साईमत, प्रतिनिधी, जळगाव जिल्हा पोलीस दलातील क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्यां स्पर्धकांनी आपली कामगिरी उंचावण्यासाठी नियमित सराव करणे गरजेचे आहे. सरावात सातत्य असेल तर यश मिळणे अवघड नाही. त्यासाठी नियमित किमान अर्धा तास तरी सराव करणे गरजेचे, असा सल्ला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा पोलीस दलातील सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धत यश मिळवणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस वितरण प्रसंगी दिला. जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा पोलीस मुख्यालयातर्फे गेल्या तीन दिवसांपासून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या खेळाडूंना पारितोषीक वितरण समारंभ रविवारी सायंकाळी 6 वाजता पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषदेचे…
Author: Saimat
साईमत, प्रतिनिधी, जळगाव पिंप्राळा येथील सेवानिवृत्त सहायक फौजदाराला सोन्याचे कॉइन घेण्याचे आमिष दाखवत 3 लाखांची फसवणूक केल्याचीघटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनीतील सेवानिवृत्त सहायक फौजदार पुरुषोत्तम सुपडू लोहार (वय 63) हे पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्याकडे निवृत्तिवेतनाची रक्कम जमा होती. त्यावेळी मुंबई येथील भैय्या पाटील व कामता सोनी या नावाच्या दोन व्यक्तींनी लोहार यांच्याशी ओळख निर्माण केली. भैय्या पाटील यांनी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये बोलावून त्यांना गुंतवणुकीचे अमिष दाखविले. त्यानंतर त्यांना कंपनीत सोन्याचे कॉइन घेऊन कंपनीत गुंतवणूक करण्याचे सांगून एक आयडी दिला. त्यामध्ये दर महिन्याला अडीच हजार रुपये…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील पिंप्राळा परिसरातील कोळीवाड्यात शनिवारी दुपारी १२.३० गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या तरूणावर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळा भागातील कोळीवाडा परिसरात घराच्या आडोश्याला गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनिय माहिती रामांनगर पोलिसांना मिळाली. पोलीस पथकातील पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, विजय खैरे, राजेश चव्हाण, रविंद्र चौधरी, पोलीस शिपाई उमेश पवार यांनी शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कारवाई केली. यात कपिल रमेश सपकाळे (वय२०) रा.कोळीवाडा, पिंप्राळा हा बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना आढळून आला. त्यावर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याजवळील ३५ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली.…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव छावा मराठा युवा महासंघाची पदाधिकारी नियुक्तीची बैठक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पद्मालय विश्रामगृह येथे घेण्यात आली. या बैठकीत संघटनेत प्रवेश करणाऱ्या प्रमुख व्यक्तींची नियुक्ती विविध पदांवर करण्यात आली. यामध्ये अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन कायदेविषयक सल्लागारपदी शिवसेना शिंदे गटाचे लिगल सेलचे जिल्हा प्रमुख ॲड.राजेश पावसे यांची नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती तसेच महिला आघाडीच्या महानगरध्यक्षा निलूताई इंगळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन उपाध्यक्षपदी नीताताई सांगोळे व विद्याताई झनके यांची तर महिला आघाडीच्या महानगर कार्यकारिणी सदस्यपदी योगिताताई सुतार, उज्ज्वलाताई सपकाळे , चंदाताई इंगळे व श्रीमती सिंधुबाई शेगोकर यांची नियुक्ती करण्यात…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव व एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरूण यांच्या संयुक्त विद्यमाने व मिल्लत फाउंडेशन फॉर एज्युकेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, बंगळूर यांच्या सौजन्याने शनिवार ‘होलिस्टिक डेव्हलपमेंट’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दुबई येथील बीडीएस डॉ. डॉ. अब्दुल रहीम शेख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रफिक पटवे यांच्या पवित्र कुराण पठणाने झाली. डॉ.चांद खान, डॉ.