Author: Bharati Bharsake

​मुंबई NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींनंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींनाही वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ​जंतर-मंतरवरील आंदोलनाला मोठे यश ​दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. अखेर प्रधान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. ​अमित शाह यांच्या…

Read More

साईमत -जळगाव- प्रतिनिधी | आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (प्रायमरी व सेकंडरी) येथे दिंडी सोहळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून आषाढी एकादशी अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी अन् दिंडीत सहभागी होत प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेतला. ​  नाटिकेतून वारकरी संस्कृतीचे दर्शन ​याप्रसंगी विद्यार्थ्यांनी “पंढरीचा पांडुरंग विटेवर का उभा आहे?” या विषयावर आधारित एक विशेष नाटिका सादर केली. या नाटिकेतून वारकरी संप्रदायाचा इतिहास, समृद्ध संत परंपरा आणि भक्तीचा संदेश अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला. ​शाळेच्या प्राचार्या रेश्मी लाहोटी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना वारी, पालखी…

Read More

​ साईमत -​धरणगाव – प्रतिनिधी | धरणगाव-जळगाव मार्गावरील श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एसटी बस, आयशर ट्रक आणि खडीने भरलेला ट्राला यांच्यात थरारक तिहेरी अपघात घडला. या भीषण अपघातात ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, खडीचा ट्राला रस्त्यावरच पलटी झाला. अपघातातील सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ​ ओव्हरटेकच्या प्रयत्नात झाला थरार! ​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवला जात आह.                                                     …

Read More

​नवी दिल्ली नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टी (CJP) यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी पार पडली. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाशी सुमारे दोन तास चर्चा केली. या बैठकीत सीजेपीने मांडलेल्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने तत्त्वतः मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. ​सीजेपीच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांचा समावेश होता. ​दोन मागण्या मान्य; राजीनाम्यावर उद्यापर्यंतची मुदत ​बैठकीनंतर आशुतोष रांका यांनी माहिती दिली की, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल…

Read More

साईमत -नशिराबाद – प्रतिनिधी | नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेंतर्गत गुरुवारी (२३ जुलै) सकाळी ११ वाजता लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास शहरातील पथविक्रेते आणि नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ​‘पीएम स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना आर्थिक स्वावलंबनाची संधी’ ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील म्हणाले, ​”केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र पथविक्रेत्यांनी घ्यावा. या योजनेद्वारे पथविक्रेत्यांना सुलभ कर्ज, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन आणि आर्थिक स्वावलंबनाची मोठी संधी उपलब्ध होत आहे. शासनाच्या सर्व लोककल्याणकारी…

Read More

साईमत -जळगाव- प्रतिनिधी | शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आज (२४ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. ​या मोहिमेदरम्यान जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्वच्छता गृहीत धरत परिसर स्वच्छ केला. त्यानंतर विविध देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ​‘स्वच्छता ही दैनंदिन सवय बनावी’ — जिल्हाधिकारी रोहन घुगे ​याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले, ​”स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून ती प्रत्येकाची दैनंदिन सवय बनली पाहिजे. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ, हरित व प्रसन्न…

Read More

साईमत -जळगाव- प्रतिनिधी | पाणलोट क्षेत्रात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खान्देशातील महत्त्वपूर्ण असलेल्या गिरणा मुख्य प्रकल्पाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६०.९७ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या २४ तासांत तब्बल ३४१२.८० दशलक्ष घनफूट (९६.५८२ दशलक्ष घनमीटर) नवीन पाण्याची आवक झाली आहे. या जलसंजीवनीमुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा मोठा प्रश्न मिटणार असून नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ​उपयुक्त पाणीसाठा: ६०.९७ टक्के (३१९.२३८ दशलक्ष घनमीटर) ​एकूण साठा: ४०४.१३७ दशलक्ष घनमीटर ​सध्याची पाण्याची पातळी: ३९३.७६८ मीटर (पूर्ण पातळी: ३९८.०७ मीटर) ​धरण क्षेत्रातील पाऊस: गेल्या २४ तासांत १२ मि.मी. ​जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या धरणाचे…

Read More

​साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जळगाव पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील पान मसाल्याचे दुकान फोडून मुद्देमाल लांबवणाऱ्या दोन संशयित आरोपींना जेरबंद करण्यात रामानंद नगर पोलिसांना यश आले आहे. सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९) आणि दीपक भगवान सोनवणे (वय २०, दोघे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ​७ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी सोमानी मार्केटमधील एका पान मसाल्याच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. दुकानातील विविध कंपन्यांचे ३३ हजार रुपये किमतीचे सिगारेटचे १० बॉक्स आणि रोख ५ हजार रुपये असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी तक्रारदार सुरेश नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस…

Read More

साईमत -जळगाव- प्रतिनिधी | ​जळगाव शहरातील शिवाजी नगर हमालवाडा परिसरात जुन्या घराचा स्लॅब अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या ६४ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली आहे. लक्ष्मीबाई रामचंद्र नवघरे (वय ६४, रा. शिवाजी नगर हमालवाडा, जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ​झोपेत असतानाच काळाचा घाला ​मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई नवघरे या आपल्या पतीसह शिवाजी नगर हमालवाडा भागात वास्तव्यास होत्या. २१ जुलै रोजी रात्री नेहमीप्रमाणे जेवण आटोपून त्या झोपल्या होत्या. घराचे बांधकाम अत्यंत जुने असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास अचानक छताचा स्लॅब त्यांच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेत लक्ष्मीबाई यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत…

Read More

श्री विठ्ठल मंदिराचा भव्य रथोत्सव २५ जुलैला साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जळगावातील ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या पारंपरिक रथोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यंदाचा हा भव्य रथोत्सव २५ जुलै रोजी अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त सध्या मंदिर परिसर आणि संपूर्ण पिंप्राळा गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ​रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या ऐतिहासिक आणि भव्य रथाची रंगरंगोटी, आकर्षक सजावट, तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. मंदिर प्रशासन, सेवेकरी आणि स्थानिक भाविकांच्या एकत्रित सहकार्यातून या उत्सवाचे नियोजन केले जात आहे. ​१५० वर्षांची अखंड परंपरा ​पिंप्राळा येथील श्री…

Read More