साईमत,अक्कलकुवा: प्रतिनिधी मोलगीचा चनवाईपाडा (ता. अक्कलकुवा) येथील पीडित तरुणीचा मिठात पुरलेला मृतदेह तब्बल 40 दिवसांनंतर न्यायालयाच्या आदेशाने बाहेर काढण्यात आला. मृतदेह पुन्हा विच्छेदनासाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आल्याची कार्यवाही मंगळवारी (ता. 22) दिवसभर सुरू होती. मोलगीचा चणवाईपाडा येथील मृत पीडित मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. तिने फाशी घेतल्याचा बनाव केला गेला होता.या प्रकरणी पोलिसांनी केवळ पीडित तरुणीला त्रास देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा संबंधितांविरुद्ध नोंदविला होता. यासंदर्भात पीडित तरुणीच्या पालकांची तक्रार मोलगी पोलिसांनी ऐकून न घेतल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.13 जुलै 2023 ला येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी…
Author: Saimat
साईमत, नवापूर : प्रतिनिधी ना. डॉ. विजयकुमार गावीत, मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दलचे निव्ोदन माजी जि.प अध्यक्षा रजनीताई नाईक व महिला वर्ग यांनी तहसिलदार महेश पवार,पोलीस निरीक्षक ज्ञानेशवर वारे यांना दिले आहे. त्यांनी निव्ोदना मध्ये म्हटले आहे की ना. डॉ. विजयकुमार गावीत मंत्री,आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी धुळे जिल्हयातील अंतुर्ली येथे आदिवासी मच्छिमार बांधवाना मासे मारीचे साहित्य वाटप करतांना दररोज मासे खाल्याने प्रसिध्द अभिनेता अमिताभ बच्चन यांची सुन अभिनेत्री एश्वर्या रॉय यांचे डोळे सुंदर आहेत. तुम्ही दररोज मासे खाल्ले की तुमचे डोळे सुंदर होतील आणि ज्या महिलेला पटवायचे तिला पटवूनच घ्याल, असे महिलांबाबत…
साईमत, शिरपूर : प्रतिनिधी भरधाव व्ोगाने येणाऱ्या ट्रकची महिलेला जोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात बुधवारी सायंकाळी ट्रकचालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली. लवा उर्फ लहू उर्फ मणिराम उर्फ कालू भिल (वय 27) आणि त्यांची पत्नी भारती लवा भिल (वय 20) (दोन्ही रा. कळमसरे ता. शिरपूर) हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाच्या चौफुलीवर सोमवारी दुपारी थांबलेले होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास केए 25 एए 6858 या क्रमांकाचा ट्रक भरधाव व्ोगाने आला. ट्रक…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी, येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कलश पंकज भैय्या हिची टोरंटो विद्यापीठाने पीयरसन इंटरनॅशनल स्कॉलरशिपसाठी निवड केली आहे. यासाठी जगभरातून ३८ तर भारतातून फक्त ३ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यात जळगावच्या कलशचा समावेश आहे. जगातील सर्वोत्तम मानले जाणाऱ्या टोरंटो विद्यापीठाच्या पीयरसन स्कॉलरशिप अत्यंत प्रतिष्ठित समजली जाते. बारावी सायन्सनंतर कलश ही आता कॅनडा येथे चार वर्षे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेऊन संशोधन करणार आहे. या शिष्यवृत्तीत तिला टोरंटो विद्यापीठातर्फे चार वर्षे निवास, भोजन, ट्युशन फी, पाठ्यपुस्तके यासह इतर सर्व सुविधा मोफतपणे दिल्या जाणार आहेत. भारतीय चलनामध्ये चार वर्षांचा हा खर्च सुमारे अडीच कोटी रुपये…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे. ज्याव्ोळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात त्याव्ोळी ते ‘क्वाजय ज्युडिशियल ऑथेरिटी’ म्हणून काम करत असतात याचे मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता कायदेशीर व नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दीर्घ सुनावणी घेत अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आणि लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर यांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटिस बजावली. मात्र,…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी राज्यात गाजलेल्या नेत्यांच्या फोन टॅिंपग प्रकरणी रश्मी शुक्लांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, शासनाने