा विद्यार्थी अतिशय जैन, शिक्षक स्वागत रथ यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव वाढदिवसानिमित्त केक कापून गोंधळ घालत पोलिसांवर दगडफेक करणारा फरार संशयित आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी रात्री मालेगाव येथून अटक केली. त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळे १८ गुन्हे दाखल आहेत. शेख नईम उर्फ बुलेट शेख कलीम (वय २८, रा. मासुमवाडी, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शहरातील सम्राट कॉलनीत १७ मे २०२३ रोजी रात्री शेख जिशान शेख युनूस शिक्कलगर (वय १९) या तरुणाचा मासुमवाडीमध्ये ९ ते १० जण वाढदिवस साजरा करीत असताना त्यांनी एकमेकांवर अंडी फेकत सम्राट कॉलनीत घुसून एकमेकांशी वाद घालत होते. जमावबंदीचे आदेश असल्याने पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करून तेथे असलेल्या…
साईमत, धुळे : प्रतिनिधी अवसायनात निघालेल्या यावल-सावदा (ता.राव्ोर) येथील एका पतसंस्थेचा गाळा आणि अनामत रक्कम तक्रारदाराच्या नाव्ो करून देण्यासाठी पाच लाखाची लाच स्वीकारताना धुळे येथील सहकारी संस्थचे विशेष लेखापरीक्षक तथा संबंधित पतसंस्थेचे अवसायक सखाराम ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. धुळे मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. जळगाव भूविकास बँकेचे अतिरिक्त विशेष लेखा परीक्षक, धुळे येथे सहकारी संस्थाचे (प्रक्रिया) विशेष लेखा परीक्षक म्हणून काम पाहात आहेत. छत्रपती संभाजी राजे व्यापारी संकुलातील गाळा घेण्यास उत्सुक असलेल्या तक्रारदाराने ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. पतसंस्थेचा गाळा आणि गाळ्यासाठी भरण्यात आलेली सुरक्षा अनामत रक्कम आपल्या नाव्ो करून देण्याची प्रशासकीय प्रक्रिया…
साईमत, धुळे । प्रतिनिधी जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापना झाली आहे. या समितीच्या संयुक्तिक पथकाने दुधात पाण्याची भेसळ आढळलेल्या आठ विक्रेत्यांवर गुरुवारी (ता. १७) कारवाई केली. समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न-औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, दुग्धव्यवसाय विभाग आदींच्या पथकातील अधिकारी संतोष कांबळे, डॉ. आर. एम. शिंदे, डॉ. अमित पाटील, संतोष दलाल, कृष्णा नेरकर, व्ही. व्ही. गरुड, प्रीतेश गोंधळी, हवालदार रवींद्र बेडसे, दूध तपासणी तंत्रज्ञ मनोज पाटील यांनी तपासणी केली.त्यांनी शहरातील चाळीसगाव रोड, ८० फुटी रोड, वडजाई रोड, पारोळा रोड, गल्ली नंबर ४,…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी राज्यभरात ओळख असलेल्या राजमल लखीचंद ज्वेलर्सची सलग दुसऱ्या दिवशीही ईडीकडून तपासणी सुरू होती. स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत असलेल्या सहाशे कोटी रूपयांच्या कर्जा पोटी ईडी चौकशी करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत ईडी अधिकाऱ्यांनी ज्व्ोलर्समधील सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन केले आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. त्यानंतर गाडीतून लोखंडी पेटी, पैसे मोजण्याचे मशिन आणि फाईली तपासणी अधिकाऱ्यांनी सोबत नेल्या. जळगाव शहरातील राजमल लखीचंद अर्थात आर एल समूहाच्या विविध आस्थापनांवर गुरुवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून एकाचव्ोळी सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात जळगावमधील आर एल ज्व्ोलर्स, मानराज आणि नेक्सा शोरूमचा समाव्ोश आहे. यासाठी मुंबई, नागपूर,…