नवीदिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेचे सदस्यत्व परत मिळाल्यानंतर संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केल्याचा हल्लाबोल केला मात्र, या भाषणापेक्षा त्यांनी लोकसभेतून जाताना केलेल्या एका कृतीची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. लोकसभेतून बाहेर पडताना राहुल गांधींनी सत्ताधारी बाकांकडे बघून ‘फ्लाइंग किस’ दिल्याचा दावा मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. त्यानंतर भाजपाच्या २२ महिला खासदारांनी याविरोधात लोकसभा अध्यक्षांना पत्रही लिहिले आहे मात्र, राहुल गाधींच्या त्या कृतीचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. नेमके काय घडले लोकसभेत? लोकसभेत राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर भाषण झाल्यानंतर सत्ताधारी…
Author: saimat
मुंबई ः प्रतिनिधी नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यापाठोपाठ आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील घडामोडींच्या निमित्तानेही राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयएए लीडरशिप अवॉर्ड्सच्या निमित्ताने बुधवारी संध्याकाळी मुंबईत जाहीर मुलाखत झाली.या मुलाखतीमध्ये इतर मुद्द्यांबरोबरच आपल्या राजकीय भूमिकांवरही देवेंद्र फडणवीसांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांना ‘ब्रँड पॉलिटिशियन’बाबत विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. “जो बिकता है,उसीपर ज्यादा चर्चा होती है.राजकारण तसेच आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या चित्रपटांमध्ये सावकार खलनायक असायचे. शोलेच्या काळात डाकू खलनायक असायचे. त्यानंतर तस्कर खलनायक असायचे.…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील देश आर्थिक संकटातून जात आहे परंतु अशा काळातही भारताची अर्थव्यवस्था मजबुतीने उभी आहे, असा दावा करीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातली वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील प्रश्नावर लोकसभेत उत्तर दिले.सीतारमण म्हणाल्या, “जगभरातली वाढती महागाई आणि घसरलेला विकास दर हा चिंतेचा विषय आहे.२०२२ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था केवळ ३ टक्क्यांच्या वर गेली आहे. जागतिक बँकेच्या मते २०२३ मध्ये जागतिक विकास दर २.१ टक्क्यांपर्यंत खाली जाईल. ब्रिटनमधली परिस्थिती सर्वात बिकट आहे. दरम्यान, यावेळी विरोधकांवर हल्लाबोल करत अर्थमंत्री म्हणाल्या, तुम्ही आश्वासने देण्यात दंग राहिलात आणि आम्ही काम करण्यात व्यस्त राहिलो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे चित्र बदलले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण…
अलिबाग : वृत्तसंस्था मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता महामार्गावर वाकण फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. स्थानिक लोप्रतिनिधींनी विरोधात बोंबाबोंब करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अनेक प्रयत्न करूनही महामार्गाच्या कामाला गती मिळू शकलेली नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे, प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. वडखळ ते इंदापूर या मार्गाची सध्या चाळण झालेली आहे. महामार्गाच्या या दुरावस्थेकडे कोकणातील लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आणि ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख, मिलिंद आष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे…
संभाजीनगर : प्रतिनिधी औरंंगाबाद खंडपीठाने फटकारल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मागील काही काळात शहरातील सिडको भागातील अतिक्रमणाविरोधात कारवाई केली होती मात्र, मागील काही दिवसांत तुरळक कारवाई होताना पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शहरातील लक्ष्मण चावडी चौक ते कैलास नगर समशान भूमी डीपी रस्त्यावरील १५ अतिक्रमण काढले आहेत. यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहायला मिळाला. विशेष म्हणजे अतिक्रमणधारकांना यापूर्वी मोबदला देऊन अतिक्रमण काढण्यात आले होते. पण, त्यांनी पुन्हा अतिक्रमण केले असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत लक्ष्मण चावडी ते पुढील चौकापर्यंत ८० फूट आणि नंतर ६० फूट या डीपी रस्त्यावरील एकूण १५…
सिंधुदुर्ग : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील एका गावाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील किंजवाडे ग्रामपंचायतीने एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. गावातील नवविवाहित दाम्पत्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक गोष्ट करावी लागणार आहे. नवविवाहित जोडप्यांना दोन झाडे लावावी लागणार आहेत. त्यांचबरोबर लोकांना त्या झाडासोबत दोन फोटोही जमा करावे लागणार आहेत. त्यानंतरच ग्रामपंचायत मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जारी करणार आहे. हा नियम ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. किंजवाडे गावाचे सरपंच संतोष किंजवाडेकर आणि ग्रामसेवक शिवराज राठोड हे आहेत. दोघांनीही गावा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि स्मार्ट गाव बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यस्तरावर गाव आणण्यासाठी गावात नवीन…
नागपूर : वृत्तसंस्था सिंचन घोटाळा प्रकरणात भाजपने अजित पवार यांची सर्वाधिक बदनामी केल्यावरही बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत फलकावर अजित पवार यांच्या बरोबरीतच देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्राला स्थान देऊन दोन्ही नेते साथसाथ असल्याचा संदेश दिला आहे. नागपुरातील छत्रपती चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने भलामोठा स्वागत फलक लावला आहे. तो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वाशीम जिल्हा परिषद अध्यक्षाने लावलेल्या या फलकावर उपमुख्यमंत्रीद्वय अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे सारखे छायाचित्र आहे. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची सर्वाधिक बदनामी भाजपनेच केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दरवर्षी नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रकरणात एक गुन्हा दाखल केला जायचा. त्यावरून तेव्हा विरोधी…
मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत रविवारी रंगशारदा सभागृहात शिवसेना(ठाकरे गट) आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस आता ‘मस्टर मंत्री’च राहणार की काय? ते फक्त कोण आला, याची नोंद ठेवणार? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावे लागले, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.“ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत…
मुंबई ः प्रतिनिधी भाजपचे बडे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर राज्य मंत्रीमडळाच्या विस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑगस्ट महिन्यातच शिंदे-फडणवीस-अजित पवार या महायुतीच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीला ९ मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजप तसेच शिंदे गटाचे बरेच आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाबाबतची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. सरकारने आता मंत्रिमंडळ विस्तार करू नये. मंत्रीमंडळ विस्तार केलाच तर अमेरिकेला निघून जाईन,अशी खदखद आमदार कडू यांनी बोलून दाखवलीय. यापुढे सरकारने आणखी चार जणांना…
मुंबई ः प्रतिनिधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असताना ‘शिवसेना फोडणारा औरंग्या’ असा त्यांचा उल्लेख केला होता. या टीकेला आता शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना हल्ली इतिहासाची खूप आठवण यायला लागली आहे. अफझल खान काय, औरंग्या काय, आणखी काय-काय सुरू आहे. संजय शिरसाट म्हणाले, मुळात उद्धव ठाकरे यांना इतिहास माहिती नाही. त्याना वाटते की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी जी वाक्य शोभत होती, ती वाक्यं आपण फेकली तर लोक ती वाक्यं झेलतील. परंतु, आता लोकांना कंटाळा आला आहे. दुसऱ्या बाजूला…