मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. नव्या कार्याची सुरुवात करु शकता. खर्चात वाढ होईल. भावंडांसोबत मतभेद होऊ शकतात. आजचा शुभ रंग – केशरी. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आत्मविश्वासात कमी जाणवेल. संयम ठेवा. हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण कराल. उत्पन्नात वाढ होईल. संपत्तीतून चांगला नफा प्राप्त होईल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. आजचा शुभ रंग – पांढरा. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: वाद-विवाद टाळा. नव्या ओळखी होतील. कला क्षेत्रात रुची वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष देणे गरजेचे आहे. आजचा शुभ रंग – नारंगी. कर्क…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या (CTPC) वतीने गेल्या सहा महिन्यात नामांकित ४२ उद्योग समूहांना परिसर मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते त्यात ९५ विद्यार्थ्यांना या उद्योग समूहांमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलला बळकटी दिली जात असून विद्यापीठात कॅम्पस् आणि विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीव्दारे रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील व राज्याबाहेरील नामांकित उद्योग समूहांना विद्यापीठात परिसर मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते. जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यात ४२ उद्योग समूहांना परिसर मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.…
साईमत जळगाव प्रतिनिधी पाडळसे (ता. यावल) येथे बेकायदेशीर सुरू असलेले अवैध दारू अड्डे कायमस्वरूपी बंद करावते, या मागणीसाठी सोमवारी दुपारी १ वाजता जनक्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. याबाबत जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या पाडळसे गावात बेकायदेशीर अवैध दारू अड्डे बेसुमारपणे चालू आहेत. या दारू अड्ड्यांमुळे गरीब कष्टकरी महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. वारंवार फैजपूर पोलिस स्टेशनला दारू अड्डे बंद करण्याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. तरीसुद्धा सुमारे १५ ते २० दारूअड्डे सर्रासपणे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. गेल्या ८ दिवसांपूर्वी २७ वर्षांचा तुषार तावड़े नावाचा युवक विषारी दारू सेवन केल्याने मृत्यू झाला. याबाबत…
साईमत अमळनेर प्रतिनिधी येथील विजय नाना पाटील आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.एम. कोळी, शिक्षक शिवाजी पाटील, विद्यार्थ्यांचा वाढदिवस संयुक्तपणे सगळा स्टाफ, विद्यार्थ्यांसमोर साजरा करण्यात आला. निवासी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक म्हणून शिक्षक भूमिका पार पाडतात. तसेच १ जुलैचा योग साधून प्राचार्य पी.एम.कोळी, विज्ञान शिक्षक शिवाजी पाटील आणि सहावीचा विद्यार्थी निशांत पारधी यांचा वाढदिवस संयुक्तपणे साजरा करण्यात आला. अशी वेगळी संकल्पना ज्येष्ठ शिक्षक डी.डी.घोडेस्वार, ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील, सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील, सदस्य संजय पाटील, सदस्य व्ही.डी.पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, ज्येष्ठ व्ही.जी.बोरसे, बी.डी.पाटील, सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका वृंद,…
साईमत अमळनेर प्रतिनिधी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू. कॉलेज येथे मराठा सेवा संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा जळगाव ग.स.सोसायटीचे स्विकृत सदस्य प्रा.राम पवार यांनी सदिच्छा भेट देऊन शालेय परिसर आणि शाळेच्या प्रगतीची स्तुती केली. आर्मी स्कूलची प्रगती पाहून संस्थाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. त्याचबरोबर संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांच्या नवीन नेतृत्वाबद्दलही गौरवोद्गार काढले. त्याच्यासमवेत जळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा लीना पवार उपस्थित होत्या. याप्रसंगी संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी प्रा.श्याम पवार, प्राचार्य पी.एम.कोळी यांनी दोघांचा यथोचित स्वागत करुन सत्कार केला. प्रा.सुनील गरुड यांनी एस.एन.डी.च्या विद्यार्थिनींसाठी…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील भरारी फाउंडेशन व वेगा केमिकल्स प्रा.