साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर भव्य व अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन या ठिकाणी होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भूसंपादनासाठीच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी, जळगाव यांच्यामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. खेळाडूंना सराव करण्यासाठी हे शासकीय क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांचे खेळाडू सराव करतील. त्यांनी केलेला सराव, अद्ययावत साधन सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शक यामुळे या भागातील…
Author: Saimat
साईमत पुणे प्रतिनिधी अरबी समुद्रात खोलवर घोंघावत असलेले ‘बिपरजॉय‘ चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला आता धोका नाही. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या गतीवर झाला होता. मात्र ज्याची आपण सगळे वाट पाहत आहे त्या मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता आठ दिवसांत मान्सूनचे कोकणात आगमन होणार आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली. आज ८ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले. पुढील ४८ तासांत बंगालचा उपसागर आणि केरळच्या बऱ्याचशा भागात मान्सून पोहोचणार आहे.…
साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी गावातील एका तरुणाची हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भा मंगळवारी रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन संजय सोनवणे (वय-२७) रा. मोहाडी (ता.जळगाव) याने १९ मे रात्री १० ते २० मे सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याची दुचाकी घरासमोर लावलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यानंतर त्याने परिसरात दुचाकीचा शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही. अखेर मंगळवारी रात्री ८ वाजता तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस…
World Brain Tumor Day : ब्रेन ट्यूमरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या ट्यूमरने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमरविरूद्धच्या लढ्यात जागरूकता वाढवणे, लक्षणे, वेळेवर उपचार आणि योग्य पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. कारण असे केल्याने तुमच्या जगण्याची शक्यता वाढू शकते. ( ब्रेन ट्यूमर म्हणजे काय? (8 June World Brain Tumor Day ) प्राथमिक लेवलला मेंदूमध्ये गाठी येतात ज्या मेंदूच्या पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतात. या गाठी घातक कर्करोग असू शकतात. कर्करोग नसलेल्या ट्यूमरमुळे मेंदूच्या सामान्य ऊतींवर देखील परिणाम होऊ शकतो आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. जेव्हा कर्करोगाच्या पेशी फुफ्फुस,…
साईमत जळगाव प्रतिनिधी इंजिनिअरींग झाल्यानंतर वडिलांनी दोन पर्याय समोर ठेवले. काळ्या आईची सेवा की नोकरी? यात शेतीला पुढील काळात भवितव्य आहे यामुळेच इंजिनिअतरिंग पेक्षा शेती करण्याचा पर्याय निवडला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, ऑटोमेशन, टिश्यूकल्चर या विकसीत तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यातूनच ५० एकरपासून ११० एकर शेती वाढवली. आज मध्यप्रदेशातील सर्वात समृद्ध गाव म्हणून दापोरा (जि. बुऱ्हाणपूर) आहे. फार्मर ते फॉर्च्युनर ही समृद्धी केवळ आधुनिक शेतीमुळेच साधता आली. असे अत्यंत प्रेरणादायी बोल योगेश्वर पाटील यांचे आहेत. भवरलालजी जैन यांच्या चरित्रातून आपल्याला शेती करण्याची प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. जैन हिल्सच्या आकाश मैदानावर झालेल्या या सुसंवाद कार्यक्रमात स्वप्नील प्रकाश महाजन, (वाघोदा…
साईमत जळगाव प्रतिनिधी दिव्यांग बांधवांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी राज्यभर दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहेत. हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिल्यात. हे अभियान जिल्हास्तरावर राबविण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राधिकृत केले असून जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सदरचे अभियान राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली नुकतीच पार पडली, यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्यावतीने स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केली आहे. त्याअनुषंगाने राज्यातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांना आपल्या तक्रारी, अडचणी मांडण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक सर्व शासकीय…
साईमत जळगाव प्रतिनिधी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीसीए व एमसीए या शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविद्यालयाच्या खुल्या सभागृहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले की, आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन युवक-युवतींनी रोजगारक्षम व्हावे. तसेच नवतंत्रज्ञानामुळे उद्योगात बदल झाले असे नाही तर ते कालचे उद्योग आजही त्याच स्थितीत आहे. फक्त त्याच्या यशस्वी मार्गक्रमणाची पद्धत बदलेली आहे. म्हणजेच आजच्या अपडेट तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे आणि…
साईमत नंदुरबार प्रतिनिधी दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर ज्या भारताच्या सुवर्ण लेकी साक्षी मलिक, विनेश फोगाट तसेच अन्य सात कुस्तीपटू यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात ब्रिजभूषण या खासदारावर या कुस्तीपटूंनी आरोप लैंगिक शोषणाचा केलेला आहे. ब्रिजभूषण यांनी अनेकदा या कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केलेले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी आंदोलनाद्वारे केली आहे. या विरोधात दिल्ली येथील जंतर-मंतरमध्ये चालणाऱ्या आंदोलनाला चिरडण्यासाठी भारत सरकारने साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून हे आंदोलन कसे चिरडून टाकता येईल, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यात पोलिसांनी या…
साईमत साक्री प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 75 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत साक्री आगारात सार्वजनिक रक्तदान शिबीर तसेच प्रवाशी महासंघातर्फे एस.टी.चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त प्रतिष्ठित मान्यवर व आगाराचे प्रमुख यांनी योग्य मार्गदर्शन व शिबिराचे उद्घाटन केले. तसेच आगारातील होतकरू चालक, वाहक, यांत्रिक तसेच व्यापारी वर्ग व प्रवाशी बांधवांनीही वर्धापनदिनानिमित्त रक्तदान केले. अध्यक्षस्थानी आगार प्रमुख किशोर अहिरराव होते. यावेळी कार्यशाळा अधीक्षक श्री.शिंगाणे, स्थानक प्रमुख कुणाल घरमोडे, वाहतूक सहायक निरीक्षक प्रशांत अहिरे, सुरेश पारख (ग्राहक पंचायत, तालुकाध्यक्ष), प्रा.बी.एम.भामरे (तालुका उपाध्यक्ष), दिलीप चोरडिया (तालुका सदस्य), विलास देसले (तालुका सचिव), भाडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे, जोशीला पगारिया (सामाजिक कार्यकर्त्या), तात्या…
साईमत धुळे प्रतिनिधी देवपुरातील सुशीनाल्या किनारील अतिक्रमणाच्या नावाखाली वृक्षांची बेकायदेशीर सर्रासपणे कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. संबंधितांविरोधात कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. वृक्ष संवर्धनाचे काम मनपाचे असतानाही मनपाच्यावतीने वृक्षांची कत्तल केल्याने वृक्षांचे संवर्धन करणार कोण? असा संतप्त प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून सुशी नाल्या किनारील लाला सरदार नगरात नारळ, बादाम, जांभूळ यांसह 15 ते 20 डेरेदार वृक्ष अस्तित्वात होते. वृक्षांची कत्तल करू नये, अशा आशयाचे निवेदनही मनपा प्रशासनाला देण्यात…