जळगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या ह्या नव्या वादाचा नवा चेहरा पी एम पाटील नामक कर्मचाऱ्याच्या कागद पत्रे व फाईल आपल्या मन मर्जी प्रमाणे घरी घेऊन जाऊन कामे करण्याच्या अजब गजब प्रकाराने समोर आले आहे. ह्याला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.धिवरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी श्री.मोहन ह्यांचे खुले पाठबळ असल्यानेच श्री पाटील ह्यांनी हि हिम्मत दाखवली असल्याचे उघड गुपित असलेली चर्चा जी.प सह जिल्हाभर गाजत आहे. ह्यात खरे तर राजा बोले दल हाले अशी परिस्थिती असतांनाही कर्मचार्यावरच गुन्हे दाखल होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या मुळे छत नसलेले कर्मचारी खूप धास्तावले आहेत. जळगाव जी.प त आता नवीन वादाची…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मुबंई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला.
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे ३९ आमदार फोडले. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे.शिवसेनेकडून सध्या आपल्या शाखाप्रमुखांकडून पक्षाशी बांधील राहीन, अशी प्रतिज्ञापत्रं लिहून घेतली जात आहेत. यापार्श्वभूमीवर मनसेने (MNS) पुन्हा शिवसेनेला (Shivsena) डिवचले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला. देशपांडे यांनी पोस्ट केलेल्या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसैनिकानी दिलले प्रतिज्ञापत्र आहे दुसरीकडे टीव्ही चालू आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे आम्ही म्हणजेच खरी शिवसेना असा दावा करताना दिसत आहेत आदित्य ठाकरे यांच्या हातात जीपीएस ट्रॅकर असून ते उद्धव ठाकरे यांना म्हणत आहे की, बाबा,…
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी राज्यात राजकीय नाट्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले. त्यामुळे महविकास आघाडी सरकार कोसळले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वांच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. यापैकी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे हे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आमदारांना केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या बैठकीला शरद पवार यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. राज्यातील…
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी राज्यात भाजप-एकनाथ शिंदे गटाचे नवे सरकार स्थापन होण्याची औपचारिकताच आता शिल्लक राहिली आहे. त्यामुळे साहजिकच आता राज्याचा पुढचा विरोधी पक्षनेता कोण असणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीत शिवसेना (Shivsena) हा सर्वाधिक आमदार असलेला पक्ष होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३९ आमदार फोडून नेल्याने शिवसेनेकडे अवघे १६ आमदार उरले आहेत. त्यामुळे आता ५३ आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा असून विरोधी पक्षनेता हा त्यांचा असेल, हे निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अजित पवार (Ajit Pawar) हेच विरोधी पक्षनेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविवारी संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या…
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनंतर आता महाविकास आघाडीनेही आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांची नावे घोषित झाल्याने चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील नाराज आमदारांना सोबत घेत पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकावला आणि भाजपच्या मदतीने थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं. पक्षातील नेत्यानेच घात केल्याने उद्धव ठाकरे दुखावले गेले असून त्यांनी या बंडखोर गटाला धक्का देण्यासाठी तयारी…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : राज्यात राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी ठाकरे सरकारला(Thackeray Govt) धक्का देत भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde)यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. इतकेच नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची(Shivsena) आघाडीवरही शिंदे यांनी टीका केली. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा विकास अपवित्र आघाडीमुळे (महा विकास आघाडी) रखडला होता. यामुळे एकनाथ शिंदे या मराठमोळ्या माणसाने त्यांच्या विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला.मला खात्री आहे की ‘फडणवीस-शिंदे जोडी’ महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणतील, असे विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशात काँग्रेस…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेसोबत बंडखोरी करून भाजपासोबत (BJP)सरकार स्थापन केलं. शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठं बंड बोलले जात आहे. शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सहभागी आहेत. यातच आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार देखील वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना खासदारांच्या एका गटाने काल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या एका केंद्रीय नेत्याने केलेल्या दाव्यानुसार शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडाप्रमाणे खासदारही तीच भूमिका घेऊ शकतात. शिवसेनेच्या १९…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर : प्रतिनिधी महाराष्ट्रात गोर गरीब ,शोषित,पिडित,वंचित निराधार, दिव्यांग, विधवा या समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांना वाढत्या महागाईच्या अनुषंगाने तीन लाख रुपये अनुदान मिळावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनि निवेदनाद्वारे केलि आहे. शासनाने पिएम आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना या विविध योजनांच्या माध्यमातून घरकुल धारकांसाठी मागील काही वर्षांपासून रु. १३६००० /- इतका निधी दिला जात आहे परंतु आज रोजीचा महागाईचा उडालेला भडका बघता शासनाकडून मिळणार्या या घरकुलच्या रकमेत सदर लाभार्थ्यांचा घराचा वटा बांधणेही मुश्कील झालेले आहे तर संपूर्ण घर कस बांधायचे असा प्रश्न स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष…