Author: saimat

साईमत / वृत्तसंस्था इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदीबाबतची पहिली बैठक निष्फळ ठरल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, दुसऱ्या फेरीतील चर्चेत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात असून, या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत सांगितले की, दुसऱ्या शांतता चर्चेसाठी इराणकडून संपर्क साधण्यात आला आहे. तसेच अमेरिकेने इराणवर कडक आर्थिक नाकेबंदी लागू केली असून, कोणत्याही प्रकारचा व्यापार करण्यास मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इराणकडे कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे असू नयेत, हीच अमेरिकेची भूमिका राहणार आहे. “जगाला ब्लॅकमेल करण्याची परवानगी कोणालाही दिली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी…

Read More

साईमत / ठाणे शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी खऱ्या अर्थाने ‘आधार’ ठरत आहे. ठाणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात तब्बल २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि अर्जांचा तातडीने निपटारा यांसारखे महत्त्वाचे सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. याशिवाय, सामंजस्य करार (MoU) आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून विविध रुग्णालये, धर्मादाय संस्था व दात्यांचे सहकार्यही मिळत आहे. त्यामुळे निधी वितरणात पारदर्शकता वाढून मदतीचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. या निधीतून कॉक्लियर इम्प्लांट (२ ते…

Read More

साईमत / अमरावती अमरावती जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला असून एका तरुणाने प्रेमाच्या बहाण्याने अनेक तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने अनेक तरुणींशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जवळपास २०० मुलींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक व्हिडिओ आढळल्याची माहिती आहे. आरोपी स्वतःच हे व्हिडिओ चित्रित करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. हे…

Read More

साईमत / जळगांव गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जळगावमधील सराफ बाजारात आठवड्याच्या सुरुवातीलाच दर घसरले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी दोन्ही मौल्यवान धातूंनी जोरदार वाढ नोंदवली. या अचानक बदलामुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्यामुळे सोने-चांदीला पुन्हा तेजी मिळाली आहे. यापूर्वी होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला होता, ज्याचा परिणाम म्हणून दरात घसरण झाली होती. मात्र आता परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहे. आज मंगळवारी सकाळी बाजार उघडताच जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या…

Read More

बॅनर-झेंड्यांवरही कडक नियम जळगावात आंबेडकर जयंतीनिमित्त प्रशासन सक्रिय साईमत जळगाव प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिल २०२६ रोजी जळगाव शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयामुळे शहरातील डेली बाजार तसेच काही भागांतील साप्ताहिक आठवडे बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील प्रमुख रस्त्यांवरील डेली बाजार आणि हरी विठ्ठल नगर तसेच खंडेराव नगर परिसरातील आठवडे बाजार मिरवणुकीच्या दिवशी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश उपायुक्त पंकज गोसावी यांनी जारी केला आहे. मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत राहणे आणि आपत्कालीन…

Read More

कडाक्याच्या उन्हात  २५० जार पाण्याचा दिलासा साईमत पाळधी प्रतिनिधी पाळधी रेल्वे स्थानक येथे तांत्रिक कारणांमुळे तब्बल तीन तास खोळंबलेल्या उधना-हसनपूर एक्सप्रेस मधील प्रवाशांसाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तत्काळ पुढाकार घेत ‘माणुसकीचा आदर्श’ घालून दिला. कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या प्रवाशांना त्यांनी तातडीने २५० पाण्याचे जार उपलब्ध करून देत मोठा दिलासा दिला. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी स्थानकावर सकाळी ११ वाजता उधना ते हसनपूर दरम्यान धावणारी ही रेल्वे गाडी रेल्वे लाईन क्लिअर नसल्यामुळे थांबवण्यात आली होती. सुरुवातीला काही मिनिटांचा वाटणारा हा थांबा तब्बल तीन तास लांबला आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. उन्हाचा पारा चढलेला असल्याने लहान मुले, महिला…

Read More

साईमत / जळगांव भारतीय हवामान विभागाने (IMD) आज नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून, यावर्षी देशात सरासरीच्या सुमारे 92 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अंदाज सरासरीपेक्षा कमी पावसाच्या श्रेणीत मोडतो. हवामान विभागानुसार 90 ते 95 टक्के पाऊस झाल्यास तो सामान्यपेक्षा कमी पाऊस मानला जातो. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. महाराष्ट्रातही कमी पावसाचा अंदाज : राज्यातही यावर्षी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्व भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात 90 ते 95 टक्के पर्जन्य होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान स्थिती मिश्र राहणार :…

Read More

भुयारी गटार जोडणीत उदासीन नागरिकांवर दुप्पट दंड; मनपा ताफ्यात ‘इलेक्ट्रिक’ वाहनांचा समावेश साईमत जळगाव प्रतिनिधी   जळगाव महानगरपालिका आता महसूल वाढवण्यासाठी आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारताना दिसत आहे. मोबाईल टॉवर कंपन्यांकडील तब्बल २८ कोटी रुपयांच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी थेट जप्ती आणि सीलिंगची कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, सदस्य आणि विभागप्रमुख उपस्थित होते. मोबाईल टॉवर थकबाकीवर कठोर भूमिका शहरातील विविध मोबाईल…

Read More

साईमत / मुंबई   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण ७ महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील प्रशासनिक सुधारणा, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, आरोग्य व्यवस्था आणि ग्रामीण विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एमपीएससी भरती प्रक्रियेत मोठी सुधारणा : राज्य शासन सेवेतील पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध सेवांतील संवर्गांची संख्या ५३ वरून १५३ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. संयुक्त परीक्षा योजनेत नव्या सेवांचा समावेश करून भरती प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येणार…

Read More

साईमत / शिरूर शिरूर बायपास परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्रीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६.९४ ग्रॅम वजनाचा, अंदाजे १ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (दि. ११) अमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान करण्यात आली. शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंद पडलेल्या नाना स्पॉट हॉटेलजवळ एमडी विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अमली पदार्थ आढळून आला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(ब) तसेच बीएनएस कलम ३(५)…

Read More