साईमत अमळनेर प्रतिनिधी अमळनेर (Amalner) लायन्स क्लब ने २०२२-२३ या वर्षभरात सामाजिक,शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल क्लब ला विविध पुरस्कारांनी मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी अध्यक्ष तथा विद्यमान झोन चेअरमन योगेश मुंदडा यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. मुंबई (Mumbai) येथील सहारा स्टार हॉटेल येथे लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४H२ यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात माजी प्रांतपाल एमजेएफ पुरुषोत्तम जयपुरीया,माजी आंतरराष्ट्रीय संचालक डॉ.नवलजी मारू,ग्याट एरिया लीडर विनोद वर्मा,प्रसिद्ध गजलकार अशोकजी कोसला यांच्या हस्ते अमळनेर लायन्स क्लब ला एकूण ६ पुरस्कारांनी गौरविण्यात आले.यात २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या भव्य एक्स्पो साठी डिस्ट्रिक्ट इमेज बिल्डिंग अवॉर्ड,आजादी का अमृत महोत्सव उपक्रमातअंतर्गत शहरातून १ कि.मी. लांब काढण्यात आलेल्या…
Author: Saimat
साईमत प्रतिनिधी अखेर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना सुप्रीम दिलासा मिळाला आहे. पुणे येथील भोसरी जमीन घोट्याळ्या प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले मा. मंत्री आणि राष्टवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ .एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सुप्रीम कोर्टाकडून जमीन मंजूर झाला आहे. गेल्या दीड वर्षांपासून ते ईडीच्या ताब्यात होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीच्या कारवाईनंतर ते ७ जुलै २०२१ ला त्यांना जेल झाली होती. भाजप-शिवसेना सरकारमध्ये असताना मा . मंत्री एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसीत प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. या आधी मंदाकिनी…
साईमत मलकापूर प्रतिनिधी मिरज तालुक्यातील बेडग गावातील ग्रा.पं.ने बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar)नावाची कमाल प्रवेशद्वार उभारले व नंतर स्वतः बांधलेली कमान बेकायदेशिर ठरवुन तोडुन टाकण्यात आली ही घटना निंदनीय असुन सदर घटनेचा आम्ही निषेध करतो. अश्या पध्दतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणारे लोकांवर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात यावी व सन्मानपूर्वक पूर्ववत उभारण्यात यावी. अलीकडे दोन दिवसा मध्ये झालेल्या अतिवृष्टीने नागरीकांचे घराचे नुकसान होवुन अनेकांच्या घरांची पडझड,शेतीचे नुकसान व पिकांची हानी झालेली आहे, तसेच व्यापारांच्या दुकानांमध्ये, व्यापारी संकुलना मध्ये बेसमेंट मध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झालेले असून सदर नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून त्यांना अर्थसहाय करावे. भूमिहीन…
साईमत शेंदुर्णी प्रतिनिधी जामनेर (Jamner) तालुक्यातील शेंदुर्णी येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. सकाळी माळी समाज मंगल कार्यालय येथे गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व समाज बांधव यांच्या हस्ते संत सावता महाराज यांच्या मुर्तीला अभिषेक प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. व गावातील समाज बांधव व महिला मंडळाची उपस्थिती लक्षनीय होती. तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी निमित्त माळी समाज मंगल कार्यालयात ह.भ.प.अमृत महाराज गाढे बेटावदकर यांचे सुश्राव्य किर्तन झाले. त्यांना साथसंगत वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी यांनी केली. यावेळी शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे, गोविंद अग्रवाल,…
साईमत जळगाव प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत आज दरळ कोसळून त्यात 200 ते 250 लोक दाबले गेले. त्यात 17 ते 18 लोकांचा मृत्यू झाला. सरकारने यापूर्वीच या लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. यापूर्वी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होते. याचा अर्थ सरकांर फोडाफोडीत व्यस्त होते. अन्यथा अशा घटना टाळता आली असती, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे गुरुवारी शहरात विद्यार्थी सेनेच्या बैठकीसाठी आले होते.यावेळी हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये पत्रकारांनी त्यांना रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हे सरकारचे अपयश असल्याचे सांगितले. पावसाळ्यापूर्वी त्यांना इतरत्र हलवता आले…
साईमत सोयगाव प्रतिनिधी कर्जाच्या ओझ्याखाली नैराश्य आल्या मुळे सोयगावात अल्पभूधारक शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे सहा वाजता शहरात घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे सोयगाव शहर सुन्न झाले असून, सोयगाव शहरात कर्जाला कंटाळून दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी गळफास घेतला आहे. शहरातील नारळी बाग भागातील अतुल राजेंद्र देसाई (वय ३०) असे गळफास घेतलेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून त्याचे कुटुंबियांच्या नावावर शेती तारण करून घेतलेले वाहन कर्ज तीस लाख रु आणि शेतीच्या खरीप हंगामासाठी घेतलेले ७० हजार रु जिल्हा बँकेचे कर्ज असे एकूण तीस लक्ष ७० हजार रु इतके कर्ज कुटुंबावर असून या कर्जाच्या परतफेडीच्या चिंतेने नैराश्य आलेल्या अतुल…
साईमत मुंबई प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सिंचन विहिरीचे प्रलंबित अनुदान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वितरित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींना मंजुरी मिळण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री आकाश फुंडकर, राजेश टोपे, नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, ‘मनरेगा’ अंतर्गत सिंचन विहीर अनुदानात तीन लाख रुपयांवरुन चार लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. या विहिरींच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत फेर भूजलसर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्यास यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून फेर भूजलसर्वेक्षण करून प्रलंबित…
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने (Maharshtra Government) राज्यातील 9 वैद्यकीय महाविद्यालयांना (Medical College) मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाल्याने एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागाही वाढणार आहेत. नवीन महाविद्यालयांना मान्यता मिळाल्यानंतर एमबीबीएसच्या (MBBS) 900 जागा वाढणार आहेत. आता महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 32 झाली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, वाशीम, वर्धा, अमरावती, जालना, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार आहेत. नवीन महाविद्यालयांच्या स्थापनेबाबत राज्य शासनाने शासन निर्णय (जीआर) काढला आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाल्यानंतर राज्यात एमबीबीएसच्या 900 जागाही वाढतील, असे त्यात म्हटले आहे. नीट…
साईमत अक्कलकुवा प्रतिनिधी तालुक्यातील रामपूर घरकुल घोटाळ्यातील दोषींवर अद्याप पर्यंत कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ आज रामपूर येथील असंख्य ग्रामस्थ व तालुक्यातील ग्रामस्थ व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकुवा तहसील कार्यालया समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रामपूर घरकुल घोटाळ्याची चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ गेल्या तीन वर्षापासून सातत्याने करीत होते त्या अनुषंगाने अक्कलकुवा पंचायत समिती मार्फत चौकशीचा फार्स दाखविण्यात आला मात्र चौकशीत निष्पन्न झालेल्या दोषींवर कारवाई करण्यास पंचायत समिती तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने चार मुळ लाभार्थ्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा…
साईमत मुंबई प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री आणि ३० आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली नाही. या मुळे अनेक चर्चना उधाण आले होते .पवार यांची भूमिका काय? ते यु टर्न घेणार का ? यावर तर्क लावले जात असताना मात्र आज राष्ट्रवादी ने 21 पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता खवले आहे . महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री मंत्री पदाची तर त्यांच्या राष्ट्रवादीच्या 9 जेष्ठ नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली .या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी…