Author: Saimat

साईमत चोपडा प्रतिनिधी भगिनी मंडळ संचलित, ललित कला केंद्र, चोपडा (Chopda) येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान “मेरी माटी मेरा देश” हा पंचप्रण शपथ ग्रहण सोहळा घेण्यात आला. या प्रसंगी ललित कला केंद्रातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राचार्य, संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीसह उपस्थित प्रत्येकाने आपल्या उजव्या हाताच्या मुठीत भारत भूमीची पवित्र माती घेवून पंचप्रण शपथ ग्रहण करण्यात आले. यावेळी पंचप्रणाचे वाचन प्रा. संजय नेवे यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राचार्य बारी यांनी केले. याप्रसंगी भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, ललित कला केंद्राचे प्राचार्य प्रा.सुनिल बारी, बालक…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये सोमवारी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. गीतगायन स्पर्धेची सुरूवात सरस्वती व भारतमाता प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य प्रविण सोनवणे व समन्वयिका स्वाती अहिरराव उपस्थित होत्या. ही स्पर्धा इयत्ता पहिली ते दुसरी लहान गट व इयत्ता तिसरी ते पाचवी मोठ्या गटासाठी ठेवण्यात आली होती. स्पर्धा हाऊसनुसार विभागण्यात आली होती. नेताजी हाऊस, राणी लक्ष्मीबाई, आझाद आणि टिळक हाऊस असे गट करण्यात आले होते. कार्यक्रम प्रमुख गणेश देसले आणि ज्ञानेश्वर पवार होते. परीक्षक म्हणून रंजना बाभुळके आणि स्वाती देशमुख होत्या. विद्यार्थ्यांनी हावभाव सहित देशभक्तीपर समूह गीत सादर केले. शेवटी…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा‌’ अंतर्गत सोमवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय ध्वजाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ.विनोद पाटील व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे महत्त्व, मागील 76 वर्षातील राष्ट्राची झालेली यशस्वी वाटचाल आणि प्रगती तसेच येणाऱ्या काळात देशाच्या सर्वांगीण विकासात विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली. डॉ. तुषार रायसिंग यांनी प्रस्ताविक केले. त्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यात आले. ‌‘हर घर तिरंगा ‌’ हे अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेली राष्ट्रव्यापी…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे…क्षणात येतेे सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे…अशा सुंदर शब्दात श्रावणमासाचे वर्णन करणारे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची जयंती समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे साजरी करण्यात आली. याप्रसंगी साहित्यिकांनी त्यांच्या जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या कविताही सादर केल्या. कवींनी यांना वाहिली आदरांजली कार्यक्रमाच्या सुरुवातीला रानकवी ना.धों. महानोर, ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके, सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बालकवींच्या पणती विशाखा कुलकर्णी, प्रा.प्रकाश महाजन, निवृत्तीनाथ कोळी, पुष्पलता कोळी, युवराज सोनवणे, अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, गोविंद पाटील, किशोर पाटील, भीमराव सोनवणे, किशोर नेवे, प्रज्ञा…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील डान्स क्लब व म्युझिक क्लबच्या माध्यमातून भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त ‌‘मेरी मिट्टी मेरा देश‌’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयात देशभक्तीपर गीतगायन आणि देशभक्तीपर नृत्य आदी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध जोशपूर्ण देशभक्तीपर गीते तसेच नृत्याचे विलोभनीय व बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेली तिरंगी वेशभूषा स्पर्धेचे आकर्षण ठरले. सदर उपक्रमावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच भावनगर येथील स्वामी शहानंद कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला असून या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. त्याचे औचित्य साधून यावर्षी ‌‘मेरी मिट्टी मेरा देश‌’ अर्थात ‌‘माझी माती माझा देश‌’ या संकल्पनेला जनमाणसापर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका युवासेनेतर्फे जळगाव ग्रामीणमध्ये ‌‘माझी माती माझा देश‌’ हे अभियान उत्साहात राबविण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या ‌‘माझी माती माझा देश‌’ या अभियानांतर्गत सोमवारी तरुणाईतर्फे निसर्गाच्या साक्षीने…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहर महानगरपालिका माजी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत हँड्स ऑफ होप ग्रुपच्या वतीने भव्य मोफत वृक्ष वाटप उपक्रम रविवारी राबवण्यात आला. सदर कार्यक्रमात महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महापौरांच्या हस्ते नागरिकांना रोपे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. एक नागरिक या नात्याने आपण समाजाला काही दिले पाहिजे यासाठी या कार्यक्रमात वेगवेगळ्या महाविद्यालयीन 15 ते 20 विद्यार्थ्यांंनी एक ग्रुप तयार करून स्वखर्चातून एक मदतीचा हात म्हणून गरजू व्यक्तींना कांबळी वाटप, जीवनावश्यक वस्तू वाटप, अन्न वाटप , भटक्या पाळीव कुत्र्यांना वाचवण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह बेल्स घातले, गाईचे रक्षण, भटक्या पाळीव प्राण्यांना जखमी झाल्यावर औषधोपचार करणे, उन्हाळ्यात चौकाचौकात पाणपोई उभारणे , पक्षांसाठी…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 15 वर्षीय अल्पवयीन घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले. मुलगी सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत आली नाही अथवा इतरत्र दुसरीकडे कुठे मिळूनही आली नाही. अखेर अल्पवयीन मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याबाबत एमआयडीसी पोलिसांना तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील नागरिकांच्या रस्त्यांच्या समस्या लक्षात घेता आमदारांसह मंत्री महोदयांनी शेकडो कोटी रुपयांची निधी शहराच्या विकासासाठी मंजूर केला होता. कामाची गुणवत्ता उत्तम दर्जाची असावी, यासाठी मनपा हद्दीतील रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले. शेकडो कोटी रुपयांची कामे झाली. प्रत्यक्षात मात्र झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून खड्डेमय जळगाव असे चित्र सर्वदूर पहावयास मिळत आहे. उपविभागीय अभियंता गिरीश सूर्यवंशी यांची गुणवत्तेची कामे करून घेण्याची जबाबदारी असतानाही फक्त आपल्या आर्थिक हव्यासापोटी कोट्यवधी रुपयांचा निधी खड्ड्यात टाकण्याचे काम यांनी केले आहे. असे असतानाही कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या जवळचे असल्याने फक्त आर्थिक मलिदा लाटण्यात ते मग्न असल्याचे…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी यावल तालुक्यातील मोहराळा येथील ३३ वर्षीय तरूणाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलीसस्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तम भोजु उर्फ छोटु पाटील (वय-३३) रा. मोहराळा ता.यावल असे मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील मोहराळा येथे उत्तम भोजु उर्फ छोटु पाटील हा आपल्या आई व भावासह वास्तव्याला होता. तो एका दुर्धर आजाराने ग्रस्त होता. रविवारी १३ ऑगस्ट रोजी त्याची आई शेतात कामाला गेली होती. त्यावेळी तो घरी एकटाच होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवन…

Read More