मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सोमवारी सकाळी इंदूर-खरगोनदरम्यान भीषण अपघात झाला. इंदूरहून पुण्याकडे (अमळनेर) जाणारी बस धामनोद येथील खलघाटाजवळ खळखळणाऱ्या नर्मदा नदीत कोसळली. रात्री 10 ते 10.15 च्या दरम्यान खलघाट येथील दुपदरी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना बस अनियंत्रित झाली. चालकाचा तोल गेला आणि बस रेलिंग तोडून नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 40 प्रवासी होते. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 15 प्रवाशांना जिवंत बाहेर काढल्याचा दावा केला आहे. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितले की, आतापर्यंत…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स वं सावरिया फ्युचर वर्क्स लि.च्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरातील अंत्यविधी वेळी येणारी अडचण पाहून जनतेच्या सेवेसाठी एक नवीन सुसज्ज असलेला स्वर्गरथ लोकार्पण सोहळा काल रोजी रोटरी हॉल, गणपती नगर येथे झाला . लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, महापौर जयश्रीताई महाजन,रमण अग्रवाल,माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, उपमहापौर कुलभूषण पाटील, नंदु अडवानी,सहाय्यक प्रांतपाल डॉ.मुर्तझा अमरेलीवाला, माजी अध्यक्ष नीरज अग्रवाल, विद्यमान अध्यक्ष जिनल जैन, मानद सचिव चेतन सोनी, विपुल पटेल, माजी अध्यक्ष सागर मुंदडा, धनराज कासट, योगेश कलंत्री,धर्मेश गादिया, नरेश मंधान, हर्षल कटारिया,चिराग शाह, योगेश साखला, गणेश सुर्यवंशी, करण ललवाणी, स्वरूप मल्हारा, जिगर पटेल,…
इंदूर : वृत्तसंस्था मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील इंदूर-खरगोन दरम्यान आज सकाळी मोठा अपघात झाला. इंदूरहून पुण्याला जाणारी बस सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास धामनोद येथील खलघाटाजवळील पुलावरून कठडे तोडत नर्मदा नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० ते ६० प्रवासी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले, असून अद्याप १५ जणांना वाचवण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. इंदूरपासून 80 किमी अंतरावर हा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदोरवरून पुण्याला जाणारी महाराष्ट्र एसटी मंडळाची बस ( एम एच ४० एन ९८४८ ) धार येथून अंमळनेरकडे निघाली होती, अंमळनेरकडे…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील थोर लेवा पाटीदार समाजातर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात सामाजिक सभागृहाची मागणी केली आहे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही सामाजिक कार्यकर्ते यांना तात्काळ आपल्या मागणीच्या अनुषंगाने मंजुरी मिळवून देतो असे आश्वासित केले. मुक्ताईनगर नगरसेवक श्री ललित महाजन,महेश प्रल्हाद झोपे अध्यक्ष- काळ भैरव मंदिर ट्रस्ट ,अरविंद पंडित झोपे सचिव -काळ भैरव मंदिर ट्रस्ट .उमाकांत वसंत बाऊस्कर अध्यक्ष-थोरसमित्र युवा फाऊंडेशन ,नितीन काशिनाथ चौधरी ग्रामपंचायत सदस्य ,सिद्धेस्वर शशिकांत पाटील सदस्य ,उमेश खंडू कोल्हे सहसचिव – काळ भैरव मंदिर ट्रस्ट कुणाल विजय राणे ,योगेश भागवत झोपे ,भगवान चौधरी ,विलास चौधरी ,पंकज कोल्हे ,दिपक…
मुक्ताईनगर :प्रतिनिधी वर्षावास बौद्ध बांधवांचा पवित्र असं पर्व असून या पर्वामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्धा आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सर्वांनी या वर्षावासाच्या कालावधीत वाचन करून अंगीकृत करावे , सोबतच भगवान बुद्धांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन केंद्रीय शिक्षक प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी मुक्ताईनगर येथे केले त्यासोबतच त्यांनी बौद्धांच्या उपोसत विषयी मार्गदर्शन केले. मुक्ताईनगर शहरातील श्री कॉलनी व गोदावरी कॉलनीमध्ये नियोजित बुद्ध विहारा जवळ किशोर बोदडे यांच्या निवासस्थानी भारतीय बौद्ध महासभा तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखेच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पहिले पुष्प नुकतेच गुंफण्यात आले. सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
फैजपूर: प्रतिनिधी सनातन सतपंथ संप्रदाय व वैदिक धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे दि. १७ जुलै २२ रोजी मुंबई येथून अमेरिकेला प्रयाण झाले. सतपंथ समुदायात पारिवारिक सलोखा, धार्मिक संस्कार, रूढी परंपरा वृध्दींगत होण्यासाठी अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यात भारतातील सतपंथ समुदायातील मोठ्या संख्येने स्थायिक असलेले अनुयायी गेल्या चार वर्षांपासून जनार्दन हरीजी महाराज यांचे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करीत असतात. त्याचा लाभ परिवारातील लहान थोरांसह सर्वांना मोठ्या संख्येने होत असतो. यावर्षी तीस दिवसांच्या दौऱ्यात अनुक्रमे दि. १८ जुलै ते २१ जुलै २२ रोजी शिकागो, दि. २२ ते २४…
मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अद्याप काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्हे, तालुका आणि महानगरपालिकांमधील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेगाने शिंदे गटात दाखल होत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडूनही (Shivsena) आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील होणाऱ्या बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून तातडीने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोकणात नव्याने नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांनीही अवघ्या काही तासांत राजीनामे दिल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून रत्नागिरीतील आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्यात आली होती. उदय…
यावल : प्रतिनिधी यावल तालुक्यातील आमोदा येथे पशुधन पर्यवेक्षक हे कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याने तसेच जळगाव येथून 50 किलोमीटर अंतरावरून अपडाऊन करीत असल्याने मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील म्हणजे आमोदा,बामणोद, म्हैसवाडी,विरोदा परिसरातील एकूण 23 हजार पशुधनाची देखभाल औषधोपचार वेळेवर होत नसल्याने पशु पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.पशुधन पर्यवेक्षक हे पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना आपल्या पशुंबाबत पाळीव प्राण्यां बाबत योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन,औषधोपचार नेमका कोणत्या दिवशी व कुठे करतात? याबाबत सुद्धा अनेक प्रश्न आमोदा परिसरात उपस्थित केले जात आहेत,पशुवैद्यकीय दवाखान्यातील कंपाउंडर पशुपालकांना आश्वासन देत असतो की पशुधन पर्यवेक्षक येत आहेत ते या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आहेत…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी पोलिस म्हटले की,खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा,कडक शब्दात बोलणारा,हेकेखोरअसंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असते.त्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस म्हटले की,इतका धाक हवाच. पोलिसांना कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागते.असे असले, तरी या वर्दीतही मनुष्य असतो, त्यालाही मन,भावना असतात. ड्युटीसाठी कठोर बनलेला हा वर्दीतील माणूस वेळप्रसंगी मनाने तितकाच मृदू होतो.असाच काहीसा अनुभवला गेलाय. घराघरात श्रद्धेने जपली जाणारी आषाढी एकादशी व मुस्लीम धर्मात कर्तव्य म्हणून साजरी होणारी बकरी ईद रविवार दिनांक १० जुलै रोजी एकाच दिवशी आल्याने एकमेकांच्या श्रद्धेचा आदर बाळगत चांदोरी व परिसरात शांततेत साजरे केले गेले. सायखेडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी…