साईमत, धुळे : प्रतिनिधी केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कवाढ रद्द न केल्यास सत्ताधारी नेत्यांना शेतकरी गावात फिरु देणार नाही, असा इशारा देत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदाफेक आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निव्ोदन दिले. जिल्ह्यात कांदा उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावल्याने कांद्याचे दर पुन्हा घसरण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून कवडीमोल भावाने कांद्याची विक्री सुरु होती. कांद्याला पंधरवड्यापासून बऱ्यापैकी भाव मिळू लागताच केंद्राने निर्यात शुल्क 40 टक्के केले. एप्रिल ते जुलै या कालावधीत…
Author: Saimat
साईमत, धुळे : प्रतिनिधी शहरातील हमाल मापाडी प्लॉट भागात जेसीबी यंत्रामुळे फुटलेली जलवाहिनी आठ दिवसात दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मंगळवारी रहिवाशांनी दिला. जलवाहिनी फुटल्यामुळे या भागाचा पाणी पुरवठा दोन महिन्यांपासून बंद आहे. याप्रकरणी महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांना निव्ोदन देण्यात आले. प्रभाग क्रमांक 11 मधील हमाल मापाडी प्लॉट भागात मनमाड जीन पाण्याच्या टाकीवरून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. राजीव गांधी नगरमधून ही जलवाहिनी सांडपाण्याच्या नाल्याच्या खालून गेली आहे. या ठिकाणी महापालिकेतर्फे जेसीबी यंत्राव्दारे नाला साफ सफाईचे काम सुरु असताना जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनी फुटली. या घटनेला दोन महिने होऊनही जलवाहिनी दुरूस्त करण्यात आली नाही. महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी आठ दिवसात जलवाहिनी…
साईमत, दोंडाईचा : प्रतिनिधी परिसरात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतीतील पिके करपू लागली आहेत. दरम्यान, मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. जोरदार पावसाअभावी ५ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. शिंदखेडा तालुक्यात यंदा सुरवातीपासूनच जेमतेम पाऊस होत आहे. भिजपावसावरच शेतकऱ्यांनी कपाशीलागवड व पेरण्या करून टाकल्या. निम्मा पावसाळा संपला, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला, मात्र जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतातून पाणी वाहून निघालेच नाही. नदी, नाले, ओढे वाहिले नाहीत. जलयुक्त शिवाराचे बंधारे, साठवण बंधारे, धरणे कोरडी ठणठणीत पडली आहेत. बागायतदार शेतकऱ्यांच्या विहिरी उपशावर आल्या. मेमध्ये कपाशी लागवड केल्याने पुरेशा प्रमाणात…
साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी गटग्रामपंचायत सोनबुद्रुकमार्फत आदिवासी गौरव दिनानिमित्त ग्रामसभेत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीने कन्यारत्न झालेल्या आई-वडिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील विविध शासकीय पदावरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. त्यात शिवलाल पावरा, ओजाऱ्या पावरा, निवृत्त शिक्षक पावरा, तलाठी भालचंद्र पावरा तसेच भारतभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा बजावलेले माजी सैनिक डेका दादा पावरा यांनाही सन्मानित करण्यात आला. त्यानंतर गावपातळीवर विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने ज्यांनी २० वर्षांपासून ग्रामविकास विभागाचे उत्तम आणि आदर्श काम करणारे ग्रामसेवक गिरीश गोकुळ पाटील यांना आदर्श कर्मचारी आणि निरोप…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीतर्फे दिला जाणारा ‘माझा सन्मान-२०२३’ या पुरस्काराने उद्योग क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या मंडळींचा माझा सन्मान सोहळा मुंबईच्या परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे सोमवारी संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ सिनेअभिनेते जितेंद्र यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माझा सन्मान पुरस्काराचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना ‘माझा सन्मान’ प्रदान करण्यात…
साईमत, तळोदा : प्रतिनिधी तळोदा तालुक्यातील गव्हाणीपाडा येथील येथील जि. प. शाळेत सरपंच शानुबाई वळवी यांच्याकडून जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तळोदा तालुक्यातील गव्हाणीपाडा येथील येथील जि. प. शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना लोभाणी गृप ग्रामपंचायतचे सरपंच शानुबाई वळवी यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील गरीब वंचित आदिवासी समुदायातील विध्यार्थी शैक्षणिक साहित्य पासुन वंचित राहू नये व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालु असाव्ो आणि पटसंख्या टिकून राहावी या उद्देशाने ग्रूप ग्रामपंचायत लोभाणी ग्रामपंचायतचे सरपंच शानुबाई वळवी यांच्याकडून गव्हाणीपाडा येथील जि. प. शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वही-पेन, चित्रकला…
साईमत, शिंदखेडा: प्रतिनिधी डॉ. नरेंद्र दाभोलकर हे कृतीशील विचारवंत होते. त्यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आयुष्यभर कार्य केले व अखेर बलिदानही दिले. विचार करणारा, प्रश्न विचारणारा, कार्यकारणभाव तपासणारा समाज त्यांना घडवायचा होता. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही म्हणून त्यांचा गोळ्या घालून खून झाला त्याला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. पण अद्याप न्यायालयात निर्णय होऊन मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे असे प्रतिपादन अशोकभाई शाह यांनी केले. महाराष्ट्र अंनिसच्या शिंदखेडा शाखेतर्फे आयोजित केलेल्या अभिवादन निर्धार सभेत ते बोलत होते. येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त ‘आठवणीतील डॉ.…
साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी ‘वई वई येजो व मनी कानबाई माय… लव्ह लव्ह चाल माता माथे ऊना याय व…’ यासह विविध अहिराणी-मराठी गीतांच्या मधुर आवाजात बँड व डीजेच्या तालावर नाचत, ठिकठिकाणी महिला-युवतींनी फुगडी खेळत जल्लोषात सोमवारी खानदेशचे कुलदैवत कानुबाईमातेला निरोप देण्यात आला. हिंदू धर्मातील गणेशोत्सव, नवरात्र व कानुबाई उत्सव नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत जल्लोषात साजरे केले जातात. हे तिन्हीही उत्सव सामाजिक, कौटुंबिक एकता टिकवून ठेवणारे आहेत. सणानिमित्त नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत असलेली कुटुंबेही गावाकडे परततात. त्यामुळे उत्साही वातावरण तयार होते. कानुबाई उत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यातील अनेक कुटुंबे गावाकडे आली आहेत. त्यामुळे गजबज वाढली होती. रविवारी कानुबाईची स्थापना, रोटपूजन व सोमवारी विसर्जन असे स्वरूप उत्सवाचे…
साईमत, धुळे : प्रतिनिधी सरवड (ता. धुळे) फाटा ते गाव दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक चोऱ्या व दरोड्यात या टोळीचा समाव्ोश असल्याचे निष्पन्न झाले आहे.बळसाणे येथील जैन मंदिर व चिमठाणे येथील मोबाईल दुकानातील चोरीतही या टोळीचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. येथील पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीपथकाला सरवड फाटा ते सरवड गावादरम्यान लामकानी रस्त्यावर तीन दुचाकी व नऊ लोक संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसले. पोलिस वाहन पाहताच ते तिघी दुचाकीवर भरधाव निघाले. पोलिसांनी पाठलाग करून एका दुचाकीस थांबविले. दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेण्यात…
साईमत, साक्री (धुळे) : प्रतिनिधी अक्कलपाडा धरणाच्या प्रकल्पांतर्गत पुनर्वसनात वडिलोपार्जित जमीन गेल्यानंतर भूमिहिन झालेल्या इच्छापूर (ता. साक्री) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना रविवारी समोर आली आहे. इच्छापूर (ता. साक्री) येथील राजेंद्र बुगा मारनर (वय 32) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजेंद्र मारनर यांनी रविवारी विषप्राशन करत जीवनयात्रा संपवली. त्यांच्यामागे पत्नी, मुले आहेत. त्यांचे नातलग योगेश थोरात यांच्या माहितीवरून साक्री पोलिसांत मृत्यूची नोंद झाली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर इच्छापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मारनर यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार भूमिहीन झालेले राजेंद्र मारनर दुसऱ्यांची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंब चालवण्यासाठी तसेच शेतीच्या कामांसाठी त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते.…