Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा काल अखेर शेवट झाला. दहा दिवस चाललेले शिवसेनेतील राजकीय बंड, त्यानंतर आलेले ट्विस्ट या सगळ्या घडामोडीत एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis)शपथ घेतली. त्यानंतर कॅबिनेटची बैठक घेत काही निर्णयही घेतले. मात्र असे असले तरी कालपासून चर्चा रंगतेय ती फडणवीसांच्या नाराजीची आणि भाजपच्या (BJP) अंतर्गत वादांची. यावर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आशिष शेलार म्हणाले, जे काही राजकीय घडामोड घडली ती राज्याच्या हितासाठी आहे. त्यानुसार पक्ष नेतृत्वाने दिलेला निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे. त्याने मन आभाळ एवढे मोठे आहे, त्यांनी निर्णय…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपधविधीनंतर पहिल्याच बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने दोन मोठे निर्णय घेतले. पहिला म्हणजे मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बवण्याचा आणि दुसरा म्हणजे जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा. हे निर्णय होताच आज पुन्हा मोठ्या घडामोडी सुरू आहेत. यातच मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोण असेल आणि कोणाला कुठली खातील मिळतील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. पण मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागू शकते याच्या चर्चा मात्र रंगू…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी नुकतीच शपथ घेतली. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी शुभेच्छा देत नवा संसार सुखाने करा असे म्हटले आहे. तसेच आम्ही नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये अडथळे निर्माण करणार नाही. त्यामुळे त्यांनी जनतेसाठी काम करावे, असे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना कमकुवत झाली आहे आणि नाराज आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाले, मला वाटत नाही की आमची संघटना…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत काल रात्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. हा शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर सागर बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र, आज सकाळी ही माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, मुंडे हे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास देवेंद्र फडणीवस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. याठिकाणी फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात साधारण…

Read More

पॅन कार्ड आणि आधार कार्ड सध्या किती महत्वाचे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. जास्तीत जास्त ऑनलाइन कामांसाठी याचा वापर केला जात आहे. बँक किंवा नवीन डॉक्यूमेंट बनवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Linking PAN Card With Aadhaar) यासाठी ३० जून डेडलाइन ठरवली गेली होती. आता ही डेडलाइन संपली आहे. आता जर तुम्हाला पॅन कार्ड सोबत आधारला लिंक करायचे असेल तर डबल दंड भरावा लागू शकतो. सुरुवातीला यूआईडीएआय (UIDAI) ने पॅन कार्डला आधार कार्ड (Aadhar Card) शी लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही तारीख ठरवली होती. नंतर ५०० रुपये दंड सोबत ३०…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अगोदर शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने समन्स पाठविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना (Sharad Pawar)आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. मला इन्कम टॅक्सचे प्रेमपत्र आलेय. २००४, २००९, २०१४ आणि २०२० मध्ये लढविलेल्या लोकसभा-राज्यसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रांवरून मला नोटीस पाठविण्यात आली आहे, असे शरद पवार म्हणाले. तर महाराष्ट्र सरकारमध्ये बदल झाल्यानंतर लगेचच आयकर विभाग शरद पवार यांना नोटीस देतो. हा पूर्ण योगायोग आहे की आणखी काही? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश भरत तपासे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 जुलै, 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, दिनांक 3 जुलै रोजी सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.

Read More

औरंगाबाद :वृत्तसंस्था शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी आता बंडखोरीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादमध्ये त्यांच्या समर्थकांनी ‘साहेब आता निर्णय घ्या’ असे पोस्टर लावले आहे. त्यामुळे तनवाणी देखील जिल्ह्यातील इतर पाच आमदारांसारखे मुख्यमंत्री शिंदे गटात सामील होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ते शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडी येथून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर शिवसेनेचे महापौर, आमदार अशी त्यांची वाटचाल राहिली. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ते शिवसेनेतून बाहेर पडत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाअध्यक्ष अंबादास दानवे यांच्या प्रयत्नानंतर ते पुन्हा स्वगृही शिवसेनेत आले.…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. ज्याच्या हाती ससा तो पाळधी . अशी एकंदरीत परिस्थिती जी.प त पाहावयास मिळत आहे. प्रशासक नेमणुक झाल्या पासून जी.प सदस्य उपाध्यक्ष व अध्यक्ष ह्यांचा वावर जी.प त नसल्याने अधिकाऱ्यांना मन मर्जी कारभारासाठी फावले असल्याचे आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्या दालनात कामे वाटपाट डावलल्याचे सांगत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनि एल्गार पुकारला मुले प्रत्यय आला . दरम्यान बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री धिवरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहन ह्यांनी मात्र गुड गुडीत उत्तर दिल्याने बेरोजगार अभियंते ह्यांचा मोर्चा तब्बल चार तास जी.प च्या आवारात घोषणाबाजीने सुरु राहिला. एकंदरीत…

Read More

मुंबई : शिंदे मुख्यमंत्री झाले, म्हणून त्यांचे अभिंनदन. मात्र, ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री जाहीर करतात, अशी टीका सावंत यांनी केली. शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर ठाकरे सरकार कोसळले. या संपूर्ण घडामोडी मागे भाजपचा हात असल्याचा आरोप सावंत यांनी केला.शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित केले . त्यानंतर राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. यावर भारतीय जनता पक्षाची ही खेळी आहे.…

Read More