जळगावात थरार, आरोपी पाठलाग करून अटकेत साईमत /जळगाव /प्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशानुसार पकड वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर एका सराईत तरुणाने चाकू उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना जळगाव शहरात घडली. ही घटना गुजराल पेट्रोल पंपाजवळील हटिल पूजा परिसरात मंगळवारी घडली असून, यावेळी पोलिसांशी जोरदार धक्काबुकीचा प्रकार झाला. आरोपीने पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नितेश उर्फ गोल्या मिलिंद जाधव (रा. पिंप्राळा, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध न्यायालयाचे पकड वॉरंट प्रलंबित होते. या वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) कॉन्स्टेबल…
Author: saimat
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत खळबळ; छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला, एमआयएममधील अंतर्गत वाद उघड साईमत /वृत्तसेवा/छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात एक खळबळजनक आणि गंभीर घटना घडली आहे. एमआयएमचे राष्ट्रीय नेते व खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर प्रचारादरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेमुळे एमआयएममधील अंतर्गत गटबाजी आणि असंतोष चव्हाट्यावर आला असून, निवडणुकीपूर्वीच पक्षासमोरील अडचणी वाढल्याचे चित्र आहे. प्राथमिक माहितीनुसार, इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार करत असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.…
भुसावळ, अट्रावल-मुंजोबा, आमोदा-बामनोद व बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर अपघाताची भीती साईमत /यावल /प्रतिनिधी तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिक, वाहनचालक आणि भाविकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. यावल-भुसावळ रस्ता ५ किलोमीटर लांब असून, त्यावर डागडुजीची कामे १५ दिवसांपूर्वी सुरू केली होती. मात्र, अंजाळे गावाजवळील शनी मंदिराजवळील एक ते दीड किलोमीटर रस्ता ठेकेदारांनी अद्याप दुरुस्त केलेला नाही. या भागातील खोल खड्ड्यांमुळे मोटरसायकल आणि वाहनधारकांसाठी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावल-भुसावळ रस्त्याच्या बांधकामात सिमेंट काँक्रीट वापरण्यात आले असले तरी काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खोल दऱ्या निर्माण झाल्या आहेत. ज्यामुळे वाहन चालवताना गंभीर धोका निर्माण होतो. नागरिक आणि वाहनचालक प्रशासन आणि ठेकेदार…
पत्रकार दिनानिमित्त चाळीसगावात पत्रकारांचे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर साईमत /चाळीसगाव/प्रतिनिधी पत्रकाराच्या हातात लेखणी हे ब्रह्मास्त्र आहे. मात्र, ते पेलण्याची ताकद आणि जबाबदारी पत्रकाराने स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. पत्रकारितेची ओळख ही केवळ लिखाणावर अवलंबून असते. कपडे, राहणीमान किंवा बाह्य दिखाव्यावर नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त पत्रकार म्हणून काम करून चालणार नाही, तर जिद्द, चिकाटी आणि मूल्यनिष्ठा असणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला प्रमुख वक्ते व ज्येष्ठ पत्रकार सुरेश उजैनवाल यांनी दिला. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पत्रकार दिनाच्या औचित्याने चाळीसगावच्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने शहरातील अरिहंत मंगल कार्यालयात मंगळवार, दि.६ जानेवारी रोजी पत्रकारांसाठी आयोजित मोफत…
एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघाचे आ.अमोल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. साईमत /पारोळा/प्रतिनिधी – ‘ दै.साईमत’ने प्रकाशित केलेल्या ‘दिनदर्शिका २०२६’चे प्रकाशन मंगळवार दि.६ रोजी एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघाचे आ.अमोल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना शहरप्रमुख आणि नगरसेवक अमृत चौधरी, नगरसेवक मनोज जगदाळे, विवेक पाटील, पंकज मराठे, दगडू पवार याशिवाय जळगांव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक सचिन पाटील तसेच ‘दै.साईमत’चे प्रतिनिधी प्रदीप पाटील आणि प्रभाकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात आ.अमोल पाटील यांच्याहस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करून झाली. या उपक्रमाद्वारे ‘दै.साईमत’ने वाचकांसाठी सुलभ आणि माहितीपूर्ण दिनदर्शिकेची उपलब्धता सुनिश्चित केली आहे. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत ‘दै.साईमत’ परिवारास पुढील…
शेंगोळा-शहापूर दरम्यानची घटना साईमत /जामनेर/प्रतिनिधी भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत चिंचोली पिंपरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना जामनेर तालुक्यातील शेंगोळा (यात्रा)-शहापूर दरम्यान असलेल्या धरणाजवळ संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान घडली. डंपर चालक आपल्या वाहनासह पसार झाल्याचे समजते. गणेश भरत माळी (वय १८, रा.चिंचोली पिंपरी) असे मयत तरुणाचे नाव आहे.अज्ञात डंपर फत्तेपूर कडून जामनेरकडे येत असताना शेंगोळा यात्रा ते शहापूर दरम्यान असलेल्या धरणाजवळ गणेश माळी हा जामनेरकडून आपल्या गावी मोटार सायकलने जात असताना डंपरने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटार सायकल चालक गणेश माळी हा तरुण जागीच ठार झाला असून डंपर चालक मात्र घटनास्थळावरून आपल्या वाहनासह…
अंगारक संकष्ट चतुर्थीने जळगाव जिल्ह्यात भक्तीचा महोत्सव साईमत /जळगाव/प्रतिनिधी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या मंगळवारी आलेल्या ‘अंगारक संकष्ट चतुर्थी’च्या दुर्मीळ योगामुळे मंगळवारी, ६ जानेवारी रोजी जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. वर्षातील पहिलीच संकष्ट चतुर्थी आणि त्यातही अंगारकी योग जुळून आल्याने पहाटेपासूनच गणेश भक्तांनी मंदिरांकडे धाव घेतली. जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. सकाळपासूनच ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा अंगारक संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व असल्याने अनेक भाविकांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उपवास, पूजा-अर्चा करून बाप्पाचे दर्शन घेणे पसंत केले. पहाटे ५ वाजेपासूनच शहर व ग्रामीण भागातील प्रमुख गणेश…
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात, फेब्रुवारीत मतदानाची शक्यता साईमत /जळगाव/प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम जोरात सुरू झाला असून, शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातील सत्तासंघर्षाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. नगर परिषद व नगर पालिका निवडणुका पार पडल्यानंतर सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होणार, मतदान कधी होणार, याबाबत इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रियेला गती सुप्रीम कोर्टाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
डिप्लोमाच्या एकुलत्या एक विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू साईमत /पाचोरा – वेरुळी बुद्रुक/प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील वेरुळी बुद्रुक येथे डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ५) दुपारी उघडकीस आली. प्रणव संजय महाजन (वय १८, रा. वेरुळी बुद्रुक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रणव हा जळगाव येथील गोदावरी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. संजय महाजन यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अभ्यासू, शांत स्वभावाचा आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारा विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास प्रणव ‘शेतात जाऊन…
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी त्यांची निवड झाली साईमत /जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राज्यस्तर युवा महोत्सवाच्या वक्तृत्व स्पर्धेत डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) ची विद्यार्थीनी कु. दीपाली विनोद सोनी (तृतीय वर्ष – कला) यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केले. वक्तृत्व स्पर्धेचा विषय ‘आणीबाणीचा काळ आणि संविधानाचे उल्लंघन’ असा होता. क्रीडा व युवक सेवा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दिनांक ९ ते १२ जानेवारी २०२६ रोजी, नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी त्यांची निवड झाली असून त्या देशाच्या राजधानीत…