लि. जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या १३० पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व वार्षिक फी वाटप करण्यात आली. तसेज २६ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी द गार्डियन्स फाउंडेशनतर्फे दत्तक घेण्यात आले. भरारी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘शेतकरी संवेदना’ या अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे ९ वे वर्ष असून आतापर्यंत संस्थेने ४५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील धानवड येथील पाच गरजू शेतकऱ्यांना रतनलाल बाफना अनुसंधान केंद्रातर्फे 10 बैल शेतीच्या कामासाठी मोफत देण्यात आले. तसेज २० शेतकऱ्यांना मोफत बियाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप आले.पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे झालेल्या या…
साईमत पाचोरा प्रतिनिधी येथे दर शनिवारी आठवडे बाजारात मोठा बाजार भरतो. गेल्या शनिवारी बाजारात कैऱ्या नागरिकांना पहायला मिळाल्या. पाऊस पडण्याच्या आधी घराघरात कैरीचे लोणचे केले जाते. तालुक्याचा सर्वात मोठा बाजार असल्याने बाजारात नागरिकांनी कैऱ्या खरेदीसह फोडण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे लोणच्यासाठी कैरी फोडण्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. कैऱ्या खरेदीसाठी सकाळीच गर्दी बाजार घाटावरून मोठ्या प्रमाणात कैऱ्या विक्रीसाठी आल्या होत्या. त्यात नीलम, चपाटा, सरदार, गावठी या कैऱ्यांना मोठी मागणी होती. सरासरी ३६ ते ६० रुपये किलोप्रमाणे कैऱ्यांना भाव होता. छोट्या आकारातील कैरीला ३० ते ५० रुपये आणि गावठी कैरीला ३५ ते ६० रुपये असा भाव मिळाला होता. खेड्यासह शहरातील नागरिकांनी कैऱ्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पद्मालयच्या श्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन (Ashok Jain) यांची पुढील पाच वर्षांसाठी एकमताने पुनर्निवड झाली. श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय (Padmalaya) येथे रविवारी २ जुलै २०२३ रोजी मंदिर विश्वस्तांची बैठक पद्मालय येथे संपन्न झाली. त्यात सर्व विश्वस्त उपस्थित होते. अध्यक्ष अशोक जैन यांच्या नावाची घोषणा विश्वस्त अमित पाटील यांनी केली. विश्वस्तांच्यावतीने पुनर्नियुक्त अध्यक्ष अशोक जैन यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. अशोक जैन यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस महाराष्ट्र शासनाच्यावतीने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकताच राज्यशासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला. १ जुलै २०१८ रोजी पहिल्यांदा गणपती…
साईमत जळगाव प्रतिनिधी यावर्षी तापमानाचा पारा ४८°© वरून ३५°© च्या जवळपास आलेला आहे. मान्सून यावर्षी रुसल्या प्रमाणे जूनअखेर केवळ जेमतेम चारच दिवस बरसला असून जेमतेम २१ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे खान्देशात नंदुरबार जिल्ह्यातील प्रकल्प वगळता जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांची पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे. नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, अर्जूनसागर, हरणबारी, नागासाक्या, माणिकपंुज आिद प्रकल्पांमधून गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक होते. त्या गिरणा प्रकल्पात आजमितीस केवळ २१.७४ टक्के साठा आहे. जळगाव जिल्हयात ९६ मध्यम, लघू, मोठया प्रकल्पांत सरासरी ३०.४५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.नाशिक जिल्ह्याीतल चणकापूर, अर्जूनसागर(पुनद)सह अन्य प्रकल्पांतून गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक होते. या गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पाचोरा…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी लग्न कार्यासाठी ना लग्नपत्रिका, ना मानपान अशा सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत वधू-वर पक्षाला लग्नात मोठा खर्च करता येणे शक्य होते. अशातच दोन्ही परिवार, वधू-वर यांनी मान्यवरांच्या आग्रहाचा मान ठेऊन साध्या पद्धतीने लग्न उरकून घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. लग्नाची पुढील तयारी सुरू झाली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच ना मानपान, ना रुसवे-फुगवे, ना हुंडा शिवाय साधेपणाने सलमान-फराहबानो यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. साखरपुड्याला आलेले मण्यार परिवार साखरपुड्याला आले अन् ‘नवरी’ घेऊन कजगावला गेल्याचा प्रत्यय अनेकांना सुखद धक्का देणारा ठरला आहे. अशा निर्णयाचे मन्यार समाजबांधवांनी स्वागत केले आहे. येथे हाजी हन्नान शेख गुलाब यांची मुलगी फराहबानो यांचा कजगाव…