रश्मी शुक्ला यांच्या बाबतचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. रश्मी शुक्ला तुमच्या आश्रयाला आल्या म्हणून त्यांना भाजपच्या वॉिंशग मशिनकडून दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, अपेक्षेप्रमाणे सरकारने रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. माझा फोन टॅप केला, त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना अधिव्ोशनातून प्रश्न विचारला, मात्र त्याचे उत्तर मला मिळाले नाही. वास्तविक अजूनही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नसतानाही सरकारने क्लोजर रिपोर्ट दिला. उलट रश्मी शुक्लांना क्लीन चीट मिळाली. आमचे म्हणणे न ऐकता आणि आम्हाला उत्तर…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर जळगाव जिल्ह्यात अमळनेरचे एकमेव आमदार अनिल पाटील अजित पवार गटात गेले. त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळाले. एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेते मात्र शरद पवार यांच्या सोबत असून त्यांना साथ देत आहेत. अजित पवार गटाची राज्यातील जिल्हा प्रभारीची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात जळगांव, धुळे, नंदुरबार हा खान्देशातील भाग राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, शरद पवार यांच्या गटातर्फे जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा प्रभारींच्या यादीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे जळगाव, धुळे, नंदुरबार व बुलढाणा हा भाग देण्यात आला आहे. या दोन्ही नेत्यांना आता जिल्ह्यात आपला पक्ष बळकट…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी जिल्हाभरातील ठेकेदारांची ३०० कोटींची कामे पूर्ण होऊनही बिले शासनानेे अदा केलेली नाहीत. त्यामुळे ३०० कोटींची बिले दिल्याशिवाय पुढील कामे करणार नाही, अशी भूमिका जिल्हाभरातील ठेकेदार आणि त्यांच्या संघटनेने घेतली आहे. त्यामुळेच १००० कोटींच्या कामांना ब्रेक लागला आहे. तसेच जिल्ह्यातील कामे एकाच ठेकेदाराला दिली जात आहेत. ती सर्व कामे वाढीव दराच्या निविदाधारकालाच दिली आहेत. एकही काम कमी भावाच्या निविदाधारकास दिलेले नाही. यात तथ्य असल्यानेच कामांना ब्रेक लागला. मी गेल्या ४० वर्षात कुणा अधिकाऱ्यांस ब्लॅकमेल केल्याचे दाखवून द्याव्ो, असे आव्हान आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. एकनाथराव खडसे ृअधिकाऱ्यांना…
साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था चांद्रयान-३ च्या लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवून इतिहास रचला आहे. याने चंद्राच्या अंतिम कक्षेपासून २५ किमीचा प्रवास ३० मिनिटांत पूर्ण केला. लँडर हळूहळू खाली उतरवण्यात आले. ५ वाजून ३० मिनिटांनी सुरुवातीला रफ लँिंडग खूप चांगली झाली. यानंतर लँडरने ५ वाजून ४० मिनीटांनी लॅण्डरने व्हर्टिकल लँिंडग केले. तेव्हा त्याचे चंद्रापासूनचे अंतर ३ किमी होते. अखेर लँडरने सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. चंद्राच्या कोणत्याही भागात वाहन उतरवणारा हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनने हे यश मिळवले आहे.…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी जिल्हाभरातील ठेकेदारांची 300 कोटींची कामे पूर्ण होऊनही बिले शासनानेे अदा केलेली नाहीत. त्यामुळे 300 कोटींची बिले दिल्याशिवाय पुढील कामे करणार नाही, अशी भूमिका जिल्हाभरातील ठेकेदारांनी व त्यांच्या संघटनेने घेतली आहे. त्यामुळेच 1000 कोटींच्या कामांना ब्रेक लागला आहे. तसेच जिल्ह्यातील कामे एकाच ठेकेदाराला दिली जात आहेत. ती सर्व कामे वाढीव दराच्या निविदाधारकालाच दिली आहेत. एकही काम कमी भावाच्या निविधारकास दिलेले नाही. यात तथ्य असल्यानेच कामांना ब्रेक लागला. मी गेल्या 40 वर्षात कुणा अधिकाऱ्यांस ब्लॅकमेल केल्याचे दाखवून द्यावे, असे आ. एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. एकनाथराव खडसे ृअधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करीत…