इरफान शेख, इफ्तिखार अहमद व आरिफ शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते सय्यद अजहर साहेब (मुंबई) यांनी…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघनगर येथील सातवेीच्या विद्यार्थ्यांनी जैन व्हॅली येथील शेती प्रकल्पास प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीचा उद्देश व्यावहारिक उद्योजकीय कौशल्यांवर अनुभवात्मक आणि संदर्भीत समज विद्यार्थ्यांना प्रदान करणे हा होता. याशिवाय या प्रकल्पाचे उद्दिष्ट शेती उद्योजक उपक्रमाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी हा होता. प्रकल्प भेटीमध्ये जाण्यापूर्वी, विद्यार्थ्यांचे जी.आर. पाटील यांनी स्वागत केले. शेती व त्यावर आधारित उद्योगाची संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगितली. जैन व्हॅलीचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या जीवनाचा लेखाजोखा तसेच त्यांचा शेती करण्यापासून ते शेती मालावर प्रक्रिया उद्योग चालू करण्यापर्यंतचा प्रवास सांगितला. पारंपरिक शेती व आधुनिक शेती यावर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून सक्रीय सहभाग घेतला.…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, सचिव ॲड.प्रमोद पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले,व्यवस्थापन सदस्य भालचंद्र पाटील , भरत अमळकर ,डॉ. हर्षवर्धन जावळे ,डॉ.शिल्पा बेंडाळे, प्रा.अशोक राणे, श्रीकांत मनियार, प्राध्यापक संजय भारंबे, प्रा.अनिल राव ,रुपेश चिरमाडे,संजय प्रभुदेसाई हे मंचावर उपस्थित होते. चंद्रयान तीन मोहीम यशस्वी केल्याबद्दल इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा अभिनंदनचा ठराव यावेळी करण्यात आला. साहेबराव भुकन यांच्या ‘विनोबा आणि शिक्षण’ या ग्रंथासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान गद्य लेखन कर्मवीर भाऊराव पाटील राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात कोषाध्यक्ष…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार असताना वादग्रस्त वक्तव्य आणि निर्णयांमुळे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतिंसह कोश्यारी यांची कारकीर्द कायम वादळी ठरली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे भगतिंसह कोश्यारी चर्चेत आले होते. आता भगतिंसह कोश्यारी यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. अजित पवार यांना कितीही व्ोळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात, असे मिश्किल विधानही त्यांनी केलं आहे. भगतिंसह कोश्यारी यांनी ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही व्ोळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच,…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडून आल्या आहेत. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात तीन राजकीय भूकंप झाले. आता भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस पक्षात मोठी फूट घडून येणार असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याबाबत सातत्याने चर्चा होत असते. पण महाजन यांनी उघडपणे याबाबतचे मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या चांगल्याच जिव्हारी लागले आहे. त्यांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आले, पण काँग्रेसला सध्या थांबवलं आहे, असे विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.. राज्यातील सरकारमध्ये सगळे पक्ष…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी देशात कांद्याची उपलब्धता कमी असून पावसाअभावी पुढील वर्षी उत्पन्नात घट येणार आहे. त्यामुळे उपलब्ध कांदा देशात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा भाव इतके गगनाला भिडतील की, आजवरचे विक्रम मोडीत निघतील. मागे दिल्लीकरांना कांद्याने रडवले होते. त्यामुळे शेतकरी व ग्राहकांचे हित डोळय़ासमोर ठेऊन केंद्र सरकारने निर्यात शुल्क लागू केल्याचे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. विविध राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय झालेला नाही, असा दावाही त्यांनी केला. कांद्याला निर्यात शुल्क लागू झाल्यापासून स्थानिक पातळीवर पडसाद उमटत आहेत. शेतकऱ्यांकडून लिलाव बंद पाडणे व आंदोलनांद्वारे केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी सायंकाळी महाजन यांनी येथे…